शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सुतार व्यवसायावर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: May 27, 2017 00:52 IST

पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारा ऐवजी रेडीमेड मिळणारी लोखंडी अवजारे

बलुतेदारी पद्धत कालबाह्य : शेतकऱ्यांची "रेडिमेड" साहित्यांकडे धाव लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारा ऐवजी रेडीमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्याने सुतारांच्या व्यवसायावर बेरोजगारीची कुऱ्हाड चालली आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ही पद्धती काळाच्या ओघात लुप्त पावत चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडेगावात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार होते. बलुतेदार व अलुतेदार गावातील शेतकऱ्यांना वर्षभर सेवा पुरवत असून त्या मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून मोबदला म्हणून धान्य मिळे. परंतु, यांत्रिक युगाचा प्रारंभ झाल्यापासून शेतीमध्ये लागणाऱ्या लाकडी अवजाराऐवजी कारखान्यातूनच रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध होत असल्याने बारा बलुतेदारांमध्ये समाविष्ट असलेल्या सुतारांच्या व्यवसायावर पाणी फेरले आहे. सुतार कुटुंबीयांचे संपूर्ण जीवन हे त्यांच्या कलाकौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीतून घडविले जात असे. शेतीसाठी लागणारे, नांगर, वखर, फन, डवरा, ज्यू, भोवऱ्या खाचरा बंडी, तिफन, खातवा, रुमण्या आदी इत्यादी अवजारे तर घरगुती साहित्यात पलंग, टेबल, खूर्ची, पाट, घराचे छप्पर ठोकणे, दरवाजे, खिडक्या, कोरपाट-बेलना आदी वस्तू तयार करीत असे. घरगुती साहित्य असो की, शेतीची अवजारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन साहित्य बनविण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकरीवर्ग सुताराकडे येरझारा मारत असत. सुतारही त्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाहिजे त्या आकारात शेतीची अवजारे बनवून देत असत. सुतार बनवलेल्या अवजारांपासून मिळालेल्या मिळकतीतून आपल्या कुटुंबीयांची गरज भागवीत असे. परंतु आता लोखंड व प्लास्टिकपासून बनविलेली शेतीची अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. किंमतीच्या बाबतीत ही अवजारे थोडी महाग असली तरी टिकावू होत असल्याने रेडिमेड अवजारांकडे आकर्षित होत आहे. यामध्ये बैलगाडी, भोवरी, वखर, डवरा शहरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकेकाळी १२ बलुतेदारांत महत्वाचा मानला गेलेला सुतार व्यवसाय करणाऱ्या सुतारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.