शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी,भटके मागासवर्गीयांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:40 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष पूर्ण होऊनही स्वातंत्र्य, समता,न्याय हक्कापासून आजही गरीब आदिवासी माणूस किंवा गैरआदिवासी दूर आहे.आदिवासींना अद्यापही माणूस समजून काही भागात वागणूक दिली जात नाही.

ठळक मुद्देउषाकिरण आत्राम : ५०० हून अधिक कवितांचे लेखन, ३२ वर्षांचा साहित्य प्रवास

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष पूर्ण होऊनही स्वातंत्र्य, समता,न्याय हक्कापासून आजही गरीब आदिवासी माणूस किंवा गैरआदिवासी दूर आहे.आदिवासींना अद्यापही माणूस समजून काही भागात वागणूक दिली जात नाही. हे स्वतंत्र भारतातील लोकशाहीचे करंडेपण आणि दुर्भाग्यच असल्याचे महाराष्ट्रातील प्रथम आदिवासी कथाकार व कवयित्री उषाकिरण आत्राम यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.उषाकिरण आत्राम म्हणाल्या, जगात भारताचा महासत्ता म्हणून गौरव होतो. हजारो योजनांची घोषणा केली जाते. पण यानंतरही आदिवासी, गरीब भटके, मागासवर्गीयांचे पात्र मात्र कोरडेच दिसून येते. आजही अनेक ठिकाणी लोकांना दोन वेळचे चांगले जेवण अन राहायला झोपडी नाही. स्त्रीया सुरक्षित नाही.न्याय, समता, स्वातंत्र्य त्यांचेकडे पाठ फिरवून आहे. त्याकडे डोळे उघडे ठेवून समाजाने प्रत्येक माणसाने, प्रशासनाने पहावे व त्यांचा दाबलेला आवाज किंकाळ्या आक्रोश ऐकावा. त्यांना न्याय द्यावा त्यांनाही आनंदाने जीवन जगू द्या, खोट्या प्रतिज्ञा घेवू नका, दुखी कष्टी शोषीत पिडीतांचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करावे हेच भारताला महासत्ता म्हणून गौरव करणारे ठरेल,अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शोषीत पिडीत आदिवासी समाजाचे वास्तव्य आपल्या लेखनीच्या माध्यमातून जगासमोर ठेवणाऱ्या उषाकिरण आत्राम यांनी आपल्या ३२ वर्षाच्या साहित्य प्रवासात शेकडो कविता आणि कथा नाटक इत्यादी रचना केला. त्यांनी आपल्या काव्य रचनेत आणि कथा संग्रहात आदिवासी समाजाचे जीवन दर्शन, त्यांचे प्रकृती प्रेम, पर्यावरण रक्षणासाठी पाळणारे नियम त्यातल्या त्यात उच्चवर्णीय लोकांनी आदिवासी समाजावर केलेले अत्याचार स्त्रीयांवरील अत्याचार व शोषण याबाबत अनेक ठिकाणातील जीवंत उदाहरणसह आपल्या साहित्य रचनेत उल्लेख केला आहे. त्याचे कथा संग्रह आणि कविता नांदेड, पुणे, मुंबई, अमरावती विद्यापीठात शिकविले जात आहेत.त्यापूर्वी लातूर, जळगाव विद्यापीठातून सुध्दा कविता शिकविण्यात आल्या. काही कविता बालभारतीने सुध्दा स्विकारल्या. राज्य शिक्षण मंडळात दहाव्या वर्गाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील अभ्यासक्रमात सुध्दा लेख आणि कवितांचा समावेश झालेला आहे. मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील असणाºया उषाकिरण आत्राम यांनी सेवानिवृत्तीनंतर सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथे मागील सहा वर्षापासून स्थायी झाल्या आहेत. त्यांनी धनेगाव येथे आदिवासी भाषा संशोधन व विकास प्रकल्प स्थापन केला आहे. अतिप्राचीन गोंडी भाषा पुनर्जिवीत करण्यासाठी सतत धडपड करीत आहेत.गोंडी भाषेला केंद्र शासनाच्या आठव्या अनुसूचीमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी अनेकदा दिल्लीत जाऊन पाठपुरावा केला. १९७७ मध्ये ‘आई’ नावाच्या कवितेच्या रचनेपासून आपला साहित्य प्रवास सुरु केला. ग्रामसेविका म्हणून प्रथम शासकीय नोकरी एटापल्ली सारख्या सुदूर जंगल क्षेत्रात जाऊन केली. पुढे बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि खंडविकास विकास अधिकारी म्हणून जवाबदारी पार पाडली.पण या दरम्यान त्यांचा साहित्य प्रवास अविरत सुरू राहिला. आतापर्यंत त्यांनी ५०० पेक्षा जास्त कविता लिहिल्या असून या कविता मराठी गोंडी आणि हिंदी भाषेत सुध्दा आहेत. शेकडो लेख व कथा आणि नाटकांची सुध्दा रचना त्यांनी केलेली आहे. त्यांचे पती सुन्हेरसिंह ताराम एका मासिकाचे संपादक होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांचे हद्य विकाराने निधन झाले. आज त्या एकट्या पडल्या असल्यातरी त्यांनी आपल्या लेखनात खंड पडू दिला नाही. तर पतीचे अर्धवट असलेले लेखन कार्य पूर्ण करण्यासाठी ही त्या परिश्रम घेत आहेत.