शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

समाजात युवकांपुढे बेरोजगारीचेच मोठे आव्हान

By admin | Updated: January 12, 2017 00:15 IST

भारत तरूणांचा देश आहे म्हणून गवगवा केला जातो. परंतु देशातील तरूण बेरोजगारीच्या विळख्यात आहेत.

आज राष्ट्रीय युवक दिन : लोकमत परिचर्चेत विविध क्षेत्रातील युवकांचा सूर गोंदिया : भारत तरूणांचा देश आहे म्हणून गवगवा केला जातो. परंतु देशातील तरूण बेरोजगारीच्या विळख्यात आहेत. आजघडीला तरूणांच्या समोर सर्वात मोठे आव्हान बेरोजगारीच आहे. शासन विविध योजना आणते, परंतु त्या योजनांची अंमलबजावणी पध्दतीशिरपणे होत नसल्याने त्याचा फायदा दिसून येत नाही, असा सूर युवकांनी व्यक्त केला. लोकमततर्फे राष्ट्रीय युवक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या परिचर्चेत छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलम हलमारे, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, रेल्वे कमिटी सदस्य विक्की गोहरे, दिनेश उपाध्याय, पियुष हलमारे, रितेश मेंढे व जयप्रकाश भोयर सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, शासन पदभरती करीत नाही त्यामुळे बेरोजगारांचा लोंढा वाढत आहे. या देशातील तरूण बेरोजगार राहू नये यासाठी मोदी सरकाने मुद्रा लोन योजना सुरू केली. परंतु या योजनेचा बोजवारा निघाला. स्टार्ट अ‍ॅप इंडियाच्या नावाखाली मुद्रा लोन शुन्य व्याज, काहीही गहाण न ठेवता २५ टक्के अनुदानावर बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. परंतु बँकाकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या बेरोजगारांना आधी गहाण ठेवा नंतर कर्ज घ्या असा सल्ला बँकांनी दिला. सरकाच्या योजना चांगल्या असतात पण त्याच योजनांचा लाभ गरजूंना देण्यासाठी विविध कारणे सांगून त्यांना त्रास दिला जातो. त्रासाला कंटाळून तो व्यक्ती पैसे देण्यास तयार झाला की त्याला त्या त्या योजनेचा लाभ देण्यात येते. तरूणांपुढे बेरोजगारीची ज्वलंत समस्या आहे.धानाला भाव नाही म्हणून शिकलेला तरूण शेती करणे पसंत करत नाही. काही तरूण रोजगारासाठी शहरात पलायन करतात. तर बेरोजगारीमुळे काही वाममार्गाला लागतात. हुशार विद्यार्थ्याला शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे परिस्थितीला घेऊन रडत बसावे लागते. शिक्षणाच्या क्षेत्रात बाजारीकरण झाले असून याची सर्व कल्पना शासनाला असूनही शासन या शैक्षणिक संस्थाकडे लक्ष का घालत नाही. हुशार विद्यार्थी पैश्याअभावी शिक्षणापासून वंचीत राहात आहे. शासनाच्या शाळांमधील गुणवत्ता ढासळली असल्याने आजघडील गरिब व्यक्तीही आपल्या मुलाला शासकीय शाळांमध्ये शिकविण्यास तयार राहात नाही. आजडीला १०० पैकी ७० तरूणांकडे स्मार्ट फोन आहे. परंतु स्मार्ट फोन असलेल्या तरूणांपैकी ३० टक्के तरूण त्या फोनचा दुरूपयोग करतात. परंतु ७० टक्के लोक चांगल्या कामासाठी करतात. कॅशलेसची संकल्पना चांगली आहे परंतु त्यासाठी नियोजन आणि मानसिकता लक्षात घेऊन उपाययोजना करायला हवे. शासनाने कॅशलेससाठी सक्ती करू नये. राजकारणात तरूणांचा दुरूपयोग होतो. त्यांना सहज वाढण्याची संधी दिली जात नाही. पुढारी त्यांना दाबून ठेवतात असाही सूर उमटला. पायाभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या बाता हाकण्यात काही अर्थ नाही. मुलभूत गरजा पुर्ण केल्यानंतरच इतर गोष्टींकडे वळावे. बोलणे आणि करणे हा हेतू शासनाचा असावा. नुसत्या बाता हाकून चालणार नाही तर बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योगांकडे लक्ष घालवे. पुतळ्यांच्या नावावर जमीनी हडपण्याचे षडयंत्र अनेकांचे असते. महापुषांच्या कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्यांचे पुतळे उभारतो. मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली दिली जाते. त्यांच्या विचारांप्रमाणे वागा पुतळे उभारले नाही तरी चालेल. तरूणांना आवाहन करतांना व्यसन सोडा प्रगतीची कास धरा असे सांगत आपले आयकॉन सिनेसृष्टीतल कलावंताना नाही तर स्वामी विवेकानंद व त्यांच्या सारख्या महापुरूषांना ठेवा असा संदेश या तरूणांनी या चर्चासत्रातून दिला. (तालुका प्रतिनिधी)