शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

५३ लाख युनिट्सने वापर वाढला

By admin | Updated: April 11, 2015 01:48 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वीज वापरात ५३ लक्ष युनिट्सची वाढ झाल्याची माहिती आहे. सुखसुविधेच्या विद्युत

एसी-कुलर सुरू : देवरी विभागात होतो सर्वाधिक विजेचा वापरकपिल केकत ल्ल गोंदियामागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वीज वापरात ५३ लक्ष युनिट्सची वाढ झाल्याची माहिती आहे. सुखसुविधेच्या विद्युत उपकरणांचा वापर वाढत चालल्याचा हा परिणाम आहे. उन्हाळ््यात एसी, कुलर व पंख्यांचा वापर जास्त होत असल्याने वीजेच्या वापरात भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नोंद करण्यात आलेल्या वीज वापराच्या या वाढीत देवरी विभागात ३७ लक्ष युनिट्सची वाढ दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या दुनियेत मानवाला गरज पडेल त्या वस्तूची निर्मिती केली जात आहे. यात विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. थंडीत उष्णता निर्माण करण्यासाठी बुलोवर तर उन्हाळ््यात गारवा निर्माण करण्यासाठी एयर कंडीशनर, कुलर व पंखे आदी विद्युत उपकरण उलपब्ध आहेत. एवढेच नाही तर स्वयंपाकात पोळ््या बनविण्यापासून तर विजेवर चालणारी वाहनेही आता बाजारात उपलब्ध आहेत. यंत्र व उपकरणांच्या माध्यमातून मानवाला सुखसुविधा मिळत असतानाच त्यांची अजून मागणी वाढतच चालली आहे. आजघडीला माणसाला दररोजच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणांमधील सर्वाधिक उपकरणे विजेवर चालणारी आहेत. यामुळेच विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिनही ऋतूंत विजेचा वापर काही केल्या कमी होत नसल्याचे बघावयास मिळते. याबाबत वीज वितरण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात ४१४.७८ लक्ष युनिट्स विजेचा जिल्ह्यात वापर करण्यात आला होता. तर यंदा त्यात भर पडली असून हा आकडा ४६७.७६ लक्ष युनिट्सवर गेला आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत विजेच्या वापरात जिल्ह्यात ५३ लक्ष युनिट्सची भर पडली आहे. जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीचा कारभार गोंदिया व देवरी या दोन विभागांतून चालतो. त्यामुळे वीज वापराच्या आकडेवारीबाबत विभाग निहाय जाणून घेतले असता गोंदिया विभागात मागील वर्षी म्हणजेच मार्च १३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात २६१.७१ लक्ष युनिट्सची नोंद आहे. यावर्षी त्यात वाढ झाली असून हा आकडा २७७.७८ लक्ष युनिट्सवर पोहचला आहे. म्हणजेच गोंदिया विभागात १६.०७ ल.यु.विजेचा वापर वाढला आहे. देवरी विभागात मागील वर्षी १५३.०७ ल.यु. वीज वापर करण्यात आला होता. यंदा मात्र १८९.९८ ल.यु.वीज वापराची नोंद असून ३६.९१ ल.यु.वीज वापर वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. गोंदियाच्या शहरी भागात मागील वर्षी ६०.३४ ल.यु.वीज वापर करण्यात आला होता. यंदा ६४.०९ ल.यु. वीज वापराची नोंद महावितरणने घेतली आहे.भारनियमन झालेच नाहीउत्पादनापेक्षा जास्त वीजेची मागणी असल्यास अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीला भारनियमन करावे लागते. त्यातही आता ज्या परिसरात वीज चोरीचे प्रमाण जास्त व कंपनीला मिळणारे उत्पन्न कमी आहे त्या परिसरातच भारनियमन करावे, असे निकष कंपनीने ठरविले आहे. यासाठी कंपनीने ए, बी, सी, डी, ई, एफ व जी असे गट मांडले आहेत. निकषानुसार ‘जी’ या गटात सर्वाधिक भारनियमनाचा कालावधी ठरविण्यात आला असून लोड मॅनेजमेंट सेल (मुंबई) यांच्या निर्देशावरून भारनियमन केले जाते. यंदा उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत भारनियमन करण्यात आले नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.‘जी’ गटात सर्वाधिक भारनियमनवीज वितरण कंपनीने भारनियमनासाठी तयार केलेल्या विविध गटांसाठी भारनियमनाचा कालावधी ठरविलेला आहे. यातील ‘जी’ या गटात सर्वाधिक भारनियमन करावयाचे असून या गटातही आणखी तीन उपगट करण्यात आले आहेत. त्यांना जी-१, जी-२ व जी-३ म्हणून संबोधले जाते. या उपगटांत जिल्ह्यातील रतनारा, सोनेगाव (परसवाडा) हिरडामाली व मुंडीपार (गोरेगाव) या क्षेत्रांचा समावेश आहे. मात्र लोड मॅनेजमेंट सेलकडून अद्याप तरी या गटात भारनियमनाचे निर्देश देण्यात आले नसल्याने या गटाला भारनियमनापासून तूर्त दिलासा मिळाला आहे.