शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बळीराजावर अवकाळीचे ढग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील चार - पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने रब्बीतील धान कापणी संकटात आली आहे, ...

गोंदिया : मागील चार - पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने रब्बीतील धान कापणी संकटात आली आहे, तर हवामान विभागाने १५ मेपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजावरील अवकाळीचे ढग कायम आहे.

जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीचीसुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यंदा ६६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली. रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण आणि सिंचनाची सोय झाल्याने धानाचे पीकसुद्धा चांगले होते. त्यामुळे खरिपापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती, तर शेतकऱ्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण होते. मागील आठ-दहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी रब्बीच्या धान कापणीला सुरुवात केली. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरवरील धान कापणी पूर्णसुद्धा झाली आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कापणी केलेले धानपीक संकटात आले आहे. मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे तर काही भागात गारपीटसुद्धा झाली त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर धान खराब झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, ५०० हेक्टरमधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. या आकड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

.............

चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान

अवकाळी पावसामुळे गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा तालुक्यातील धान पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. कृषी आणि महसूल विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...............

सकाळी ऊन संध्याकाळी पाऊस

मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस दररोज हजेरी लावत आहे. सकाळी कडक ऊन असते मात्र संध्याकाळ होताच पुन्हा आकाशात ढग दाटून येत पावसाला सुरुवात होते. हाच क्रम सुरू आहे. तर हवामान विभागाने पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊन पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

.........

काेट

हवामान विभागाने जिल्ह्यात १५ मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांनी धानाची कापणी करू नये, तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी प्लॅस्टिक झाकून ठेवावा. पावसामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.