शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

प्रेतांनाही भोगाव्या लागतात यातना

By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST

‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर जाताना कळले होते’ ही कवी सुरेश भटांची कविता सुप्रसिद्ध आहे. मात्र बोंडगावदेवी (सुरबन) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन

केशोरी : ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर जाताना कळले होते’ ही कवी सुरेश भटांची कविता सुप्रसिद्ध आहे. मात्र बोंडगावदेवी (सुरबन) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन जाताना प्रेताला मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याची प्रचिती या रस्त्याकडे पाहून आल्याशिवाय राहात नाही.ग्राम पंचायतीच्या कुंभकर्णी झोपाळू वृत्तीमुळे आणि दुर्लक्षित धोरणामुळे बोंडगाव (सुरबन) येथील स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की, पावसाळ्याच्या दिवसात त्या रस्त्यावरून साधे चालणेसुद्धा तारेवरची कसरत आहे.वास्तविक संबंधित ग्रामपंचायतीने रस्ते विकास योजनेंतर्गत गावाला प्राप्त होणाऱ्या अनुदानातून स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण करणे अपेक्षित होते. गेल्या दोन वर्षापूर्वी रोजगार हमी योजनेंतर्गत माती टाकून रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. तेव्हापासून त्या रस्त्यावर साधा मुरुम टाकण्याचे सौजन्य देखील ग्रामपंचायतीने दाखविले नाही. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरापर्यंत पाय रुजतील असा चिखल असतो. त्यामुळे पायी चालणे सुद्धा कठीण होत असते. निधन झालेल्या व्यक्तिला जेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडीवर घेऊन जातात तेव्हा तिरडी धरणाऱ्या चार व्यक्तींना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. आपण पाय कुठे ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. जिथे पाय पडतो तिथे तो फसल्या जातो. तिरडीवरुन प्रेत पडेल की काय अशी भीती तिरडी घेऊन चालणाऱ्या व्यक्तींच्या मनात असते.सरणासाठी लाकडे घेऊन जाणाऱ्या बैलबंडी मोडून तिथेच लागडे ठेवण्याचे प्रसंग अनेकदा ऐकण्यात आले आहेत. डोक्यावर व हाताने लाकडे नेवून सरण रचावे लागत असल्याचे सांगण्यात आले. या रस्त्याच्या कठीण परिस्थितीमुळे अंत्यसंस्कारासाठी जाणे कित्येक लोक टाळत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मनाचा अधिक अंत न पाहता सदर स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)