शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारनगरी होणार भक्तीमय

By admin | Updated: November 2, 2016 00:24 IST

व्यापारनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदियात दि.३ पासून एक आठवडाभर प्रसिद्ध भागवत कथाकार ऋतंभरादेवी यांच्या कथा-ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्यापासून भागवत कथायज्ञ : साध्वी ऋतंभरादेवींचे सप्ताहभर बोधामृतगोंदिया : व्यापारनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदियात दि.३ पासून एक आठवडाभर प्रसिद्ध भागवत कथाकार ऋतंभरादेवी यांच्या कथा-ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचे सासरे घनश्याम मसानी यांच्या पुढाकाराने आयोजित या भागवत कथायज्ञामुळे व्यापारनगरी भक्तीमय होणार आहे.कथास्थळी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती देताना संजयसिंग मसानी, विश्व हिंदू परिषदेचे राजू वालिया आणि मधुसूदन अग्रवाल यांनी सांगितले की, हे आयोजन मसानी परिवारातर्फे असले तरी ते केवळ निमित्तमात्र आहेत. वास्तविक हे आयोजन संपूर्ण गोंदियावासीयांचे आहे. शहरवासियांच्या सुख, शांती, समृद्धीसाठी सदर भागवत कथा आयोजित केली आहे. देशातील विविध समाजात दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी, कुटुंबातील आंतरिक क्लेष, तणाव कमी करून आपल्या संस्कृतीची ओळख समाजाला व्हावी यासाठी हे आयोजन केले जात आहे. भरकटत चाललेल्या नवीन पिढीला योग्य मार्ग दाखविण्याचे काम या कथायज्ञातून केले जाणार आहे. त्यामुळे समाजातील सर्व लोकांकडून यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे साध्वी ऋतंभरादेवी यांचे सप्ताहभराचे भागवत विदर्भात पहिल्यांदाच होत असल्यामुळे गोंदियावासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात सदर भागवत चालणार आहे.जिल्हाभरातील आणि बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना कथास्थळी पोहोचविण्यासाठी शहरात काही विशिष्ट ठिकाणी वाहनांचीही व्यवस्था केली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)- वैशिष्टयपूर्ण कथामंडपगोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन यार्डसमोरील घाट रोडवर बनविलेल्या ‘वृंदावनधाम’मध्ये हा भागवत कथायज्ञ होणार आहे. यासाठी ९० बाय ३५० फुटांचा मुख्य मंडप (डोंब) राहणार आहे. त्यात १२ हजार लोक एकाचवेळी बसू शकतील. तसेच दोन्ही बाजुंनी ४५ बाय ३५० फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. त्यात भाविकांनी कथाकार ऋतंभरादेवींना जवळून पाहता यावे यासाठी एलईडी टीव्हीसुद्धा लावले जाणार आहेत.कथामंडपाचे वैशिष्ट्य विशेष म्हणजे मंडपच्या आतील दोन्ही बाजुने देशातील विविध राष्ट्रपुरूष, संत-महात्मे आणि देवीदेवतांचे फोटो लावण्यात आले आहेत. राष्ट्रपुरूषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यापासून तर डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंतचे फोटो आहेत.