शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

उज्ज्वला पुन्हा चुलीवर, कनेक्शन मोफत, पण गॅस भरणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

गोंदिया : केंद्र सरकारने चूलमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप केले. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ...

गोंदिया : केंद्र सरकारने चूलमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप केले. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९९ हजार लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. मात्र मागील दीड वर्षात गॅस सिलिंडरच्या किमती नऊशे रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर भरून घेणे अवघड झाले आहे. महागाईमुळे त्या पुन्हा चुलीकडे वळल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पहिल्या टप्प्यातील ही योजना फसली असताना आता केंद्र सरकारने पुन्हा उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. कनेक्शन जरी मोफत मिळणार असेल तरी गॅस सिलिंडर भरण्यासाठी ९०५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर भरणे बंद केले असून पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविला आहे. दरवाढ आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे ही योजना फसल्याचे चित्र आहे.

..............

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन

९९०००

.............

गॅस सिलिंडरचे दर (रुपयांत)

जानेवारी :२०१९ - ६७१ रुपये

जानेवारी :२०२० - ६९०

जानेवारी : २०२१- ७७२

ऑगस्ट : २०२१- ९०५ रुपये

......................

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

शासनाने आम्हाला दोन वर्षांपूर्वी चुलीपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरच्या किमती कमी होत्या त्यामुळे ते परवडत होते. पण मागील वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या किमती भरमसाट वाढल्याने त्याचा वापर आम्ही बंद केला असून चुुलीवर स्वयंपाक करीत आहोत.

- देवका मडावी, लाभार्थी

..........

उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर मिळाल्याने आनंद झाला होता. चूल आणि धूर यापासून मुक्ती मिळणार असे वाटत होते. पण गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे मागील वर्षभरापासून आम्ही गॅसचा वापर करणेच बंद केला. जंगलात सरपण आणून त्यावरच स्वयंपाक करीत आहोत.

- विशाखा उमक, लाभार्थी

.......

केंद्र शासनाने एकीकडे उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करून चूृल आणि धूरमुक्त होण्याचे स्वप्न दाखविले. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरची दरवाढ करून गोरगरीब लाभार्थ्यांना पुन्हा चुलीकडे वळण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे सरकारचे नेमके धोरण काय आहे हे कळण्यास मार्ग नाही.

- शेवंता राऊत, लाभार्थी