शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उंच फाटकामुळे जनता अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी ...

ठळक मुद्देरिसामा फाटकावरील प्रकार : भुयारी पुलाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला असून त्वरीत भुयारी पुलाची मागणी केली आहे.रेल्वे फाटकापलीकडे रिसामा ग्रामस्थांची जवळपास ४०० एकर शेती आहे. बाराही महिने याच रेल्वे फाटकावरुन जनतेला आवागमन करावे लागते. प्रामुख्याने शेतकºयांचे ट्रॅक्टर व बैलगाड्यांची सारखी वर्दळ असते. फाटक बंद असल्यास बराच वेळ बैलगाड्या व ट्रक्टरला गाडी जातपर्यंत वाट बघावी लागते.कधीतर दोन गाड्यांच्या आवागनामुळे बराच वेळ थांबावे लागते. अशात बैलगाडी असल्यास अधिकच धोक्याचे असते. रेल्वेचा परिसर उंच असल्याने उभी असलेली बैलगाडी मागे जाते. अशा घटना या रेल्वे फाटकावर घडल्या आहेत.त्यामुळे रेल्व फाटकाला लागून चौकीच्या शेजारी भुयारी पूल अत्यंत गरजेचे आहे. भुयारी पुल असल्यास शेतकºयांनाही कोणतीच भिती राहणार नाही. मध्यतंरी भुयारी पुलाकरिता सेवानिवृत्त प्राचार्य शामराव बहेकार यांनी अधिकाºयांशी चर्चा करुन समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.परंतु केवळ आश्वासन मिळाले. निधी मंजूर झाला, मात्र अधिकारी बदलले. नवीन अधिकारी आल्याने फक्त कागदांची हालचाल होत आहे. त्यामुळे आता कामाला वाढीव निधी लागेल. मात्र ठोस आश्वासन किंवा भुयारी पुलाचे काम होण्याचे चिन्ह दिसत नाही.

टॅग्स :railwayरेल्वे