शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

२३ केंद्रावर १५३२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निकाल तयार करून परीक्षा मंडळाकडे पाठविले.  ज्याच्या आधारे २०२१ चे निकाल जाहीर करण्यात आले.  परंतु मार्च २०२२ मध्ये होणारी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत.  परीक्षेबाबत तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार, जिथे ज्युनिअर कॉलेज आहे तिथे परीक्षा केंद्राचा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्या कनिष्ठ महाविद्यालयात १५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, त्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी जवळच्या केंद्र व उपकेंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे.  या व्यवस्थेंतर्गत सालेकसा ज्युनिअर कॉलेज सालेकसा, जि.प. ज्युनिअर कॉलेज कावराबांध, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला, ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय तिरखेडी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी, गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय दरेकसा  या सहा मुख्य परीक्षा केंद्रांव्यतिरिक्त १७ उप-केंद्रे स्थापन केली आहेत.  या सर्व केंद्रांवर ४ मार्चपासून १५३२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.  यासह यावेळी परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.  परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

परीक्षा पद्धतीत बदल- यंदा परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत.  ज्यामध्ये १०० गुणांच्या पेपर आधी तीन तासाचा होता, तो आता ३.३० तासाचा आहे.  ४० गुणांच्या अडीच तासाच्या पेपरसाठी आता ३ तासाची वेळ ठेवण्यात आली आहे.  परीक्षार्थींना सकाळी १०.३० च्या पेपरसाठी एक तास आधी म्हणजे ९.३० वाजता हजर राहावे लागेल.  कोरोनाचा संसर्ग पाहता मास्क लावणे अनिवार्य आहे.  विद्यार्थ्यांचे तापमान आणि परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर तपासल्यानंतरच केंद्रावर प्रवेश दिला जाईल.असे मिळणार मानधन... - अतिरिक्त केंद्रचालकांना किलोमीटरनुसार मानधन देण्यात येणार आहे. शहरी भागात ३ कि.मी.पर्यंत रु. ६००, ३ ते ६ कि.मी.पर्यंत रु. ८००, ८ कि.मी.वर रु. १००० आणि ग्रामीण भागात ५००, ७००, ८०० आणि ९०० रु. मानधन दिले जाईल. बैठ्या पथकाला १०० विद्यार्थ्यांमागे रु. ३००, १०१ ते ६०० विद्यार्थ्यांमागे रु. ४००, ३०१ ते ६०० विद्यार्थ्यांना रु. ५००. आणि ६०० च्या वर रु. ६०० मानधन दिले जाईल. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा