शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

बळीराजावर अवकाळीचे ढग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील चार - पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने रब्बीतील धान कापणी संकटात आली आहे, ...

गोंदिया : मागील चार - पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने रब्बीतील धान कापणी संकटात आली आहे, तर हवामान विभागाने १५ मेपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजावरील अवकाळीचे ढग कायम आहे.

जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीचीसुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यंदा ६६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली. रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण आणि सिंचनाची सोय झाल्याने धानाचे पीकसुद्धा चांगले होते. त्यामुळे खरिपापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती, तर शेतकऱ्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण होते. मागील आठ-दहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी रब्बीच्या धान कापणीला सुरुवात केली. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरवरील धान कापणी पूर्णसुद्धा झाली आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कापणी केलेले धानपीक संकटात आले आहे. मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे तर काही भागात गारपीटसुद्धा झाली त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर धान खराब झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, ५०० हेक्टरमधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. या आकड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

.............

चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान

अवकाळी पावसामुळे गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा तालुक्यातील धान पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. कृषी आणि महसूल विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...............

सकाळी ऊन संध्याकाळी पाऊस

मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस दररोज हजेरी लावत आहे. सकाळी कडक ऊन असते मात्र संध्याकाळ होताच पुन्हा आकाशात ढग दाटून येत पावसाला सुरुवात होते. हाच क्रम सुरू आहे. तर हवामान विभागाने पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊन पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

.........

काेट

हवामान विभागाने जिल्ह्यात १५ मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांनी धानाची कापणी करू नये, तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी प्लॅस्टिक झाकून ठेवावा. पावसामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.