शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या ...

गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या निकालासाठीही मागील वर्गाची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. दहावीत मिळालेल्या गुणांना ३०, अकरावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के आणि बारावीतील कामगिरीसाठी ४० टक्के गुण दिले जाणार आहेत. एकंदरीत बारावीचा निकाल याच फाॅर्म्युल्यानुसार जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीत काही कारणास्तव अनेकांना कमी गुण मिळाले. अकरावीत रेस्ट इअर मानले जाते. त्यामुळेच या फाॅर्म्युल्यामुळे बारावीच्या निकालाला घेऊन विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने ५ ऑगस्टपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालाचा फाॅर्म्युला लक्षात घेता निकाल काय लागतो या धर्तीवर विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

.....................

३० टक्क्यांचे सूत्र गणित बिघडविणार!

दहावी आणि अकरावीचे गुण पकडून तुम्ही नक्कीच पास होणार अशी खात्री शिक्षकांना दिली आहे. मात्र, यामुळे थोडी चिंता वाढली आहे. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला नाही त्यांची मात्र या निकालाच्या सूत्राने मजा झाली आहे. पास होणार हे माहिती आहे. मात्र, या निकालाने फारसा आनंद किवा समाधान वाटत नाही.

- प्रवीण रामटेके, विद्यार्थी.

.......

शिक्षकांनी प्रात्याक्षिक परीक्षा घेतली. अंतर्गत मूल्यमापन केले, पण दहावी आणि अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. त्यामुळे निकालाविषयी काळजी आहे. कारण दहावीमध्ये कडक सेंटरवरून परीक्षा दिली. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे लक्ष आहे.

.................

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस करण्याची गरज

यंदा बारावीच्या निकालाचे सूत्र ठरले आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने निकाल जाहीर केला जात आहे. दहावी, अकरावी आणि बारावीत त्याच विद्यार्थ्यांचे मूल्याकंन हे वेगवेगळे असू शकते. दहावीत कमी गुण मिळालेले विद्यार्थी बारावीत आवडीची शाखा घेऊन अधिक गुण मिळवू शकतो.

- विजय दुर्गे, प्राध्यापक.

........................

शासनाच्या नियमानुसार बारावीचे मूल्याकंन केले जात आहे. मात्र, काही कारणांमुळे मागील वर्गात कमी गुण असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर परिणाम हाेणार आहे. ही बाब पालकांनी यावेळी विचारात घेण्याची गरज आहे.

- अनिल मंत्री, प्राचार्य सरस्वती महाविद्यालय.

.....

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी : २०८६५

मुले : १०६२७

मुली : १०२२९

..............