शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

बारावीच्या निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या ...

गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या निकालासाठीही मागील वर्गाची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. दहावीत मिळालेल्या गुणांना ३०, अकरावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के आणि बारावीतील कामगिरीसाठी ४० टक्के गुण दिले जाणार आहेत. एकंदरीत बारावीचा निकाल याच फाॅर्म्युल्यानुसार जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीत काही कारणास्तव अनेकांना कमी गुण मिळाले. अकरावीत रेस्ट इअर मानले जाते. त्यामुळेच या फाॅर्म्युल्यामुळे बारावीच्या निकालाला घेऊन विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने ५ ऑगस्टपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालाचा फाॅर्म्युला लक्षात घेता निकाल काय लागतो या धर्तीवर विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

.....................

३० टक्क्यांचे सूत्र गणित बिघडविणार!

दहावी आणि अकरावीचे गुण पकडून तुम्ही नक्कीच पास होणार अशी खात्री शिक्षकांना दिली आहे. मात्र, यामुळे थोडी चिंता वाढली आहे. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला नाही त्यांची मात्र या निकालाच्या सूत्राने मजा झाली आहे. पास होणार हे माहिती आहे. मात्र, या निकालाने फारसा आनंद किवा समाधान वाटत नाही.

- प्रवीण रामटेके, विद्यार्थी.

.......

शिक्षकांनी प्रात्याक्षिक परीक्षा घेतली. अंतर्गत मूल्यमापन केले, पण दहावी आणि अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. त्यामुळे निकालाविषयी काळजी आहे. कारण दहावीमध्ये कडक सेंटरवरून परीक्षा दिली. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे लक्ष आहे.

.................

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस करण्याची गरज

यंदा बारावीच्या निकालाचे सूत्र ठरले आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने निकाल जाहीर केला जात आहे. दहावी, अकरावी आणि बारावीत त्याच विद्यार्थ्यांचे मूल्याकंन हे वेगवेगळे असू शकते. दहावीत कमी गुण मिळालेले विद्यार्थी बारावीत आवडीची शाखा घेऊन अधिक गुण मिळवू शकतो.

- विजय दुर्गे, प्राध्यापक.

........................

शासनाच्या नियमानुसार बारावीचे मूल्याकंन केले जात आहे. मात्र, काही कारणांमुळे मागील वर्गात कमी गुण असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर परिणाम हाेणार आहे. ही बाब पालकांनी यावेळी विचारात घेण्याची गरज आहे.

- अनिल मंत्री, प्राचार्य सरस्वती महाविद्यालय.

.....

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी : २०८६५

मुले : १०६२७

मुली : १०२२९

..............