शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्थेचे वाजले बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:31 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत.

ठळक मुद्देवाहनात बसून ट्राफिक कंट्रोल : वाहतुकीच्या कोंडीने शहरवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. परिणामी शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहन चालक आणि पादचारी नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.हावडा मुंबई मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानक आणि विदर्भाची मिनी मुंबई म्हणून ओळखले जाणारे गोंदिया शहर वाहतूक व्यवस्थेसाठी मात्र तितकेच चर्चेत असते. शहरातील अस्थाव्यस्त वाहतुकीमुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागते. यावरुन शहरातील वाहतूक व्यवस्था किती सुरळीत आणि चांगली आहे याची प्रचिती येते.गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, गांधी प्रतिमा, नेहरु चौक, गंज वॉर्ड भाजीबाजार परिसरात शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. शिवाय याठिकाणी चंद्रपूरपासून ते बालाघाटपर्यंतचे नागरिक विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी येथे दररोज येतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वर्दळ असते. मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर आधीच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेकदा या परिसरात वाहतुकीची कोंडी होती. त्याचा मनस्ताप शहरवासीय आणि वाहन चालकांना सहन करावा लागतो. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर नागरिकांचा गदरोळ उडतो तेव्हा दूरवर उभे असलेले वाहतूक पोलीस वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोहचतात.मात्र तोपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे राहून हा सर्व प्रकार पाहत असतात. आता तर वाहतूक नियंत्रण विभागाने नवीनच प्रयोग सुरू केला.शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी वाहनात बसून ट्राफीक कंट्रोल करण्यास सुरूवात केली. वाहनात बसून ट्राफीक कंट्रोल करणाऱ्यांना रस्त्यावरुन चालणाºया पादचारी नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा किती त्रास होतो हे कसे कळणार हा सुध्दा विचार करणार प्रश्न आहे.अनेकांनी यावर विनोद देखील केला.एकंदरीत शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहे.वन वे पार्किंगचा प्रयोग फसलाशहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने नागपूरच्या धर्तीवर वन वे पार्किंगचा प्रयोग राबविला होता. मात्र यात देखील सातत्याने ठेवण्यात वाहतूक नियंत्रण विभागाला अपयश आले. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत वन वे पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाºया वाहनाची स्थिती पाहता हे फलक केवळ नावापुरतेच ठरत आहे.वाहतूक पथदिवे बंदवाहतूक नियंत्रण विभागाने बऱ्याच वर्षांनंतर शहरातील वाहतूक पथदिवे सुरू केले होते. मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्ती प्रश्न निर्माण झाल्याने वाहतूक पथदिवे सुध्दा बंद पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.पोलीस अधीक्षक दखल घेणार का?शहरातील विस्कळीत वाहतुकीची घडी सुधारण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दखल घेवून सुधारणा करतील का असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभाग यावर काय तोडगा काढतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस