शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

संपूर्ण उपचार केल्यास क्षयरोग बरा होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:18 IST

जगात क्षयरूग्णांच्या संख्येत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० टक्के लोकांना क्षयरोगाच्या जंतूची बाधा झालेली असते. देशातील ५ हजार लोकांना नव्याने क्षयरोग होत आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण कालावधीत उपचार केल्यास क्षयरोग संपूर्ण बरा होतो असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राज पराडकर यांनी केले.

ठळक मुद्देराज पराडकर : दृष्टीतर्फे क्षयरोग जनजागृती पंधरवड्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जगात क्षयरूग्णांच्या संख्येत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० टक्के लोकांना क्षयरोगाच्या जंतूची बाधा झालेली असते. देशातील ५ हजार लोकांना नव्याने क्षयरोग होत आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण कालावधीत उपचार केल्यास क्षयरोग संपूर्ण बरा होतो असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राज पराडकर यांनी केले.येथील भवभूती महाविद्यालयात दृष्टी बहुउद्देशिय विकास संस्था व जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी यांच्या संयुक्तवतीने आयोजीत क्षयरोग जनजागृती पंधरवड्याचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. भुस्कुटे होते. पाहुणे म्हणून दृष्टी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन चौधरी, नरेश रहिले, प्रज्ञा कांबळे, धनेंद्र कटरे, मंजूश्री मेश्राम उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ. पराडकर यांनी, क्षयरोगामुळे वर्षाकाठी १२ हजार कोटींचे नुकसान देशाला सहन करावे लागते. देशात मातामृत्यूंपेक्षा क्षयरोगाने अधिक महिलांचा मृत्यू होतो. गंभीर स्वरूपाच्या क्षयरोगाचे प्रमाण बालकांमध्ये अधिक आहे. योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यूचे प्रमाण बालकांचे अधिक आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण उपचार करुन घ्यावा उपचार मधातच सोडल्यास त्याचे गंभीर परिणाम त्याच रूग्णाला भोगावे लागतात असे सांगितले.डॉ. भुस्कुटे यांनी, हा रोग बरा होणारा असून हे आजार जडू नये यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. डॉ. चौधरी यांनी, क्षयरोगावर आता सर्जीकल स्ट्राईक करण्याची वेळ आली आहे. यासाठी देशातील तरूणांनी ही धूरा आपल्या खांद्यावर घ्यावी असे मत व्यक्त केले. मेश्राम यांनी, क्षयरोगामुळे वर्षाकाठी ३ लाख बालके शाळा सोडत असल्याचे सांगीतले.प्रास्ताविक समन्वयक जितेंद्र पारधी यांनी मांडले. संचालन प्रज्ञा भगत यांनी केले. आभार आरोग्य समिती सदस्य प्रा. पी.एम.लोणारे यांनी मानले. यावेळी भवभूती महाविद्यालयातील प्रा. विजय फुंडे, प्रा. व्ही.व्ही. दाणी, डॉ. तारा हुंगे, डी.एल. राणे, प्रा. अपर्णा फाळके (कटरे), प्रा. मृणाली लिल्हारे, डॉ. बुध्दघोष शिंगाडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.२४ रोजी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम२४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन असल्यामुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी क्षयरोग जागृतीचे कार्यक्रम दृष्टी बहुद्देशिय विकास संस्थेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली आहे.