शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:20 IST

दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : झरपडा येथील मिश्र रोपवनाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन ढासळत आहे. अवैध वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी होते. मानवाच्या आरोग्यासाठी आल्हाददायक नैसर्गिक वातावरण फार निकडीचे झाले आहे. वातावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी गावाशेजारील जंगल कायम ठेवण्यासह वृक्ष संवर्धनासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया झरपडा येथील मिश्र रोपवनाला भेट देवून पाहणी करताना ग्रामस्थांशी हितगुज साधताना ते बोलत होते.अर्जुनी-मोरगाव वनविभागाच्या वतीने २०१७ मध्ये झरपडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने १५ हे.आर. क्षेत्रामध्ये मिश्र रोपवनाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये जुलै महिन्यात विविध प्रजातींच्या लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अल्पावधीतच रोपट्यांची वाढ झालेली दिसत आहे. निसर्गरम्य वातावरण निर्मितीचा देखावा असलेल्या मिश्र रोपवनाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देवून रोपवनाची पाहणी केली.यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, कंत्राटदार तथा खरेदी विक्री समितीचे संचालक विनोद नाकाडे, अर्जुनी नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय कापगते, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, झरपडाचे नवनिर्वाचित सरपंच कुंदा डोंगरवार, वनसमितीचे अध्यक्ष मुन्नालाल बोरकर, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी वनविभागाचे क्षेत्र सहायक एच.टी. खडसे, बरडे, पी.के. ब्राम्हणकर, जे.जी. नागपुरे, बी.एच. सुलाखे, एस.एन. पंधरे यांनी रोपवनाची माहिती पालकमंत्र्यांना दिली.रोपवनातील वृक्षांची झालेली वाढ पाहून ना. बडोले यांनी समाधान व्यक्त केला. तसेच वृक्ष संवर्धनासाठी जनतेने स्वयंप्रेरणेने पुढे यावे, असे आवाहन केले.