शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बारावीच्या निकालाच्या सूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या ...

गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहे. दहावीच्या निकालाप्रमाणेच बारावीच्या निकालासाठीही मागील वर्गाची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. दहावीत मिळालेल्या गुणांना ३०, अकरावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के आणि बारावीतील कामगिरीसाठी ४० टक्के गुण दिले जाणार आहेत. एकंदरीत बारावीचा निकाल याच फाॅर्म्युल्यानुसार जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीत काही कारणास्तव अनेकांना कमी गुण मिळाले. अकरावीत रेस्ट इअर मानले जाते. त्यामुळेच या फाॅर्म्युल्यामुळे बारावीच्या निकालाला घेऊन विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने ५ ऑगस्टपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालाचा फाॅर्म्युला लक्षात घेता निकाल काय लागतो या धर्तीवर विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

.....................

३० टक्क्यांचे सूत्र गणित बिघडविणार!

दहावी आणि अकरावीचे गुण पकडून तुम्ही नक्कीच पास होणार अशी खात्री शिक्षकांना दिली आहे. मात्र, यामुळे थोडी चिंता वाढली आहे. ज्यांनी वर्षभर अभ्यास केला नाही त्यांची मात्र या निकालाच्या सूत्राने मजा झाली आहे. पास होणार हे माहिती आहे. मात्र, या निकालाने फारसा आनंद किवा समाधान वाटत नाही.

- प्रवीण रामटेके, विद्यार्थी.

.......

शिक्षकांनी प्रात्याक्षिक परीक्षा घेतली. अंतर्गत मूल्यमापन केले, पण दहावी आणि अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. त्यामुळे निकालाविषयी काळजी आहे. कारण दहावीमध्ये कडक सेंटरवरून परीक्षा दिली. त्यामुळे निकाल काय लागतो याकडे लक्ष आहे.

.................

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस करण्याची गरज

यंदा बारावीच्या निकालाचे सूत्र ठरले आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने निकाल जाहीर केला जात आहे. दहावी, अकरावी आणि बारावीत त्याच विद्यार्थ्यांचे मूल्याकंन हे वेगवेगळे असू शकते. दहावीत कमी गुण मिळालेले विद्यार्थी बारावीत आवडीची शाखा घेऊन अधिक गुण मिळवू शकतो.

- विजय दुर्गे, प्राध्यापक.

........................

शासनाच्या नियमानुसार बारावीचे मूल्याकंन केले जात आहे. मात्र, काही कारणांमुळे मागील वर्गात कमी गुण असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर परिणाम हाेणार आहे. ही बाब पालकांनी यावेळी विचारात घेण्याची गरज आहे.

- अनिल मंत्री, प्राचार्य सरस्वती महाविद्यालय.

.....

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी : २०८६५

मुले : १०६२७

मुली : १०२२९

..............