शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

दाढीला हात लावण्यासाठी हातांनी भाेगला दोन महिन्यांचा वनवास ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षीपासून तळहातावर कमवून खाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कधी लॉकडाऊन लागेल आणि पोट भरणे ...

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षीपासून तळहातावर कमवून खाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कधी लॉकडाऊन लागेल आणि पोट भरणे कधी मुश्कील होईल हे आज घडीला सांगता येत नाही. अशीच धास्ती छोट्या-छोट्या व्यावसायिकांमध्ये झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे पोट भरणे अत्यंत कठीण झाले आहे. दररोज १० ते १५ लोकांची कटींग, दाढी करून आपले जीवन जगणाऱ्या कारागिरांचे हात दाढीला लावण्यासाठी आतुरलेेले होते. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे नाभिकांची दुकाने बंदच होती. परंतु घरी दाढी करणाऱ्या कारागिरांकडे कुणीच भटकले नाहीत. यामुळे पोट भरण्यासाठी रोजगार हमी योजनेचे काम,घरकूल बांधकामाची मजुरी करून पोट भरावे लागले.

आमगाव तालुक्याच्या जवरी येथील रितेश मेश्राम यांच्याशी चर्चा केली असता त्याने कोरोना काळातील अत्यंत परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. मागच्यावर्षी कोरोनाच्या संकटाने दोन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु पूर्वीपासून कमवून ठेवलेले काही पैसे जवळ असल्याने मागच्या वर्षी दोन महिने लॉकडाऊन असतानाही त्रास झाला नव्हता. परंतु यंदा एप्रिल व मे या दोन महिन्यातील संचारबंदीने आमची हालत खस्ता झाल्याचे सांगितले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये जे कमावून ठेवले होते ते गेले. त्या प्रक्रियेतून सावरण्याचा प्रयत्न असताना लॉकडाऊन खुलल्यानंतरही ग्राहक भटकत नव्हते. दिवसभर वाट पाहून दोन-चार ग्राहक आले त्यातून मिळालेल्या मिळकतीतून घर चालविण्याचा प्रयत्न असायचा. यातून हात उसनवारी वाढली.

...........

आंबील चटणीवर काढले दिवस

कटींग, दाढी करून येणाऱ्या मिळकतीतूनच घर संसार चालवित असतो. दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने मोठा त्रास झाला. त्यातच यंदा दुसऱ्यांदा कोरोनामुळे संचारबंदी झाल्याने पोट भरणे मुश्कील झाले. सरकारनेही मदत केली नाही. हाताला काम नाही, पोटाची आग विझवावी कशी? कुणी उसनवारीवर पैसे किंवा साहित्य देत नव्हते. यातच कशीबशी ओढाताण करून आंबील, चटणीवर दिवस काढले.

.............

मजुरी करुन केला उदरनिर्वाह

सरकारने ग्रामीण भागात घरकूल दिलेत त्या घरकुलाच्या कामावर जाऊन आपल्या कुटुंबाचे पोषण केले. पारंपरिक व्यवसाय करताना आमच्या व्यवसायाला कुणाची मदत मिळाली नाही. १४ महिन्याच्या काळात चार महिने आमचा व्यवसाय बंद ठेवावा लागला. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे पोषण करावे कसे? साहित्याच्या किमती वाढल्याने खर्च वाढला परंतु उत्पन्न अत्यल्प असल्याने संसाराचा गाडा कसा रेटायचा हा प्रश्न असल्याचे रितेश मेश्राम यांनी सांगितले.