शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

रुग्णवाहिकेच्या धडकेत दोन शेतकरी ठार

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला

सालेकसा/आमगाव : रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला (झालिया) ता.सालेकसा येथील रहिवासी आहेत. दरम्यान मृतांच्या कुटूंबीयांना त्वरित मोबदला मिळावा, तसेच एकाला शासकीय नोकरी देण्याची हमी मिळावी म्हणून संतप्त गावकऱ्यांनी साकरीटोला येथे चक्काजाम केला. त्यामुळे आज दिवसभर आमगाव-सालेकसा मार्गावर वाहतूक सेवा ठप्प झाली होती.संतोष झनकलाल सुलाखे (३२) आणि राहूल दिवाकर जांभुळकर (२२) हे दोघे शेतकरी साकरीटोला-आमगावदरम्यान वाहत असलेल्या काष्टासोडी नाल्याचे पाणी आपल्या शेतीला सिंचन करण्यासाठी पंप लावत होते. रात्री ११ वाजताच्यादरम्यान आमगाववरून सालेकसाकडे जात असलेली १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला टक्कर दिली त्यामुळे रुग्णवाहिकेवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती सरळ दोन शेतकऱ्यांचा अंगावर गेली, अशी माहिती चालक कृष्णकुमार राधेश्याम क्षीरसागर याने दिले. त्या रुग्णवाहिकेत डॉ.धीरज बहेकार हे सुध्दा बसले होते. काही वेळाने दुसऱ्या रुग्णवाहिकेने त्या जखमींना आमगाव येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषीत केले. दोन शेतकऱ्यांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटूंबावर मोठा आघात झाला. गावात एकच शोककळा पसरली, त्यामुळे गावकरी संतप्त झाले. मृताच्या कुटूंबीयांना अंत्यसंस्कारापूर्वी किमान पाच लाख रुपयांची मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरीची हमी मिळावी म्हणून गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम थांबवून आमगाव-सालेकसा मार्गावर चक्काजाम केला. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेत डॉक्टर बसले असूनसुध्दा त्यांनी अपघातानंतर जखमीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला नाही. एवढेच नाही तर गाडीवरून उतरण्याची माणूसकी सुध्दा दाखविली नाही, असा आरोप करीत अशा डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी गावातील सर्व महिला-पुरूष रस्त्यावर ठाण मांडून बसून होते. त्यामुळे आमगाव-सालेकसा मार्गावर वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. (प्रतिनिधी/शहर प्रतिनिधी)