शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

डायट गोंदिया येथील प्राचार्यांचा तुघलकी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतर्गत डायटची निर्मिती केली आहे. जिल्ह्याच्या ...

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतर्गत डायटची निर्मिती केली आहे. जिल्ह्याच्या गुणवत्तेची शिखर संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते; पण सध्याची गोंदिया येथील डायट प्राचार्यांची परिस्थिती पाहता अनागोंदी कारभार चालल्याचे दिसत आहे.

गोंदिया येथील प्राचार्य राजेश रुद्रकार यांचे प्रशासन म्हणजे तुघलकी प्रशासन की काय? असे चित्र सध्या डायटमध्ये आहे. जिल्ह्याच्या गुणवत्तेची जबाबदारी ही डायट या संस्थेकडे असते. या संस्थेला जिल्ह्याची शिखर संस्था म्हणून पाहिले जाते. डायटकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. येथे प्रतिनियुक्तीवर जिल्ह्यातून आठ-दहा शिक्षकांची विषय सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एवढे मनुष्यबळ असूनसुद्धा जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी भरीव असे काम होताना डायटमार्फत मागील दोन वर्षांपासून दिसत नाही. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्यात जिल्हा गुणवत्ता कक्षाची सभा घेणे अपेक्षित असते; परंतु जुलै २०२० ते जून २०२१ या काळात एकदाही सभा घेण्यात आली नाही. यावरून प्राचार्यांचे जिल्ह्याच्या शिक्षणाशी काहीही देणे घेणे नाही, असे स्पष्ट दिसत आहे. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षण पोहोचविण्यासाठी वेगवेगळे शासन स्तरावर उपाय करण्यात आले; पण डायट गोंदियाने काहीच काम केले नसल्याचा आरोप आहे. प्राचार्य यांनी जून २०२१ मध्ये काही जावक क्रमांक हे परस्पर रिकामे ठेवले आहेत. त्या पूर्वीचे जावक क्रमांक लिहिण्यात आले. नंतरचे जावक क्रमांकपण पूर्ण करण्यात आले; परंतु मधातील जावक क्रमांक रिकामे ठेवले आहेत. प्राचार्यांना आता काय साध्य करायचे आहे? की काही बोगस निविदा किंवा बिले लावायची आहेत की काय? हे न सुटणारे कोडे आहे. डायट प्राचार्य शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आहे. डायट गोंदियाची निर्मिती झाली तेव्हापासून रूद्रकार नऊ महिने वगळता ११ वर्षांपासून गोंदियातच आहेत. यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकंदर परिस्थिती पाहता डायट प्राचार्य राजेश रुद्रकार जिल्ह्याचा गुणवत्तेसाठी कोणताही ठोस उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण काही करण्याचे नियोजन दिसत नाही. म्हणजेच डायट कार्यालय गुणवत्तेसाठी सध्या काहीच काम करीत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.