शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

शहरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:13 IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.

ठळक मुद्देजुना उड्डाणपूल बंद केल्याचा फटका : नवीन पुलावर अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. तर नवीन उड्डाणपुलावरुन जड वाहतुकीला बंदी असताना सुध्दा जडवाहने पुलावरुन सुसाट धावत होते. त्यामुळे या पुलावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.शहरातील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोनदा जिल्हा प्रशासनाने दिले. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलीत यावर उपाय योजना करण्यास सुरूवात केली. जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद केल्यास त्याला पर्यायी सुविधा काय, अथवा या पुलावरुन हलकी वाहने जाऊ द्यायची याबाबत सार्वजनिक बांधकाम, वाहतूक नियंत्रण आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या उड्डाणपुलावरुन हलकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले.जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहने जावू नये, यासाठी हाईट बॅरियर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मंगळवारी (दि.१४) दिवसभर हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पुलाची काही ठिकाणी दुरूस्ती सुध्दा करण्यात आली. मात्र जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसला.वाहन चालकांना नवीन उड्डाणपुलावरुन वळसा घेवून जयस्तंभ चौक, नेहरु चौकाकडे जावे लागले. त्यामुळे नेहरुचौक व जयस्तंभ चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. त्यातच नगर परिषदेतर्फे शहरातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही मार्ग बंद आहे.यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली. दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.नवीन पूल नावापुरताचजुन्या उड्डाणपुलाला पर्याय म्हणून दोन वर्षांपूर्वी गोंदिया बालाघाट मार्गावर ५४ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र या पुलाचे बांधकाम करताना तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने ५४ कोटी रुपयांचा हा पूल शहरवासीयांसाठी नावापुरताच ठरत आहे. नवीन उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पुलासाठी जागा सोडण्यात आली नाही. तर पुलाचा उतार देखील चुकीचा आहे. त्यामुळे या पुलावरुन जडवाहतुक सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नवीन पुलाचा प्रस्तावजुना जीर्ण तर नवीन उड्डाणपूल सदोष असल्याने गोंदिया बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे. असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्याची चाचपणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे.नियमांना डावलून जडवाहतूक सुरूनवीन उड्डाणपुलावरुन एसटी बसेस, ट्रक, स्कूल बसेस व जडवाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली. पुलाच्या सदोष बांधकामामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या पुलावरुन जड वाहतुक सुरू ठेवू नये, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र मंगळवारी या पुुलावरुन जडवाहतुक सर्रारपणे सुरू होती. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी सुध्दा डोळे बंद करुन पाहत होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी