शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

डायट गोंदिया येथील प्राचार्यांचा तुघलकी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतर्गत डायटची निर्मिती केली आहे. जिल्ह्याच्या ...

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतर्गत डायटची निर्मिती केली आहे. जिल्ह्याच्या गुणवत्तेची शिखर संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते; पण सध्याची गोंदिया येथील डायट प्राचार्यांची परिस्थिती पाहता अनागोंदी कारभार चालल्याचे दिसत आहे.

गोंदिया येथील प्राचार्य राजेश रुद्रकार यांचे प्रशासन म्हणजे तुघलकी प्रशासन की काय? असे चित्र सध्या डायटमध्ये आहे. जिल्ह्याच्या गुणवत्तेची जबाबदारी ही डायट या संस्थेकडे असते. या संस्थेला जिल्ह्याची शिखर संस्था म्हणून पाहिले जाते. डायटकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. येथे प्रतिनियुक्तीवर जिल्ह्यातून आठ-दहा शिक्षकांची विषय सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एवढे मनुष्यबळ असूनसुद्धा जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी भरीव असे काम होताना डायटमार्फत मागील दोन वर्षांपासून दिसत नाही. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्यात जिल्हा गुणवत्ता कक्षाची सभा घेणे अपेक्षित असते; परंतु जुलै २०२० ते जून २०२१ या काळात एकदाही सभा घेण्यात आली नाही. यावरून प्राचार्यांचे जिल्ह्याच्या शिक्षणाशी काहीही देणे घेणे नाही, असे स्पष्ट दिसत आहे. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षण पोहोचविण्यासाठी वेगवेगळे शासन स्तरावर उपाय करण्यात आले; पण डायट गोंदियाने काहीच काम केले नसल्याचा आरोप आहे. प्राचार्य यांनी जून २०२१ मध्ये काही जावक क्रमांक हे परस्पर रिकामे ठेवले आहेत. त्या पूर्वीचे जावक क्रमांक लिहिण्यात आले. नंतरचे जावक क्रमांकपण पूर्ण करण्यात आले; परंतु मधातील जावक क्रमांक रिकामे ठेवले आहेत. प्राचार्यांना आता काय साध्य करायचे आहे? की काही बोगस निविदा किंवा बिले लावायची आहेत की काय? हे न सुटणारे कोडे आहे. डायट प्राचार्य शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आहे. डायट गोंदियाची निर्मिती झाली तेव्हापासून रूद्रकार नऊ महिने वगळता ११ वर्षांपासून गोंदियातच आहेत. यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकंदर परिस्थिती पाहता डायट प्राचार्य राजेश रुद्रकार जिल्ह्याचा गुणवत्तेसाठी कोणताही ठोस उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण काही करण्याचे नियोजन दिसत नाही. म्हणजेच डायट कार्यालय गुणवत्तेसाठी सध्या काहीच काम करीत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.