शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षे लोटूनही ७८१ विहिरी अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:24 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अहिल्यादेवी सिंचन कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात प्रत्येकी ७५० असे दोन वर्षाच्या १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

ठळक मुद्दे१५०० विहिरींचे उद्दिष्ट : काम संथगतीने, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचे नुकसान

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अहिल्यादेवी सिंचन कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात प्रत्येकी ७५० असे दोन वर्षाच्या १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही हे उद्दिष्ट गाठण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे. आत्तापर्यंत केवळ ७१९ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून ८७१ विहिरीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत.जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींच्या कार्यक्रमात दोन वर्षात १५०० विहिरी तयार करायच्या होत्या. यापैकी १४७१ सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. यातील ११९५ विहिरींचे काम सुरू करण्यात आले. यातील ७१९ विहिरींचे कामे पूर्ण करण्यात आली. या दोन वर्षात आमगाव तालुक्यातील २५०, अर्जुनी-मोरगाव ३००, गोरेगाव २७०, देवरी २००, गोंदिया २००, तिरोडा १६०, सालेकसा ७० व सडक-अर्जुनी ५० विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले होते.जिल्ह्यात पहिल्या वर्षी २०१६-१७ मध्ये २६३, सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात २७९ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. तर ४०४ विहिरीची कामे प्रगतीपथावर आहे. यात आमगाव ५६, अर्जुनी मोरगाव ७०, देवरी ३०, गोंदिया ५३, गोरेगाव ११०, सालेकसा व तिरोडा प्रत्येकी ३९, सडक-अर्जुनी ७ विहिरींचा समावेश आहे.अहिल्यादेवी सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांसाठी त्यांच्या सातबारावर आधीची विहिरीची नोंदणी नसल्यास तसेच तलाठी यांच्या स्वाक्षरीचे किती शेती आहे. याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक लाभार्थी संयुक्त विहीर तयार करू शकतात. यासाठी ०.६० शेती असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने तीन लाख रूपयांचीे तरतूद केली आहे.बोअर अभावी १३६ विहिरी अपूर्णमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात येणाºया विहिरींचे काम प्रगती पथावर आहे. ४०४ पैकी १३६ विहीरींमध्ये बोअर होऊ शकले नाही. १५१ विहिरींचे काम ५० टक्के झाले आहे. ११७ विहीरींचे काम फक्त २५ टक्के झाले आहे. मागील दोन वर्षातच गोंदिया जिल्ह्यातील विहिरींचे कामे पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु अडीच वर्ष लोटूनही काम पूर्ण झाले नाही. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे विहिरींचे काम संथ गतीने सुरू असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती