शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

हत्याकांडाचे गूढ लवकर उकलून दोषींवर कठोर कारवाई करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम चूरडी येथे घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. मात्र ५ दिवस लोटूनही आरोपींचा ...

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम चूरडी येथे घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. मात्र ५ दिवस लोटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. अशात पोलिसांनी लवकरात लवकर हे गूढ उकलून आरोपींवर कठोर कारवाई करावी, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.

ग्राम चूरडी येथील बिसेन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले व संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. एकाच कुटुंबातील चार जणांचा जीव गेल्याने समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेला आता ४ दिवसांचा कालावधी लोटूनही या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. शिवाय रेवचंद यांची हत्या की आत्महत्या, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. यावर पटोले यांनी, पोलीस विभागाने योग्य चौकशी करून आपली तपासचक्रे गतिमान करावीत व या हत्याकांडाचे गूढ लवकर समोर आणावे, असे आदेश दिले. तसेच आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी पोलीस विभाग व मुख्यमंत्र्यांना केली जाईल असे सांगितले.

यावेळी माजी आमदार दिलीप बंसोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन. डी. किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, लक्ष्मीनारायण दुबे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.