शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बळिराजावर अवकाळी पावसाचे ढग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

बिरसी फाटा : मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. दिवसभर ऊन तापत असून, सायंकाळी आकाशात ढग दाटून ...

बिरसी फाटा : मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. दिवसभर ऊन तापत असून, सायंकाळी आकाशात ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकावर संकट निर्माण झाले असून, कापणी केलेले धान खराब होण्याची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने पुन्हा काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बळिराजावर अवकाळी पावसाचे ढग कायम आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना मागील तीन-चार वर्षांपासून बसत आहे. जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. हा धान निघण्याच्या स्थितीत आहे. काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी व मळणी सुरू केली आहे; पण अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात हीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण आणि सिंचनाची सोय झाल्याने पीकसुद्धा चांगले होते. त्यामुळे खरिपापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मागील आठ-दहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान कापणीला सुरुवात केली. जवळपास ५० टक्के धान कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कापणी केलेले धानपीक संकटात आले आहे. काही भागात गारपीटसुद्धा झाली. त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर धान खराब झाले आहे. धान पाखड होण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरून निघणे कठीण झाले आहे.

.......

दोन-तीन हजार हेक्टरमधील धानाला फटका

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील दोन ते तीन हजार हेक्टरमधील धानाला फटका बसला. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे अजूनही करण्यात आले नाही. आधीच कोरोनामुळे हतबल झालेला शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या तडाख्यात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून मदतीची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

..........

हवामान विभागाचा पुन्हा इशारा

हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांनी धानाची कापणी करू नये. कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी प्लास्टिक झाकून ठेवावा. पावसामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.