शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

२३ केंद्रावर १५३२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निकाल तयार करून परीक्षा मंडळाकडे पाठविले.  ज्याच्या आधारे २०२१ चे निकाल जाहीर करण्यात आले.  परंतु मार्च २०२२ मध्ये होणारी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत.  परीक्षेबाबत तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार, जिथे ज्युनिअर कॉलेज आहे तिथे परीक्षा केंद्राचा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्या कनिष्ठ महाविद्यालयात १५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, त्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी जवळच्या केंद्र व उपकेंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे.  या व्यवस्थेंतर्गत सालेकसा ज्युनिअर कॉलेज सालेकसा, जि.प. ज्युनिअर कॉलेज कावराबांध, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला, ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय तिरखेडी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी, गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय दरेकसा  या सहा मुख्य परीक्षा केंद्रांव्यतिरिक्त १७ उप-केंद्रे स्थापन केली आहेत.  या सर्व केंद्रांवर ४ मार्चपासून १५३२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.  यासह यावेळी परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.  परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

परीक्षा पद्धतीत बदल- यंदा परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत.  ज्यामध्ये १०० गुणांच्या पेपर आधी तीन तासाचा होता, तो आता ३.३० तासाचा आहे.  ४० गुणांच्या अडीच तासाच्या पेपरसाठी आता ३ तासाची वेळ ठेवण्यात आली आहे.  परीक्षार्थींना सकाळी १०.३० च्या पेपरसाठी एक तास आधी म्हणजे ९.३० वाजता हजर राहावे लागेल.  कोरोनाचा संसर्ग पाहता मास्क लावणे अनिवार्य आहे.  विद्यार्थ्यांचे तापमान आणि परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर तपासल्यानंतरच केंद्रावर प्रवेश दिला जाईल.असे मिळणार मानधन... - अतिरिक्त केंद्रचालकांना किलोमीटरनुसार मानधन देण्यात येणार आहे. शहरी भागात ३ कि.मी.पर्यंत रु. ६००, ३ ते ६ कि.मी.पर्यंत रु. ८००, ८ कि.मी.वर रु. १००० आणि ग्रामीण भागात ५००, ७००, ८०० आणि ९०० रु. मानधन दिले जाईल. बैठ्या पथकाला १०० विद्यार्थ्यांमागे रु. ३००, १०१ ते ६०० विद्यार्थ्यांमागे रु. ४००, ३०१ ते ६०० विद्यार्थ्यांना रु. ५००. आणि ६०० च्या वर रु. ६०० मानधन दिले जाईल. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा