शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास ठरावावरून ग्रा.पं.सदस्यांत राडा

By admin | Updated: February 19, 2016 02:04 IST

तालुक्यातील चिरचाळबांध येथील सरपंच बलीराम जैयराम तरोणे यांच्या असंतुष्ट कार्यप्रणालीमुळे नऊपैकी सात सदस्यांनी

आमगाव : तालुक्यातील चिरचाळबांध येथील सरपंच बलीराम जैयराम तरोणे यांच्या असंतुष्ट कार्यप्रणालीमुळे नऊपैकी सात सदस्यांनी अविश्वास ठराव दखल केला होता. १८ फेब्रुवारीला या अविश्वासावर निर्णय होणार होता, परंतु अविश्वास दाखल करणारे सदस्य ग्रामपंचायत परिसरात दाखल होताच काही सदस्यांनी त्यांना अडवून लाठीकाठीने व तलवारीचा धाक दाखवून विशेष सभेत जाण्यास अटकाव केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता.यावेळी पोलिसांची उपस्थिती होती. त्यांनी सदस्यांना सुखरुप बाहेर काढले. मात्र राडा करणाऱ्या सदस्यांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप इतर सदस्यांनी केला. चिरचाळबांध ग्रामपंचायत येथे सरपंच बलीराम जैराम तरोणे यांच्याविरूद्ध नऊपैकी सात सदस्यांनी १२ फेब्रुवारीला तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर तहसीलदारांनी निर्णय घेण्यासाठी १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात केले होते.सदर अविश्वास एकमताने पारित व्हावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य हंसकला दुर्गाप्रसाद मांजरकर, कल्पना दिलीप शिवनकर, ललीता केवलचंद भाजीपाले, टेकचंद बेनीराम तुरकर, धनराज क्षीलाल उदभवरे, राकेश लोभीचंद मेंढे, गरीबदास चमारु तुमसरे हे चार चाकी वाहनाने ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेसाठी परिसरात दाखल झाले. परंतु अगोदरच त्या सदस्यांचा काटा काढण्यासाठी ग्रा.पं.सदस्य मुक्तानंद पटले व इतरांनी सापळा रचला होता. ग्रामपंचायत सदस्य वाहनाने पोहचताच काही कार्यकर्त्यांनी वाहनाला घेराव करुन सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस बंदोबस्त असतानाही कर्मचाऱ्यांना ओढताण करण्यात आली. अविश्वास ठरावावर बोलावलेल्या विशेष सभेत सदस्य गैरहजर असल्याने चर्चा झाली नाही. त्यामुळे प्रस्ताव बाळगळला. जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी सांगितले. अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई निश्चित करणार, असे पोलिसांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)