शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त योजनेच्या मातीबांध कामात गैरप्रकार

By admin | Updated: June 24, 2017 01:51 IST

तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत जलशिवार योजना सुरू आहे.

तालुका कृषी विभागाचा अजब कारभार : राजस्थानी ट्रॅक्टरने केले रात्रीला काम लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत जलशिवार योजना सुरू आहे. यावर शासन कोट्यवधींचा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. पण एकीकडे ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’च्या नावावर शेतकऱ्याला अडवा अन् पैसे जिरवा, असा गैरप्रकार कृषी अधिकारी कार्यालयातून सुरू आहे. करटी बु. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर मातीकाम सदर कार्यालयामार्फत करण्यात आले. पण शेतकऱ्यांना याची जाणीवच नाही. कृषी सहायिका हरिणखेडे यांनी शेतकऱ्यांची सहमती व सातबार न घेता अल्प प्रमाणात मातीचे काम ट्रॅक्टरने केले व शेतकऱ्यांच्या धानपिकांच्या समतोल बांध उलट खराब केले. त्यामुळे बांधीत समतोल पाणी न राहता एकाच बाजूने राहील. तर काही ठिकाणी माती घालण्यात आलेच नाही. ऐन शेतीच्या कामात व पीक घालणे सुरू असतानाच शेतकऱ्यांची शेती खराब झालेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक हरिणखेडे यांना विचारले असता त्यांनी उलट शब्दात उत्तरे दिली. शासनाच्या नियमाने कामे करू, अधिकारी जसे सांगतील तसे करू, मी महिला कर्मचारी आहे, अशा शब्दात शेतकरी सुरेश पटले यांना उत्तर दिले. तर शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न समोर आहे. संपूर्ण काम अल्प प्रमाणात करण्यात आले आहे. काही ठिकाणी बांध जसेच्या तसेच आहेत. जीर्ण धुऱ्यांच्या बांधीवर माती घातले, पण चांल्या धुऱ्यांवर माती न टाकता उलट माती बांधीतच टाकण्यात आली आहे. एका एकराला एका तासात चारही बाजूंनी ट्रॅक्टरने खोदून माती कसीतरी टाकण्यात आली. आजही माती बांधीत आहे. यात फक्त ७५० रूपयांत एक माती काम झाले आहे. तर शासन एका एकराला ३५ ते ४५ हजार रूपये देते. यात हिशेब लावला तर कोट्यवधी रूपयांचा माती बांध कामात गैरप्रकार झाला असावा, असे बोलले जात आहे. शेकडो हेक्टरमध्ये मातीकाम सुरू आहे. संपूर्ण तालुक्यात अशाच प्रकारे काम या विभागामार्फत सुरू आहे. सदर कामाची चौकशी जिल्हाधिकारी यांनी स्वत: करावी. कृषी सहायक मुख्यालयी राहत नाही. तिरोडा येथून कार्यभार चालवित आहेत. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा सेवा सहकारी संस्थेचे सदस्य सुरेश पटले, विनय पटले, अंजीलाल पटले, यशवंत लांजेवार, धनपाल पटले, मुकेश अंबुले, छगन बघेले, शिवशंकर बघेले, विवेक कटरे, महेश पटले, नंदकिशोर ठाकरे, गोरेलाल कटरे, विजय पटले यांनी केली आहे. तशी तक्रारही जिल्हाधिकारी, कृषी विभाग व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे.