शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नळ ओकताहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:53 IST

पाण्यासाठी एकीकडे हयहाय सुरू असताना तिरोडा शहरात नळांद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

गोंदिया : पाण्यासाठी एकीकडे हयहाय सुरू असताना तिरोडा शहरात नळांद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या प्रकारामुळे तिरोडावासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून शहराचे वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र सपशेल दुर्लक्ष आहे. गोंदियानंतर महत्त्वाचे शहर म्हणून तिरोडा शहराची ओळख आहे. अदानी वीज प्रकल्पासह तिरोडा तालुक्यात धापेवाडा सिंचन योजना आहे. शिवाय पाणी टंचाईच्या काळात बावणथडी प्रकल्पातून वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे तिरोडा शहरात साधारणत: पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकत नाही. असे असतानाही आजघडीला शहरातील नळ मात्र गढूळ पाणी ओकत आहेत. तिरोडा शहरातील शहीद मिश्रा वॉर्डमध्ये शनिवारी सकाळी नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. सुरूवातीला १५ मिनिटे नळांना स्वच्छ पाणी आले. मात्र त्यानंतर अत्यंत गढूळ पाणी नळांतून निघू लागले. हे पाणी लालसर रंगाचे अत्यंत गढूळ असून ते पिण्यायोग्य नव्हते. शिवाय हे पाणी भांडीकुंडी व कपडे धुणे याशिवाय इतर कामांसाठीही उपयोगी नव्हते. अशात असे गढूळ पाणी तिरोडावासीयांना नळाद्वारे मिळत आहे. शहरात आधीच पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अनेक वॉर्डातील नळांना पाणी येत नाही. काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन असल्यामुळे संतुलित प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. संबंधित विभागाने त्या जुन्या पाईप लाईन काढून नवीन पाईप लाईन घातल्या नाही. तर दुसरीकडे ज्या वॉर्डांत पिण्याचे पाणी नळांना येत आहे, तेथे गढूळ पाणी पुरविले जात आहे. या प्रकाराकडे त्वरित लक्ष पुरवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा तिरोडा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच असे झाल्यास यासाठी सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धरण्यात येईल, असा इशारा तिरोडावासीयांनी दिला आहे. (प्रतिनिधी)