शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

जलयुक्त योजनेच्या मातीबांध कामात गैरप्रकार

By admin | Updated: June 24, 2017 01:51 IST

तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत जलशिवार योजना सुरू आहे.

तालुका कृषी विभागाचा अजब कारभार : राजस्थानी ट्रॅक्टरने केले रात्रीला काम लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत जलशिवार योजना सुरू आहे. यावर शासन कोट्यवधींचा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. पण एकीकडे ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’च्या नावावर शेतकऱ्याला अडवा अन् पैसे जिरवा, असा गैरप्रकार कृषी अधिकारी कार्यालयातून सुरू आहे. करटी बु. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर मातीकाम सदर कार्यालयामार्फत करण्यात आले. पण शेतकऱ्यांना याची जाणीवच नाही. कृषी सहायिका हरिणखेडे यांनी शेतकऱ्यांची सहमती व सातबार न घेता अल्प प्रमाणात मातीचे काम ट्रॅक्टरने केले व शेतकऱ्यांच्या धानपिकांच्या समतोल बांध उलट खराब केले. त्यामुळे बांधीत समतोल पाणी न राहता एकाच बाजूने राहील. तर काही ठिकाणी माती घालण्यात आलेच नाही. ऐन शेतीच्या कामात व पीक घालणे सुरू असतानाच शेतकऱ्यांची शेती खराब झालेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक हरिणखेडे यांना विचारले असता त्यांनी उलट शब्दात उत्तरे दिली. शासनाच्या नियमाने कामे करू, अधिकारी जसे सांगतील तसे करू, मी महिला कर्मचारी आहे, अशा शब्दात शेतकरी सुरेश पटले यांना उत्तर दिले. तर शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न समोर आहे. संपूर्ण काम अल्प प्रमाणात करण्यात आले आहे. काही ठिकाणी बांध जसेच्या तसेच आहेत. जीर्ण धुऱ्यांच्या बांधीवर माती घातले, पण चांल्या धुऱ्यांवर माती न टाकता उलट माती बांधीतच टाकण्यात आली आहे. एका एकराला एका तासात चारही बाजूंनी ट्रॅक्टरने खोदून माती कसीतरी टाकण्यात आली. आजही माती बांधीत आहे. यात फक्त ७५० रूपयांत एक माती काम झाले आहे. तर शासन एका एकराला ३५ ते ४५ हजार रूपये देते. यात हिशेब लावला तर कोट्यवधी रूपयांचा माती बांध कामात गैरप्रकार झाला असावा, असे बोलले जात आहे. शेकडो हेक्टरमध्ये मातीकाम सुरू आहे. संपूर्ण तालुक्यात अशाच प्रकारे काम या विभागामार्फत सुरू आहे. सदर कामाची चौकशी जिल्हाधिकारी यांनी स्वत: करावी. कृषी सहायक मुख्यालयी राहत नाही. तिरोडा येथून कार्यभार चालवित आहेत. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा सेवा सहकारी संस्थेचे सदस्य सुरेश पटले, विनय पटले, अंजीलाल पटले, यशवंत लांजेवार, धनपाल पटले, मुकेश अंबुले, छगन बघेले, शिवशंकर बघेले, विवेक कटरे, महेश पटले, नंदकिशोर ठाकरे, गोरेलाल कटरे, विजय पटले यांनी केली आहे. तशी तक्रारही जिल्हाधिकारी, कृषी विभाग व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे.