शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामात मुरुमाऐवजी भिसीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:11 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व कंत्राटदाराच्या संगनमताने नवेगावबांध-चिचगड राज्य महामार्ग क्रं.२७७ वरील कोहलगाव फाटा ते तिडका फाटा दरम्यान मुरुमाऐवजी भिसीचा वापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : कंत्राटदार व अभियंत्यांचे संगनमत

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व कंत्राटदाराच्या संगनमताने नवेगावबांध-चिचगड राज्य महामार्ग क्रं.२७७ वरील कोहलगाव फाटा ते तिडका फाटा दरम्यान मुरुमाऐवजी भिसीचा वापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. रस्ता कामात डांंबराचे प्रमाण कमी असल्याचेही सांगण्यात येते. या रस्ता बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.चिचगड ते अड्याळ राज्य महामार्ग क्रं.२७७ हा अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून जातो. या महामार्गावर डांबरीकरण व मुरुमाने रस्त्याच्या कडा भरण्याचे काम नुकतेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले. हे काम वडसा येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आल्याची माहिती आहे. रस्ता डांबरीकरणाच्या कामात आवश्यक त्या डांबराच्या प्रमाणापेक्षा कमी वापर करण्यात आल्याची ओरड आहे. मुरुमाऐवजी चक्क भिसीचा वापर करण्यात आला आहे. काही सुज्ञ नागरिकांनी उपविभागीय अभियंता सोनूने यांना त्याचवेळी भ्रमणध्वनीवरुन ही बाब सांगीतली होती. मात्र त्यांनी याकडे कानाडोळा केला.या प्रकारामुळे कंत्राटदाराने तक्रारकर्त्याना न जुमानता बिनबोभाटपणे काम सुरुच ठेवले. स्थानिक अभियंत्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असतांनाही दखल घेतली जात नाही म्हणून बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या रस्ता बांधकामाची तक्रार ग्रामस्थांना करावी लागली. तक्रारकर्त्याने शाखा अभियंता शहारे यांचेकडे यासंदर्भात विचारणा केली असता तुमच्या भागात मुरुम मिळतो काय? त्यामुळे भिसीचा वापर करण्यात आल्याचे उत्तर देऊन एकप्रकारे कंत्राटदाराची पाठराखणच केली आहे. या परिसरात मुरुम मिळत नाही म्हणून भिसीचे दर अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहेत काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. रस्त्याचा कडा बुजवितांना जेव्हा भिसीचा वापर करण्यात आला.त्यावेळी विभागाच्या उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्याची देखरेखीची जवाबदारी असते किंवा नाही? त्यावेळी मनाई का करण्यात आली हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी साहित्याची तपासणी करुन अंदाजपत्रकात अंतरावरुन त्या साहित्याचे दर ठरविले जातात. मग हा मुरुम निर्धारीत ठिकाणावरुन आणला गेला का? जर आणला गेला असेल तर मुरुमाऐवजी भिसी कशी आणली? गुणवत्ता तपासणीची अभियंत्याची जबाबदारी नाही का? या प्रश्नांचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा