शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

दोन वर्षे लोटूनही ७८१ विहिरी अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:24 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अहिल्यादेवी सिंचन कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात प्रत्येकी ७५० असे दोन वर्षाच्या १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

ठळक मुद्दे१५०० विहिरींचे उद्दिष्ट : काम संथगतीने, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचे नुकसान

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अहिल्यादेवी सिंचन कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात प्रत्येकी ७५० असे दोन वर्षाच्या १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही हे उद्दिष्ट गाठण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे. आत्तापर्यंत केवळ ७१९ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून ८७१ विहिरीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत.जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींच्या कार्यक्रमात दोन वर्षात १५०० विहिरी तयार करायच्या होत्या. यापैकी १४७१ सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. यातील ११९५ विहिरींचे काम सुरू करण्यात आले. यातील ७१९ विहिरींचे कामे पूर्ण करण्यात आली. या दोन वर्षात आमगाव तालुक्यातील २५०, अर्जुनी-मोरगाव ३००, गोरेगाव २७०, देवरी २००, गोंदिया २००, तिरोडा १६०, सालेकसा ७० व सडक-अर्जुनी ५० विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले होते.जिल्ह्यात पहिल्या वर्षी २०१६-१७ मध्ये २६३, सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात २७९ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. तर ४०४ विहिरीची कामे प्रगतीपथावर आहे. यात आमगाव ५६, अर्जुनी मोरगाव ७०, देवरी ३०, गोंदिया ५३, गोरेगाव ११०, सालेकसा व तिरोडा प्रत्येकी ३९, सडक-अर्जुनी ७ विहिरींचा समावेश आहे.अहिल्यादेवी सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांसाठी त्यांच्या सातबारावर आधीची विहिरीची नोंदणी नसल्यास तसेच तलाठी यांच्या स्वाक्षरीचे किती शेती आहे. याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक लाभार्थी संयुक्त विहीर तयार करू शकतात. यासाठी ०.६० शेती असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने तीन लाख रूपयांचीे तरतूद केली आहे.बोअर अभावी १३६ विहिरी अपूर्णमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात येणाºया विहिरींचे काम प्रगती पथावर आहे. ४०४ पैकी १३६ विहीरींमध्ये बोअर होऊ शकले नाही. १५१ विहिरींचे काम ५० टक्के झाले आहे. ११७ विहीरींचे काम फक्त २५ टक्के झाले आहे. मागील दोन वर्षातच गोंदिया जिल्ह्यातील विहिरींचे कामे पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु अडीच वर्ष लोटूनही काम पूर्ण झाले नाही. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे विहिरींचे काम संथ गतीने सुरू असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती