शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

क्रांतीचे खरे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:05 IST

लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.

ठळक मुद्देलखनसिंह कटरे : बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्य मंडळ शाखेचे पुनर्गठन

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेचे पुनर्गठण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या वेळी मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तंटामुक्त समितीच्या सभागृहात सदर कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.मिलिंद रंगारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव रहागंडाले , सौंदड येथील कवी चंदू पाथोडे, सुखचंद वाघमारे, युवा कवी पवन पाथोडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक सुखचंद वाघमारे यांनी मांडले. त्यानंतर शाखाध्यक्ष देवेंद्र रहागंडाले यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. प्रा. मिलिंद रंगारी यांनी जिल्ह्यातील झाडीबोली चळवळीच्या कार्याचा आढावा घेतला.याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, झाडीबोली आपल्या अस्मितेचे प्रतिक आहे. बोलीमुळे आपल्या पुर्वजांची वाणी जतन करू शकतो. राष्ट्रसंतांनी झाडीपट्टी प्रदेशावर अपार प्रेम केले आणि या बोलीचा सुगंध आपल्या साहित्यातून सर्वदूर पसरविला. या वेळी वरोरा येथील आचार्य ना.गो. थुटे यांनी पाठविलेला ग्रंथ संच बोरकन्हार शाखेला बंडोपंत बोढेकर यांनी प्रदान केला.यावेळी झालेल्या कवी संमेलनात प्रा. मिलिंद रंगारी यांनी झाडीपट्टीला मानवंदना करणारी ‘झाडीची माती’ ही कविता सादर केली. तर सुशील खापर्डे यांनी ‘रित खराब हाय’ ही झाडीची कविता ऐकविली. तसेच देवेंद्र रहागंडाले यांनी ‘नायलॉनच्या रस्सीवर’ या कवितेतून शेतकऱ्यांचे दु:ख मांडले.दंडार कलावंत ग्यानीराम कटकवार यांनी ‘आम्ही मायबाप पापी’ या कवितेतून मुलींच्या बापाची व्यथा मांडली. तर राजेश कटरे यांनी ‘इस्कूलचा पयला दिवस’ या झाडीबोली कवितेतून बालपणाच्या शाळेच्या आठवण करून दिली. रमणदास बांबोर्डे यांच्या ‘अडसर नाही आणू, चंदू पाथोडे यांनी ‘माझा बाप’ या सामाजिक जाणिवेच्या कवितेने उपस्थितांना रिझविले. युवा कवी पवन पाथोडे यांनी चारोळ्या सादर केल्या.त्यानंतर आपल्या स्वरचित ‘मायमाऊली या कवितेचे गायन करून रसिसकांना मंत्रमुग्ध केले. संचालन अनिल शहारे यांनी केले. आभार सुशील खापर्डे यांनी मानले.