शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

स्टेट बँकेच्या लिंक फेलमुळे मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 01:12 IST

इंटरनेट सेवेअभावी तांत्रिक अव्यवस्थेमुळे आपण बँकांची लिंक फेल होतानाचे अनुभव घेतले आहे.

ग्राहकांना फटका : शाखा व्यवस्थापकांच्या दुर्लक्षितपणामुळे वाढला त्रास अर्जुनी-मोरगाव : इंटरनेट सेवेअभावी तांत्रिक अव्यवस्थेमुळे आपण बँकांची लिंक फेल होतानाचे अनुभव घेतले आहे. मात्र येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शाखा व्यवस्थापकाच्या कार्यशून्यतेमुळे बँकींग व्यवहारच लिंकफेल झाल्याचा अनुभव तालुक्यातील ग्राहकांना येथ आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांचे काम पहिल्या भेटीत कधीच होत नाही, अशी बोंब आहे. याचा फटका तालुक्यापासून ३० ते ४० किमी अंतर कापून येणाऱ्या ग्राहकांना बसत आहे. नोटाबंदी संपल्यानंतरही येथील कर्मचाऱ्यांच्या कासवगती पॅटर्नमुळे ग्राहकांना पैसे भरणे, विड्राल करणे आणि अन्य बॅकींग कामासाठी दिवसभर ताटकळत रांगेत उभे रहावे लागते. आर्थिक व्यवहारांची देवाण-घेवाण करण्यासाठी येथे एकच काऊंटर असल्याने ग्राहकांचा खोळंबा होतो. येथे दिवसभर रांगेत राहणाऱ्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. वॉटर कुलींग मशीन आहे, पण ती कित्येक दिवसापासून बंद आहे. शाखा व्यवस्थापकांचे या गंभीर समस्येकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. बचत खात्यांच्या पुस्तकांवर एन्ट्रीबद्दल व्यवस्थापकाने वेगळाच फतवा काढला आहे. हप्त्यामधून बुधवार व शुक्रवार दिवस ठरवून दिला आहे. मात्र दिलेल्या दिवसीही प्रिटींगचे काम होत नसल्याचे ग्राहक सांगतात. याबद्दल विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे बंद बँक प्रशासनाकडून दिल्या जातात. यामुळे सामान्य ग्राहकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. मार्च अखेरची व्यापाऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येकाला पुस्तकामध्ये जमा राशी दाखविणे गरजेचे असते. नोंदी होत नसल्याने इंकमटॅक्सबद्दलच्या कामांना अडथळा येत आहे. बँकेच्या एटीएममध्ये शनिवार, रविवारला रोकड उपलब्ध नसतेच. मात्र हप्त्यातून कित्येकदा रविवारला रोकड उपलब्ध नसतेच. हप्त्यातून कित्येकदा कधी लिंक फेल तर कधी आऊट आॅफ कॅशचा बोर्ड लावला असतो. बँकेला स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर कुठेही दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. येथील शाखा व्यवस्थापक निनावे यांना वेळोवेळी या समस्यांबद्दल माहिती देऊनही ते काहीही उपाययोजना करीत नसल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. बँकेत सुव्यवस्था यावी यासाठी देणावघेवाणीचे दोन वेगळे काऊंटर, पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि ग्राहकांच्या सोईसाठी कार्यालयीन दिवशी खाते पुस्तकावर प्रिटींगची व्यवस्था करण्याची मागणी बाजीराव तुळशीकर, पी.एस. कांबळे, मन्साराम शहारे, ए.के. नखाते, श्रीकांत मानकर, गोपाल मळकाम, शीतल गायमुखे, रंजना जंगम, शंकर किरसान, मदन मेश्राम, श्रीहरी राऊत, जे.एच. खुणे यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)