शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

हलबीटोल्यातील तणाव निवळला

By admin | Updated: May 14, 2016 01:46 IST

धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या सालेकसानजीकच्या हलबीटोला या गावाला दलित विरूद्ध इतर सर्व गावकरी असा समाज विभाजीत करून

सालेकसा : धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या सालेकसानजीकच्या हलबीटोला या गावाला दलित विरूद्ध इतर सर्व गावकरी असा समाज विभाजीत करून जातीय सलोखा भंग करण्याचा प्रयत्न काही समाजकटंक लोक करीत होते. परंतु तहसीलदार प्रशांत सांगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी औटी यांच्या स्वयं तत्परतेमुळे गावात तनावाचे वातावरण होत असताना सर्वत्र शांतता व जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व गावकरी एकतेने राहण्यासाठी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून काही लोक गावात जातीभेद निर्माण करून आपला हेतू साधण्याचा प्रयत्न करीत होते. १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दलित बांधवांनी शाळेच्या परिसरात पंचशील ध्वज उभारून आपला कार्यक्रम घेतला. यावेळी सालेकसा वरून बाबासाहेबाचे अनुयायी रॅलीसह त्या ठिकाणी हजर झाले होते. त्या कार्यक्रमानंतर काही लोकांनी ते ध्वज हटविण्यासाठी अप्रत्यक्ष दलित समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात कोणी सामोर येऊ शकले नाही. चार-पाच दिवसांपूर्वी त्या लोकांनी दलित समाजाला गावातील इतर समाजापासून दूर ठेवून बहिष्कृत करण्याचा डाव मांडला. एवढेच नाहीतर सामाजिक, मांगलिक कार्यक्रमात दलितांना दूर ठेवावे असाही डाव रचला, परंतु याला गावातील अनेक समजदार लोकांचा विरोध होता. दरम्यान १२ मे च्या रात्री अज्ञात लोकांनी पंचशील ध्वज काढून टाकला. त्यामुळे लगेच सकाळी दलित बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व काही लोकांच्या विरोधात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतर सर्व गावकरीसुद्धा पोलीसात जाण्यासाठी निघाले. यातून तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. काहीसमाज कटंक व विकृत बुद्धीचे लोक गावात जातीभेद निर्माण करून आपले हित साधण्यासाठी गावातील शांतता व सलोखा भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब लक्षात येताच तहसीलदार सांगळे, ठाणेदार औटी, दलित नेते खेमराज साखरे व गावातील समजदार लोकांनी प्रकरण मिटविण्याचा दिशेने प्रयत्न केला. शेवटी सर्वानी माघार घेतली आणि गाव शांत झाले. ‘त्या’ जागेची परवानगी घेतली नव्हती १४ एप्रिल रोजी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्याला गावकºयांची सहमती होती. त्या कार्यक्रमाला इतरही समाजबांधव हजर होते. परंतु कार्यक्रमानंतर पंचशील ध्वज काढण्यात आला नाही. तर ठिकाणी डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल अशी चर्चा गावात होती. त्यामुळे काही लोक विरोध करू लागले होते. शासकीय जागेवर पुतळा उभारण्यापूर्वी शासनाची परवानगी घेऊन अटींची पूर्तता करावी लागते. परंतु पंचशील ध्वज उभारण्यापूर्वी किंवा नंतर परवानगी घेण्यात आली नव्हती. ही बाब दलित बांधवांच्या ध्यानात आणून अधिकाºयांनी समजून घातली.