शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

जुन्या यार्डात व्यापारावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:08 IST

जुन्या बाजार समितीत अडत्यांना प्रवेश देण्यात आला असतानाच व्यापारावर मात्र बंदी लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देअडत्यांना दिला प्रवेश : सर्वांच्या नजरा १८ तारखेकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुन्या बाजार समितीत अडत्यांना प्रवेश देण्यात आला असतानाच व्यापारावर मात्र बंदी लावण्यात आली आहे. येत्या १८ तारखेला पणन महामंडळाकडे सुनावणी असल्याने त्यातच चित्र स्पष्ट होणार असून, तोपर्यंत मात्र अडत्यांना बाजार समितीत वाहनही घेऊन जाता येणार नसल्याचा नवा नियम बाजार समिती प्रशासनाने लावला आहे.जुन्या बाजार समितीतील व्यापार नव्या यार्डात स्थानांतरीत करण्याच्या विषयाला घेऊन बाजार समिती प्रशासन व अडत्यांमध्ये वाद सुरू आहे. अशातच बाजार समिती प्रशासनाने जुन्या बाजार समितीतील व्यापार नवीन यार्डात स्थानांतरीत केला.या विषयाला घेऊन अडत्यांनी उच्च न्यायालयाकडून परवानगी घेत पणन महमंडळाकडे धाव घेतली होती. पणन महामंडळाने या विषयावर येत्या १८ तारखेला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अडते जुन्या बाजार समितीतच आपला कारभार चालवित होते.असे असताना मात्र, शुक्रवारी (दि.११) सायंकाळपासून जुन्या बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावून अडत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. शनिवारीही (दि.१२) तोच प्रकार घडल्याने अडत्यांनी पणन महामंडळाच्या आदेशाची अवहेलना होत असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान पोलीस ठाण्यात अडते व बाजार समिती पदाधिकाºयांत चर्चा झाली व ठाणेदारांच्या मध्यस्तीने बाजार समिती प्रशासनाने शनिवारी (दि.१२) सायंकाळी प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले होते.सोमवारी (दि.१४) मात्र अडते बाजार समितीत जाण्यासाठी आले असता त्यांना बाजार समितीत जाण्यास परवानगी देण्यात आली मात्र व्यापार करण्यास बंदी करण्यात आली असल्याचे अडत्यांनी सांगीतले. येत्या १८ तारखेला सुनावणी असल्याने तोपर्यंत जुन्या यार्डात अडत्यांना व्यापारावर बंदी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान कुणालाही बाजार समितीच्या आत दुचाकीनेही जाण्यास बंदी करण्यात आली असल्याचे दिसले. त्यामुळे आता येत्या १८ तारखेच्या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.१० ते ५ वाजतापर्यंतच प्रवेशअडत्यांना प्रवेश व व्यापारावर बंदीचा हा वाद सुरू असतानाच बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंतच प्रवेशद्वार उघडे राहणार असल्याचा नवा नियम लावल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी बाजार समितीचे द्वार कधीही बंद केले जात नव्हते. मात्र आता वेळेचे बंधन लावून अडत्यांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे.शेतकºयांची मात्र फसगतअडते व बाजार समितीच्या या वादात मात्र शेतकºयांची फसगत होत आहे. शेतकºयांचा माल बाजार समितीत पडून आहे, मात्र व्यापार बंद असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजार समितीत माल पडून असल्याने उंदरांकडून नुकसान होत आहे. शिवाय व्यापार बंद असल्याने भाव पडत आहेत व यात शेतकºयाचे नुकसान होत आहे. माल पडून असल्याने शेतकºयांना बाजार समितीच्या चकरा माराव्या लागत असल्याचे दिसले.बाजार समितीचे नव्या यार्डात स्थानांतरण झाले आहे. त्यामुळे व्यापार नव्या यार्डात सुरू असून जुन्या यार्डात व्यापार केला जाणार नाही.सुरेश जोशीसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंदिया