शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गोंदियातून जाणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित

By admin | Updated: February 2, 2016 01:40 IST

स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत ...

गोंदिया : स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या १ फेब्रुवारीपासून दरदिवशी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्पेशल गाड्या असल्यामुळे या गाड्या कधीही बंध पडण्याचा धोका होता. मात्र आता या गाड्या नियमित करण्यात आल्याने सदर धोका संपुष्ठात आला आहे.दोन्ही गाड्या नियमितपणे १ फेब्रुवारीपासून चालणार आहेत. त्यांना चालविण्यासाठी दिवसात वेळेत परिवर्तन करण्यात आले नाही. रेल्वे प्रशासनाच्या प्रवक्त्यानुसार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे बोर्ड दिल्ली मुख्यालयातूनच सायंकाळी ६ वाजता हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. बिलासपूरवरून सुटणाऱ्या दोन्ही स्पेशल गाड्या गोंदियावरून धावतात. विशेष म्हणजे रेल्वे बजेट २०१३-१४ मध्ये सदर गाड्या नियमित चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु रेल्वे बोर्डाची सहमती न मिळाल्यामुळे तेव्हापासूनच या गाड्यांना स्पेशल म्हणून चालविल्या जात होत्या. आता रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. दोन्ही गाड्या चालविण्यासाठी सध्याच्या दिवस व वेळेवरच नियमित करण्यात आल्या आहेत.राजस्थानच्या दिशेने या क्षेत्रातून चालणारी आतापर्यंत केवळ एकच साप्ताहिक गाडी पुरी-भगतकी कोठी उपलब्ध होती. जी डाऊन मार्गावर रविवारी व अप मार्गावर गुरूवारी संचालित होत होती. आता दरदिवशी दोन्ही गाड्या मिळाल्यामुळे क्षेत्रातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यासाठी सध्याचे रेल्वे कमिटी व पूर्वीच्या कमिट्यांचे सदस्य, केंद्रीय रेल्वे कमिटीचे रमनकुमार मेठी, सूरज गुप्ता, शिव शर्मा, अशोक जैन, झोनल कमिटीचे चीनू अजमेरा, हरिंद्र मेठी, मंडल कमिटीचे नीलम हलमारे, गोकूल कटरे, दिलीप रोचवानी, सोहनलाल क्षीरसागर, साधनदास वाधवानी आदींनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. तसेच बिलासपूर-पुणे, बिलासपूर-तिरूवंतपूरम, बिलासपूर-यशवंतपूर व बिलासपूर-चेन्नई या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही केली आहे. (प्रतिनिधी)