शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

बैठकीत अडकली पर्यटन संकुलाची गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:17 IST

येथील प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. हीच बाब ओळखत पर्यटक संकुल विकासासाठी शासनाने सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र यानंतरही पर्यटन संकुल परिसरातील विकास कामांना सुरूवात झाली नसून केवळ आढावा बैठकीत पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी अडकल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देचार वर्षांपासून केवळ घोषणाच : पर्यटकांचा हिरमोड, महसूलावर परिणाम

रामदास बोरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. हीच बाब ओळखत पर्यटक संकुल विकासासाठी शासनाने सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र यानंतरही पर्यटन संकुल परिसरातील विकास कामांना सुरूवात झाली नसून केवळ आढावा बैठकीत पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी अडकल्याचे चित्र आहे.मागील वर्षी २० जुलैला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यानातील लॉगहट विश्राम गृहावर राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराच्या विकासासंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीला जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पर्यटन समिती गोंदिया यांच्यासह वन विभाग, महसूल, वन्यजीव संरक्षण, पाटबंधारे, बांधकाम, वनविकास महामंडळ, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थिती होते. पर्यटन संकुल परिसरातील ज्या स्थळांचा विकास करायचा आहे. त्या परिसराची पाहणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देवून केली होती.तसेच विकास कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र यानंतरही विकास कामांना सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे.आंदोलनानंतर हालचालींना सुरूवातनवेगावबांध पर्यटक संकुल परिसरातील विकास कामांना त्वरीत सुरुवात करण्यात यावी.यासाठी नवेगावबांध फाऊंडेशनने भिक मांगो आंदोलनाचा पवित्रा घेतला. पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर शासनाने याची दखल घेत ४.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. जिल्हा नियोजन समितीने १.२५ कोटी, वन विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.५० कोटीचा आराखडा कागदावरचनवेगावबांध येथील पर्यटक संकुल परिसरात थॉयलंडच्या धर्तीवर वन्यजीव विभागाच्या अनुसूची क्रमांक १ ते ५ मधील वन्यप्राणी वगळून प्राणी संग्रहालय उभारणे, शेगावच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणे, प्रवेशद्वारापासून ते संकुल परिसरापर्यंत दुतर्फा शोभीवंत वृक्षाची लागवड करणे, गाव तिथे क्रीडांगण योजनेतून विशेष बाब म्हणून क्रीडांगण तयार करणे, इंटरप्रिटीशन हाल, तलावाशेजारी बीच, हनुमान मंदिराच्या पायथ्याशी जलतरण तलाव, संजय कुटी, परिसरात ३ कि.मी.ची मिनी ट्रेन, रोपवे तयार करणे, तसेच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मनोहर उद्यान, हिलटॉप गार्डन, वैभव गार्डन, हॉली डे होम्स गार्डन यांचे नुतनीकरण व सुशोभीकरण, बालोद्यानचे पुनर्रजीवन, सध्या जीर्र्णावस्थेत असलेल्या रॉक गार्डन कॉन्फरन्स हॉलचे नुतणीकरण करण्यासाठी बैठकीत ५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र यासर्व गोष्टी अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या परिसरातील जनतेला दिलेला शब्द ते पाळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.निधीतून ही कामे होती प्रस्तावितनवेगावबांध पर्यटक संकुल परिसराच्या विकासात भर घालण्यासाठी प्रवेशद्वार, इंटरप्रिटीशन हॉल, सार्वजनिक शौचालय, पार्र्कींग, नैसर्गिक पायवाट, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, रस्ते, लॉन, गार्डन, पथरस्ता, बैठक व्यवस्था, जुन्या बगीच्यांचा जिर्णोध्दार, साहसी खेळ, जॉबींग बॉल, रोपवे, विश्रामगृह आदी विकास कामे ८ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित होता. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी कधी निवडणूक आचार संहिता तर कधी प्रशासकीय मंजुरीचे कारण सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही.बांधकाम विभागाचे वेळकाढू धोरणनवेगावबांध पर्यटन संकुल परिसरासाठी २०१७ मध्ये मंजूर झालेल्या निधीतून ६० लाख रुपयांचा निधी रोपवेकरीता आला आहे. कोलपहाडी ते जेटीपार्इंट रोपवेचा निधी मंजूर होऊनही वर्षभराचा कालावधी लोटूनही प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली नाही. तसेच हिलटॉप विश्रामगृहासाठी मंजूर झालेला १ कोटी २० लाख रुपयांचा निधी बांधकाम विभागाला २०१७ मध्ये हस्तांतरीत करुनही बांधकाम विभागाने कामाला सुरूवात केली नाही.तर संयुक्त वन व्यवस्थापन समितीची गरज काय?संयुक्त वन व्यवस्थापन समितीने नवेगावबांध पर्यटक संकुल परिसराच्या विकास कामांना घेवून मागील ७ ते ८ वर्षांपासून अनेक प्रस्ताव वन विभागाकडे पाठविले. मात्र वनविभागाने अद्यापही या प्रस्तावांना मंजुरी दिली नाही. विकास कामांचा निधी मंजूर असताना गोंदिया उपवनसंरक्षक कार्यालयाने या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी दिली नाही. त्यामुळे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची गरज काय असा संप्तत सवाल समितीचे पदाधिकारी विजय डोये, सरपंच अनिरुध्द शहारे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले