शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या वापराने शैक्षणिक दर्जा खालावला

By admin | Updated: July 15, 2015 02:16 IST

धावत्या जगात वावरताना झटपट काम उरकण्यासाठी व संपर्कासाठी अलीकडे मोबाईलचा वापर होऊ लागला.

परसवाडा : धावत्या जगात वावरताना झटपट काम उरकण्यासाठी व संपर्कासाठी अलीकडे मोबाईलचा वापर होऊ लागला. पण अत्याधुनिक मल्टीमीडियाच्या सॉफ्टवेअरमुळे अनेक काळ्याधंद्यांना ऊत आला आहे. मोबाईल वापराच्या मूळ हेतूला हरताळ फासत त्याचा दुरूपयोग अधिक प्रमाणात होवू लागले आहे. श्रीमंत बापाच्या लाडक्या पोरांनी वर्गातील इतर हुशार विद्यार्थ्यांना बिघडून टाकले आहे. मोबाईलमधील ब्लू-टुथमुळे एकाकडून दुसऱ्याकडे झटक्यात एसएमएस व कोणतेही व्हीडीओ तर सर्रास पाठविले जाते. कॉलेज कुमारांकडे अश्लील चित्रफीतची साठवण असते. असे अनेक प्रकार शिक्षकांना व पालकांना माहिती नसल्याने भावी विद्यार्थी वाईट संस्काराची शिदोरी घेऊन आपले भविष्य घडवतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा व महाविद्यालयीन आवारात मोबाईल बंदीला सध्या केराची टोपली दाखविण्यात येत असून, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गातून मोबाईलचा वापर मुक्तपणे करीत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मोबाईलच्या तालावर बिनधास्त वावरणारी मंडळी शाळा व महाविद्यालयाच्या आवारात दिसत आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होत असल्याने सुज्ञ व सुजान पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महाविद्यालयीन तरूण, तरूणीबरोबर प्राध्यापकांनी तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकही खुलेआम मोबाईलचा वापर करीत आहेत. यामुळे शिक्षणावर परिणाम होत असून शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. असे होऊ नये, यासाठी शासनाने यावर निर्बंध लादले आहे. असे असताना शाळा, महाविद्यालय परिसरात आजही मोबाईलचा सर्रास वापर होत आहे. रिंगटोन्स, कॉलरटोन्स आणि एमपीथ्री गाण्यांच्या तालात गोंधळ घालणारी व विशिष्ट रिगटोन्सने मुलींची छेडखाणी करणारी युवा पिढी तालुक्यातील महाविद्यालयीन आवारात दिसून येत आहे. महाविद्यालयीन प्रशासनानेही मोबाईल वापराचा विशेष असा बाऊ न केल्याने परिसरात अध्ययन कार्य सोडून मोबाईल गेममध्ये गर्क राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्राध्यापक वर्गातही मोबाईलचे वेड पहावयास मिळत आहे. भर वर्गात मोबाईलवर कित्येक वेळा गप्पा मारणारे प्राध्यापक मुलांना केव्हा शिकविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आता माध्यमिक, हायस्कूलचे विद्यार्थीही मोबाईल घेऊन शाळेत जात आहेत. एकवेळ गृहपाठाची वही घरी राहिली तरी चालेल, पण मोबाईल विसरायला नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही संपर्क साधता येतो, त्यामुळे काळजी वाटत नाही. या उद्देशाने मुलांना मोबाईल देणाऱ्या पालकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)