शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

क्रांतीचे खरे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:05 IST

लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.

ठळक मुद्देलखनसिंह कटरे : बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्य मंडळ शाखेचे पुनर्गठन

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेचे पुनर्गठण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या वेळी मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तंटामुक्त समितीच्या सभागृहात सदर कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.मिलिंद रंगारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव रहागंडाले , सौंदड येथील कवी चंदू पाथोडे, सुखचंद वाघमारे, युवा कवी पवन पाथोडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक सुखचंद वाघमारे यांनी मांडले. त्यानंतर शाखाध्यक्ष देवेंद्र रहागंडाले यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. प्रा. मिलिंद रंगारी यांनी जिल्ह्यातील झाडीबोली चळवळीच्या कार्याचा आढावा घेतला.याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, झाडीबोली आपल्या अस्मितेचे प्रतिक आहे. बोलीमुळे आपल्या पुर्वजांची वाणी जतन करू शकतो. राष्ट्रसंतांनी झाडीपट्टी प्रदेशावर अपार प्रेम केले आणि या बोलीचा सुगंध आपल्या साहित्यातून सर्वदूर पसरविला. या वेळी वरोरा येथील आचार्य ना.गो. थुटे यांनी पाठविलेला ग्रंथ संच बोरकन्हार शाखेला बंडोपंत बोढेकर यांनी प्रदान केला.यावेळी झालेल्या कवी संमेलनात प्रा. मिलिंद रंगारी यांनी झाडीपट्टीला मानवंदना करणारी ‘झाडीची माती’ ही कविता सादर केली. तर सुशील खापर्डे यांनी ‘रित खराब हाय’ ही झाडीची कविता ऐकविली. तसेच देवेंद्र रहागंडाले यांनी ‘नायलॉनच्या रस्सीवर’ या कवितेतून शेतकऱ्यांचे दु:ख मांडले.दंडार कलावंत ग्यानीराम कटकवार यांनी ‘आम्ही मायबाप पापी’ या कवितेतून मुलींच्या बापाची व्यथा मांडली. तर राजेश कटरे यांनी ‘इस्कूलचा पयला दिवस’ या झाडीबोली कवितेतून बालपणाच्या शाळेच्या आठवण करून दिली. रमणदास बांबोर्डे यांच्या ‘अडसर नाही आणू, चंदू पाथोडे यांनी ‘माझा बाप’ या सामाजिक जाणिवेच्या कवितेने उपस्थितांना रिझविले. युवा कवी पवन पाथोडे यांनी चारोळ्या सादर केल्या.त्यानंतर आपल्या स्वरचित ‘मायमाऊली या कवितेचे गायन करून रसिसकांना मंत्रमुग्ध केले. संचालन अनिल शहारे यांनी केले. आभार सुशील खापर्डे यांनी मानले.