शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपासाठी अडीच हजार शेतकरी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 21:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतीला सिंचनाची सोय झाल्यास दुबार पीक घेता येईल व कृषी पंपाच्या मदतीने उत्पादनात वाढ करता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र वीज वितरण कंपनीने मागील वर्षभरापासून कृषी पंपासाठी विद्युत जोडणी न दिल्याने शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली. जिल्ह्यातील २ हजार ७१९ शेतकरी कृषी पंपासाठी ...

ठळक मुद्देसिंचनाअभावी शेती पडीक ठेवण्याची वेळ : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतीला सिंचनाची सोय झाल्यास दुबार पीक घेता येईल व कृषी पंपाच्या मदतीने उत्पादनात वाढ करता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र वीज वितरण कंपनीने मागील वर्षभरापासून कृषी पंपासाठी विद्युत जोडणी न दिल्याने शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली. जिल्ह्यातील २ हजार ७१९ शेतकरी कृषी पंपासाठी अद्यापही वेटींगवर असल्याची बाब पुढे आली आहे.राज्य सरकारने राज्यातील कृषी पंपाचा अनुशेष भरुन काढण्याची घोषणा केली होती. कृषी पंपासाठी अर्ज केलेला एकही शेतकरी वीज जोडणीपासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र गोंदिया जिल्ह्यात नेमके याविरुध्द चित्र आहे. जिल्ह्यातील २ हजार ७१९ शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही मागील वर्षभरापासून कृषी पंपासाठी विद्युत जोडणी करुन देण्यात आली नाही. २०१८-१९ या वर्षात २ हजार ८१९ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जोडणी देण्याचे उद्दिष्टय देण्यात आले आहे.२०१७-१८ या वर्षात २ हजार २१३ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर मागील वर्षी गोंदिया तालुक्यातील ३६८ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ४६४ शेतकरी जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. गोरेगाव तालुक्यात २७४ शेतकºयांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ४५० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. तिरोडा तालुक्यात २७० शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी करुन देण्यात आली. तर ३६० शेतकरी अद्यापही वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४६२ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ५३४ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. देवरी तालुक्यात १३४ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. २१५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत.आमगाव तालुक्यात २३५ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. तर ११० शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. सालेकसा तालुक्यात ९९ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. २६४ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ३७१ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. ३२२ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षात २२१३ शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले. २७१९ शेतकरी कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. शेतीला सिंचनाची गरज असते. मात्र आधुनिक काळातही जिल्ह्यातील शेतकºयांना निसर्गावर अवलंबून रहावे लागत आहे.एक-एक पैसे जोडून शेतकऱ्यांनी शेतात बोअरवेल केले. परंतु बोअरवेलमधील पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत जोडणी न दिल्यामुळे ते केवळ नाममात्र ठरत आहे. शेतकऱ्यांना बोअरवेल खोदण्याचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय सिंचनाअभावी दुबार पीक घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.वीज बिल वाढवून दिल्याच्या तक्रारीविद्युत वितरण विभागाने मार्च महिन्याचे वीज बील एप्रिल महिन्यात वाटप केले त्या वीज बिलाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ करुन पाठविल्याची ओरड अनेक वीज ग्राहकांची आहे. मीटरची योग्य रिडिंग घेतली जात नाही. ग्राहकांना कमी-जास्त वीज देयक पाठवून नंतर वसुलीची कारवाई करण्यासाठी ग्राहकांकडे कर्मचारी तगादा लावत असल्याची ओरड आहे.विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्षकृषी पंपासाठी वीज बीलाचे दर अत्यल्प असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी पंपांसाठी कनेक्शन सहजासहजी दिले जात नाही. वारंवार विद्युत वितरण कंपनीच्या चकरा मारल्यानंतरही कृषी पंपासाठी विद्युत जोडणी करुन दिली जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

टॅग्स :agricultureशेती