शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:20 IST

दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : झरपडा येथील मिश्र रोपवनाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे. वातावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी गावाशेजारील जंगल कायम ठेवण्यासह वृक्ष संवर्धनासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया झरपडा येथील मिश्र रोपवनाला भेट देवून पाहणी करताना ग्रामस्थांशी हितगुज साधताना ते बोलत होते.अर्जुनी-मोरगाव वनविभागाच्या वतीने २०१७ मध्ये झरपडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने १५ हे.आर. क्षेत्रामध्ये मिश्र रोपवनाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये जुलै महिन्यात विविध प्रजातींच्या लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अल्पावधीतच रोपट्यांची वाढ झालेली दिसत आहे. निसर्गरम्य वातावरण निर्मितीचा देखावा असलेल्या मिश्र रोपवनाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देवून रोपवनाची पाहणी केली.यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, कंत्राटदार तथा खरेदी विक्री समितीचे संचालक विनोद नाकाडे, अर्जुनी नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय कापगते, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, झरपडाचे नवनिर्वाचित सरपंच कुंदा डोंगरवार, वनसमितीचे अध्यक्ष मुन्नालाल बोरकर, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी वनविभागाचे क्षेत्र सहायक एच.टी. खडसे, बरडे, पी.के. ब्राम्हणकर, जे.जी. नागपुरे, बी.एच. सुलाखे, एस.एन. पंधरे यांनी रोपवनाची माहिती पालकमंत्र्यांना दिली.रोपवनातील वृक्षांची झालेली वाढ पाहून ना. बडोले यांनी समाधान व्यक्त केला. तसेच वृक्ष संवर्धनासाठी जनतेने स्वयंप्रेरणेने पुढे यावे, असे आवाहन केले.