शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बळीराजावर अवकाळीचे ढग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील चार - पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने रब्बीतील धान कापणी संकटात आली आहे, ...

गोंदिया : मागील चार - पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने रब्बीतील धान कापणी संकटात आली आहे, तर हवामान विभागाने १५ मेपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजावरील अवकाळीचे ढग कायम आहे.

जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीचीसुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यंदा ६६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली. रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण आणि सिंचनाची सोय झाल्याने धानाचे पीकसुद्धा चांगले होते. त्यामुळे खरिपापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती, तर शेतकऱ्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण होते. मागील आठ-दहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी रब्बीच्या धान कापणीला सुरुवात केली. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरवरील धान कापणी पूर्णसुद्धा झाली आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कापणी केलेले धानपीक संकटात आले आहे. मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे तर काही भागात गारपीटसुद्धा झाली त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर धान खराब झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, ५०० हेक्टरमधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. या आकड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

.............

चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान

अवकाळी पावसामुळे गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि सालेकसा तालुक्यातील धान पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. कृषी आणि महसूल विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...............

सकाळी ऊन संध्याकाळी पाऊस

मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस दररोज हजेरी लावत आहे. सकाळी कडक ऊन असते मात्र संध्याकाळ होताच पुन्हा आकाशात ढग दाटून येत पावसाला सुरुवात होते. हाच क्रम सुरू आहे. तर हवामान विभागाने पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊन पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

.........

काेट

हवामान विभागाने जिल्ह्यात १५ मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांनी धानाची कापणी करू नये, तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी प्लॅस्टिक झाकून ठेवावा. पावसामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.