शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

२३ केंद्रावर १५३२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निकाल तयार करून परीक्षा मंडळाकडे पाठविले.  ज्याच्या आधारे २०२१ चे निकाल जाहीर करण्यात आले.  परंतु मार्च २०२२ मध्ये होणारी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत.  परीक्षेबाबत तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार, जिथे ज्युनिअर कॉलेज आहे तिथे परीक्षा केंद्राचा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्या कनिष्ठ महाविद्यालयात १५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, त्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी जवळच्या केंद्र व उपकेंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे.  या व्यवस्थेंतर्गत सालेकसा ज्युनिअर कॉलेज सालेकसा, जि.प. ज्युनिअर कॉलेज कावराबांध, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला, ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय तिरखेडी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी, गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय दरेकसा  या सहा मुख्य परीक्षा केंद्रांव्यतिरिक्त १७ उप-केंद्रे स्थापन केली आहेत.  या सर्व केंद्रांवर ४ मार्चपासून १५३२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.  यासह यावेळी परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.  परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

परीक्षा पद्धतीत बदल- यंदा परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत.  ज्यामध्ये १०० गुणांच्या पेपर आधी तीन तासाचा होता, तो आता ३.३० तासाचा आहे.  ४० गुणांच्या अडीच तासाच्या पेपरसाठी आता ३ तासाची वेळ ठेवण्यात आली आहे.  परीक्षार्थींना सकाळी १०.३० च्या पेपरसाठी एक तास आधी म्हणजे ९.३० वाजता हजर राहावे लागेल.  कोरोनाचा संसर्ग पाहता मास्क लावणे अनिवार्य आहे.  विद्यार्थ्यांचे तापमान आणि परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर तपासल्यानंतरच केंद्रावर प्रवेश दिला जाईल.असे मिळणार मानधन... - अतिरिक्त केंद्रचालकांना किलोमीटरनुसार मानधन देण्यात येणार आहे. शहरी भागात ३ कि.मी.पर्यंत रु. ६००, ३ ते ६ कि.मी.पर्यंत रु. ८००, ८ कि.मी.वर रु. १००० आणि ग्रामीण भागात ५००, ७००, ८०० आणि ९०० रु. मानधन दिले जाईल. बैठ्या पथकाला १०० विद्यार्थ्यांमागे रु. ३००, १०१ ते ६०० विद्यार्थ्यांमागे रु. ४००, ३०१ ते ६०० विद्यार्थ्यांना रु. ५००. आणि ६०० च्या वर रु. ६०० मानधन दिले जाईल. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा