शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दोन युवकांनी रक्तदान करून वाचविले महिलेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST

गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला एबी पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र, शासकीय रक्तपेढीत ...

गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला एबी पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र, शासकीय रक्तपेढीत रक्त उपलब्ध नसल्याने महिलेचा जीव धोक्यात आला होता. याची माहिती रक्तमित्र विनोद चांदवानी यांना अभय गौतम यांच्याकडून मिळाली. त्यांनी लगेच एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या दोन मित्रांना घेऊन रक्तपेढी गाठून रक्तदान करून गर्भवती महिलेचे प्राण वाचविले.

मागील दीड वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे याचा रक्तदान शिबिरावरही परिणाम झाला होता. त्यामुळे राज्यातील सर्वत्र रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर १४ दिवस रक्तदान करता येत नसल्याने, रक्तदान शिबिरांवरही परिणाम झाला होता. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांच्या नातेवाइकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शनिवारी (दि.१०) दाखल करण्यात आले. या महिलेची प्रसूती झाली. मात्र, प्रसूतीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. डॉक्टरांनी तिला त्वरित रक्त देण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, शासकीय रक्तपेढीत एबी पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती रक्तमित्र अभय गौतम व विनोद चांदवानी यांना दिली. त्यांनी लगेच आपल्या मित्र परिवारात एबी पॉझिटिव्ह रक्तगट कुणाचा आहे, याचा शोध घेतला. त्यानंतर, डोनर लिस्टमध्ये जितेश अडवानी व सुमित खटवानी या दोघांचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, ते दोघेही लगेच लोकमान्य ब्लड बँकेत पोहोचत रक्तदान केले. महिलेला वेळीच रक्त मिळाल्याने तिचे प्राण वाचविण्यास मदत झाली. यासाठी संकल्प जैन, सीए सुनील चावला, राकेश वलेचा, नितीन रायकवार, नावेद आदी रक्तमित्रांनी सहकार्य केले. जितेश अडवानी व सुमित खटवानी यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

..................

रक्तदानासाठी पुढे या

कोरोनाच्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तासाठी बऱ्याचदा रुग्णांच्या नातेवाइकांची तारांबळ उडत आहे. यासाठी रक्तदात्यांनी स्वत:हून पुढे येत रक्तदान महान दान हे ब्रीद जपत रक्तदान करावे, आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचे वेळीच प्राण वाचविण्यास मदत होते. रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन ‘लोकमत’ समूहाने केेले आहे.