शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

बळिराजावर अवकाळी पावसाचे ढग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

बिरसी फाटा : मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. दिवसभर ऊन तापत असून, सायंकाळी आकाशात ढग दाटून ...

बिरसी फाटा : मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. दिवसभर ऊन तापत असून, सायंकाळी आकाशात ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकावर संकट निर्माण झाले असून, कापणी केलेले धान खराब होण्याची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने पुन्हा काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बळिराजावर अवकाळी पावसाचे ढग कायम आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना मागील तीन-चार वर्षांपासून बसत आहे. जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. हा धान निघण्याच्या स्थितीत आहे. काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी व मळणी सुरू केली आहे; पण अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात हीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण आणि सिंचनाची सोय झाल्याने पीकसुद्धा चांगले होते. त्यामुळे खरिपापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मागील आठ-दहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान कापणीला सुरुवात केली. जवळपास ५० टक्के धान कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कापणी केलेले धानपीक संकटात आले आहे. काही भागात गारपीटसुद्धा झाली. त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर धान खराब झाले आहे. धान पाखड होण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरून निघणे कठीण झाले आहे.

.......

दोन-तीन हजार हेक्टरमधील धानाला फटका

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील दोन ते तीन हजार हेक्टरमधील धानाला फटका बसला. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे अजूनही करण्यात आले नाही. आधीच कोरोनामुळे हतबल झालेला शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या तडाख्यात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून मदतीची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

..........

हवामान विभागाचा पुन्हा इशारा

हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांनी धानाची कापणी करू नये. कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी प्लास्टिक झाकून ठेवावा. पावसामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.