शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी युवक-युवतींनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:35 IST

माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता ...

सहषराम कोरोटे : धुर्व गोंड समाजाची १७ जोडपी विवाहबद्धदेवरी : माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरिता रोजगाराच्या शोधात इतरत्र कुठेही न भटकता आदिवासी समाजातील युवक-युवतींनी गावातच लहान-लहान लघु उद्योग उभारावे. आपले आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावे. आपण स्वत: आत्मनिर्भर झालो तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आपला आदिवासी समाज हा प्रगतीपथाकडे वाटचाल करेल. एक विकसीत समाज म्हणून लोक आपल्या समाजाकडे पाहतील. यासाठी आपल्या समाजाचा सर्वांगिण विकास आणि समाजाची आर्थिक बाजू मजबूत करायची असेल तर आदिवासी समाजातील युवक-युवतींनी लहान लघु उद्योग सुरू करून स्वयंरोजगाराकडे आपली वाटचाल करावी, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले. ते शनिवार (दि.२२) देवरी तालुक्यातील धामनझोरी-धमदीटोला (घोनाडी) येथे पार पडलेल्या आदिवासी धुर्व गोंड समाजाच्या १७ जोडप्याच्या आदर्श सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते. उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी दीप प्रज्ज्वलन ओराडबांधचे समाज महासभाचे अध्यक्ष धन्नुलाल उईके यांनी केले. धुर्व समाज धमधागडचे केंद्रीय अध्यक्ष एम.डी. ठाकूर, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, जि.प. सदस्य अलताफ हमिद, डीआरडीए सदस्य हरिचंद उईके, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, उपाध्यक्ष धनपत भोयर, अमित विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी. रामटेके, सरपंच अंतकला वाढई, ग्रा.पं. सदस्य उदाराम धानगाये, माजी उपसभापती इंदल अरकरा, सुधाकर कोकोडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश राऊत, समाजाचे जिल्हा सचिव राधेलाल सलामे, जिल्हा सदस्य रामेश्वर पदाम यांच्यासह गावागावातून शेकडोच्या संख्येत आदिवासी समाजातील महिला पुरुष व युवक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी १७ विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांना मंगलमय सांसारिक जीवनाच्या त्यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. कोरोटे पुढे म्हणाले, आजच्या दैनंदिन महागाईच्या जीवनकाळात आदिवासी समाजातील लोकांना आपले श्रम, धन व वेळेची बचत करायचे असेल तर आपल्या मुलामुलींचे लग्न अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्यात करावे. ही आजच्या काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान आ. संजय पुराम, एम.डी. ठाकूर, धन्नुलाल उईके, इंदल अरकरा, भरतसिंग दुधनाग, हरिचंद उईके आदींनी उपस्थितांना समायोजित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक माजी पं.स.सदस्य सोनू नेताम यांनी मांडले. संचालन पंचराम मडावी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)