शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

बैठकीत अडकली पर्यटन संकुलाची गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:17 IST

येथील प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. हीच बाब ओळखत पर्यटक संकुल विकासासाठी शासनाने सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र यानंतरही पर्यटन संकुल परिसरातील विकास कामांना सुरूवात झाली नसून केवळ आढावा बैठकीत पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी अडकल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देचार वर्षांपासून केवळ घोषणाच : पर्यटकांचा हिरमोड, महसूलावर परिणाम

रामदास बोरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. हीच बाब ओळखत पर्यटक संकुल विकासासाठी शासनाने सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र यानंतरही पर्यटन संकुल परिसरातील विकास कामांना सुरूवात झाली नसून केवळ आढावा बैठकीत पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी अडकल्याचे चित्र आहे.मागील वर्षी २० जुलैला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यानातील लॉगहट विश्राम गृहावर राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराच्या विकासासंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीला जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पर्यटन समिती गोंदिया यांच्यासह वन विभाग, महसूल, वन्यजीव संरक्षण, पाटबंधारे, बांधकाम, वनविकास महामंडळ, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थिती होते. पर्यटन संकुल परिसरातील ज्या स्थळांचा विकास करायचा आहे. त्या परिसराची पाहणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देवून केली होती.तसेच विकास कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र यानंतरही विकास कामांना सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे.आंदोलनानंतर हालचालींना सुरूवातनवेगावबांध पर्यटक संकुल परिसरातील विकास कामांना त्वरीत सुरुवात करण्यात यावी.यासाठी नवेगावबांध फाऊंडेशनने भिक मांगो आंदोलनाचा पवित्रा घेतला. पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर शासनाने याची दखल घेत ४.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. जिल्हा नियोजन समितीने १.२५ कोटी, वन विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.५० कोटीचा आराखडा कागदावरचनवेगावबांध येथील पर्यटक संकुल परिसरात थॉयलंडच्या धर्तीवर वन्यजीव विभागाच्या अनुसूची क्रमांक १ ते ५ मधील वन्यप्राणी वगळून प्राणी संग्रहालय उभारणे, शेगावच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणे, प्रवेशद्वारापासून ते संकुल परिसरापर्यंत दुतर्फा शोभीवंत वृक्षाची लागवड करणे, गाव तिथे क्रीडांगण योजनेतून विशेष बाब म्हणून क्रीडांगण तयार करणे, इंटरप्रिटीशन हाल, तलावाशेजारी बीच, हनुमान मंदिराच्या पायथ्याशी जलतरण तलाव, संजय कुटी, परिसरात ३ कि.मी.ची मिनी ट्रेन, रोपवे तयार करणे, तसेच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मनोहर उद्यान, हिलटॉप गार्डन, वैभव गार्डन, हॉली डे होम्स गार्डन यांचे नुतनीकरण व सुशोभीकरण, बालोद्यानचे पुनर्रजीवन, सध्या जीर्र्णावस्थेत असलेल्या रॉक गार्डन कॉन्फरन्स हॉलचे नुतणीकरण करण्यासाठी बैठकीत ५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र यासर्व गोष्टी अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या परिसरातील जनतेला दिलेला शब्द ते पाळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.निधीतून ही कामे होती प्रस्तावितनवेगावबांध पर्यटक संकुल परिसराच्या विकासात भर घालण्यासाठी प्रवेशद्वार, इंटरप्रिटीशन हॉल, सार्वजनिक शौचालय, पार्र्कींग, नैसर्गिक पायवाट, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, रस्ते, लॉन, गार्डन, पथरस्ता, बैठक व्यवस्था, जुन्या बगीच्यांचा जिर्णोध्दार, साहसी खेळ, जॉबींग बॉल, रोपवे, विश्रामगृह आदी विकास कामे ८ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित होता. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी कधी निवडणूक आचार संहिता तर कधी प्रशासकीय मंजुरीचे कारण सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही.बांधकाम विभागाचे वेळकाढू धोरणनवेगावबांध पर्यटन संकुल परिसरासाठी २०१७ मध्ये मंजूर झालेल्या निधीतून ६० लाख रुपयांचा निधी रोपवेकरीता आला आहे. कोलपहाडी ते जेटीपार्इंट रोपवेचा निधी मंजूर होऊनही वर्षभराचा कालावधी लोटूनही प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली नाही. तसेच हिलटॉप विश्रामगृहासाठी मंजूर झालेला १ कोटी २० लाख रुपयांचा निधी बांधकाम विभागाला २०१७ मध्ये हस्तांतरीत करुनही बांधकाम विभागाने कामाला सुरूवात केली नाही.तर संयुक्त वन व्यवस्थापन समितीची गरज काय?संयुक्त वन व्यवस्थापन समितीने नवेगावबांध पर्यटक संकुल परिसराच्या विकास कामांना घेवून मागील ७ ते ८ वर्षांपासून अनेक प्रस्ताव वन विभागाकडे पाठविले. मात्र वनविभागाने अद्यापही या प्रस्तावांना मंजुरी दिली नाही. विकास कामांचा निधी मंजूर असताना गोंदिया उपवनसंरक्षक कार्यालयाने या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी दिली नाही. त्यामुळे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची गरज काय असा संप्तत सवाल समितीचे पदाधिकारी विजय डोये, सरपंच अनिरुध्द शहारे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले