शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:37 IST

कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील गंगाझरी येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील गंगाझरी येथे घडली. देवदास उरकुडा उईके (६०) व रजनिश प्रदीप वानखेडे (२६) रा. गंगाझरी असे तलावात बुडून मृत्यू झालेल्यांची नाव आहे.जिल्ह्यात जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. जन्माष्टमीनिमित्त मंगळवारी घरोघरी श्रीकृष्णाच्या मूतीर्ची स्थापना करण्यात आली होती.त्यानंतर गुरूवारी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.अनेक भाविकांनी आपल्या परिसरातील नदी आणि तलावांमध्ये कान्होबाचे विसर्जन केले. जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने नदी नाले भरुन वाहत आहे. दरम्यान गंगाझरी येथील देवदास उईके व रजनिश वानखेडे येथे गावालगत असलेल्या खोड्या तलावावर कान्होबा विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा तोल गेल्याने ते दोघेही तलावातील खोल पाण्यात बुडाले. तलावावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर स्थानिक मासेमारांच्या मदतीने तलावात या दोघांचा शोध घेण्यात आला. सायंकाळी ७: ३० वाजताच्या सुमारास दोघांचे मृतदेह मिळाले. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू