शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

गोंदियातून जाणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित

By admin | Updated: February 2, 2016 01:40 IST

स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत ...

गोंदिया : स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या १ फेब्रुवारीपासून दरदिवशी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्पेशल गाड्या असल्यामुळे या गाड्या कधीही बंध पडण्याचा धोका होता. मात्र आता या गाड्या नियमित करण्यात आल्याने सदर धोका संपुष्ठात आला आहे.दोन्ही गाड्या नियमितपणे १ फेब्रुवारीपासून चालणार आहेत. त्यांना चालविण्यासाठी दिवसात वेळेत परिवर्तन करण्यात आले नाही. रेल्वे प्रशासनाच्या प्रवक्त्यानुसार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे बोर्ड दिल्ली मुख्यालयातूनच सायंकाळी ६ वाजता हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. बिलासपूरवरून सुटणाऱ्या दोन्ही स्पेशल गाड्या गोंदियावरून धावतात. विशेष म्हणजे रेल्वे बजेट २०१३-१४ मध्ये सदर गाड्या नियमित चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु रेल्वे बोर्डाची सहमती न मिळाल्यामुळे तेव्हापासूनच या गाड्यांना स्पेशल म्हणून चालविल्या जात होत्या. आता रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. दोन्ही गाड्या चालविण्यासाठी सध्याच्या दिवस व वेळेवरच नियमित करण्यात आल्या आहेत.राजस्थानच्या दिशेने या क्षेत्रातून चालणारी आतापर्यंत केवळ एकच साप्ताहिक गाडी पुरी-भगतकी कोठी उपलब्ध होती. जी डाऊन मार्गावर रविवारी व अप मार्गावर गुरूवारी संचालित होत होती. आता दरदिवशी दोन्ही गाड्या मिळाल्यामुळे क्षेत्रातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यासाठी सध्याचे रेल्वे कमिटी व पूर्वीच्या कमिट्यांचे सदस्य, केंद्रीय रेल्वे कमिटीचे रमनकुमार मेठी, सूरज गुप्ता, शिव शर्मा, अशोक जैन, झोनल कमिटीचे चीनू अजमेरा, हरिंद्र मेठी, मंडल कमिटीचे नीलम हलमारे, गोकूल कटरे, दिलीप रोचवानी, सोहनलाल क्षीरसागर, साधनदास वाधवानी आदींनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. तसेच बिलासपूर-पुणे, बिलासपूर-तिरूवंतपूरम, बिलासपूर-यशवंतपूर व बिलासपूर-चेन्नई या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही केली आहे. (प्रतिनिधी)