शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या यार्डात व्यापारावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:08 IST

जुन्या बाजार समितीत अडत्यांना प्रवेश देण्यात आला असतानाच व्यापारावर मात्र बंदी लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देअडत्यांना दिला प्रवेश : सर्वांच्या नजरा १८ तारखेकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुन्या बाजार समितीत अडत्यांना प्रवेश देण्यात आला असतानाच व्यापारावर मात्र बंदी लावण्यात आली आहे. येत्या १८ तारखेला पणन महामंडळाकडे सुनावणी असल्याने त्यातच चित्र स्पष्ट होणार असून, तोपर्यंत मात्र अडत्यांना बाजार समितीत वाहनही घेऊन जाता येणार नसल्याचा नवा नियम बाजार समिती प्रशासनाने लावला आहे.जुन्या बाजार समितीतील व्यापार नव्या यार्डात स्थानांतरीत करण्याच्या विषयाला घेऊन बाजार समिती प्रशासन व अडत्यांमध्ये वाद सुरू आहे. अशातच बाजार समिती प्रशासनाने जुन्या बाजार समितीतील व्यापार नवीन यार्डात स्थानांतरीत केला.या विषयाला घेऊन अडत्यांनी उच्च न्यायालयाकडून परवानगी घेत पणन महमंडळाकडे धाव घेतली होती. पणन महामंडळाने या विषयावर येत्या १८ तारखेला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अडते जुन्या बाजार समितीतच आपला कारभार चालवित होते.असे असताना मात्र, शुक्रवारी (दि.११) सायंकाळपासून जुन्या बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावून अडत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. शनिवारीही (दि.१२) तोच प्रकार घडल्याने अडत्यांनी पणन महामंडळाच्या आदेशाची अवहेलना होत असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान पोलीस ठाण्यात अडते व बाजार समिती पदाधिकाºयांत चर्चा झाली व ठाणेदारांच्या मध्यस्तीने बाजार समिती प्रशासनाने शनिवारी (दि.१२) सायंकाळी प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले होते.सोमवारी (दि.१४) मात्र अडते बाजार समितीत जाण्यासाठी आले असता त्यांना बाजार समितीत जाण्यास परवानगी देण्यात आली मात्र व्यापार करण्यास बंदी करण्यात आली असल्याचे अडत्यांनी सांगीतले. येत्या १८ तारखेला सुनावणी असल्याने तोपर्यंत जुन्या यार्डात अडत्यांना व्यापारावर बंदी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान कुणालाही बाजार समितीच्या आत दुचाकीनेही जाण्यास बंदी करण्यात आली असल्याचे दिसले. त्यामुळे आता येत्या १८ तारखेच्या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.१० ते ५ वाजतापर्यंतच प्रवेशअडत्यांना प्रवेश व व्यापारावर बंदीचा हा वाद सुरू असतानाच बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंतच प्रवेशद्वार उघडे राहणार असल्याचा नवा नियम लावल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी बाजार समितीचे द्वार कधीही बंद केले जात नव्हते. मात्र आता वेळेचे बंधन लावून अडत्यांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे.शेतकºयांची मात्र फसगतअडते व बाजार समितीच्या या वादात मात्र शेतकºयांची फसगत होत आहे. शेतकºयांचा माल बाजार समितीत पडून आहे, मात्र व्यापार बंद असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजार समितीत माल पडून असल्याने उंदरांकडून नुकसान होत आहे. शिवाय व्यापार बंद असल्याने भाव पडत आहेत व यात शेतकºयाचे नुकसान होत आहे. माल पडून असल्याने शेतकºयांना बाजार समितीच्या चकरा माराव्या लागत असल्याचे दिसले.बाजार समितीचे नव्या यार्डात स्थानांतरण झाले आहे. त्यामुळे व्यापार नव्या यार्डात सुरू असून जुन्या यार्डात व्यापार केला जाणार नाही.सुरेश जोशीसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंदिया