शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

मुलींनाही मुलांच्या बरोबरीने वागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:03 IST

वंशाचा दिवा, म्हातारपणाचा आधार म्हणून मुलांना उच्च शिक्षण व समृद्ध करण्याची समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणारी आहे, असा समाजाचा गैरसमज आहे. मुलींनाही उच्च शिक्षण देऊन ती स्वत:च्या पायावर उभी राहील, ....

ठळक मुद्देमंजुषा चंद्रिकापुरे : जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थाटात

ऑनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : वंशाचा दिवा, म्हातारपणाचा आधार म्हणून मुलांना उच्च शिक्षण व समृद्ध करण्याची समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणारी आहे, असा समाजाचा गैरसमज आहे. मुलींनाही उच्च शिक्षण देऊन ती स्वत:च्या पायावर उभी राहील, अशी वागणूक मिळायला हवी. मुलगी माहेरी व सासरी अशा दोन्ही ठिकाणी रममान होऊन ती कुटुंबाचा आधार बनते. मुलगा-मुलगी असा भेदभाव करु नका. दोघांनाही बरोबरीने वागवा, असे मत सेवानिवृत्त प्राचार्य मंजुषा चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.स्थानिक प्रसन्न सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.उद्घाटन नवेगावबांध येथील आर.पी. पुगलिया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रितू राणा (सावजी नागपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इंजिनियरिंग अ‍ॅण्ड रिसर्च नागपूरच्या प्रा. दिव्या चंद्रिकापुरे, पं.स. सदस्य सुशीला हलमारे, नगरसेविका उर्मिला जुगनाके, नवेगावबांधच्या मनिषा तरोणे, चित्रलेखा मिश्रा, मालन दहीवले, अरुणा मेश्राम, माधुरी पिंपळकर, वनिता मेश्राम उपस्थित होत्या.चंद्रिकापुरे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांच्या संरक्षणार्थ कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. महिलांच्या अनेक कौटुंबिक समस्या असतात. त्या चव्हाट्यावर येण्यापूर्वीच त्यांचा सोक्षमोक्ष लागावा, या दृष्टीने महिला अन्याय-अत्याचार समितीची स्थापना करुन वेळीच निराकरण झाले पाहिजे. महिलांनी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी शिक्षणाची कास धरावी. जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात महिला अबला नको तर ती सबला बनली पाहिजे. शासनानेही महिला सबलीकरणाकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात महिलांविषयक कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार झाला पाहिजे. जेणेकरुन महिलांना आपले अधिकार व कर्तव्याची जाणीव होईल. कायद्याच्या या माहितीमुळे ती आणखीच प्रगल्भ होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.मंगला गडकरी यांनी स्त्रियांसमोरील आव्हाणे, भ्रूणहत्या, महिलांवरील अन्याय व अत्याचार याविषयी परखड भूमिका मांडून मार्गदर्शन केले.मुलींच्या विकासाकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. मुलीच्या मनात भीतीचे भाव बालवयापासूनच रुजविले जातात. त्यांना निर्भयतेने जागवून खंबीरपणे तिच्या पाठीशी राहा. स्त्री ही स्त्रीचीच वैरी असते. सासू हीसुद्धा एक महिलाच असते. तरी सुद्धा सासू व सूनांमध्ये मतभेद निर्माण होऊन वाद कसे विकोपाला जातात. मुलींना अबोल ठेवू नका, येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य तिच्यात निर्माण करा. स्त्रिचा मानसन्मान ठेवण्याचे तिला धडे द्या, असे म्हणाल्या.डॉ. रितू राणा सावजी यांनी काही घडलेल्या घटनांचे दाखले दिले. त्यांनी मुलींचा विकास तसेच महिलांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.संचालन इंद्रकला रामटेके यांनी केले. आभार पद्मजा मेंहदळे यांनी मानले. कार्यक्रमात शेकडो महिला उपस्थित होत्या.