शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

प्रेतांनाही भोगाव्या लागतात यातना

By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST

‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर जाताना कळले होते’ ही कवी सुरेश भटांची कविता सुप्रसिद्ध आहे. मात्र बोंडगावदेवी (सुरबन) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन

केशोरी : ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर जाताना कळले होते’ ही कवी सुरेश भटांची कविता सुप्रसिद्ध आहे. मात्र बोंडगावदेवी (सुरबन) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन जाताना प्रेताला मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याची प्रचिती या रस्त्याकडे पाहून आल्याशिवाय राहात नाही.ग्राम पंचायतीच्या कुंभकर्णी झोपाळू वृत्तीमुळे आणि दुर्लक्षित धोरणामुळे बोंडगाव (सुरबन) येथील स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की, पावसाळ्याच्या दिवसात त्या रस्त्यावरून साधे चालणेसुद्धा तारेवरची कसरत आहे.वास्तविक संबंधित ग्रामपंचायतीने रस्ते विकास योजनेंतर्गत गावाला प्राप्त होणाऱ्या अनुदानातून स्मशानभूमी रस्त्याचे खडीकरण करणे अपेक्षित होते. गेल्या दोन वर्षापूर्वी रोजगार हमी योजनेंतर्गत माती टाकून रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. तेव्हापासून त्या रस्त्यावर साधा मुरुम टाकण्याचे सौजन्य देखील ग्रामपंचायतीने दाखविले नाही. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरापर्यंत पाय रुजतील असा चिखल असतो. त्यामुळे पायी चालणे सुद्धा कठीण होत असते. निधन झालेल्या व्यक्तिला जेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडीवर घेऊन जातात तेव्हा तिरडी धरणाऱ्या चार व्यक्तींना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. आपण पाय कुठे ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. जिथे पाय पडतो तिथे तो फसल्या जातो. तिरडीवरुन प्रेत पडेल की काय अशी भीती तिरडी घेऊन चालणाऱ्या व्यक्तींच्या मनात असते.सरणासाठी लाकडे घेऊन जाणाऱ्या बैलबंडी मोडून तिथेच लागडे ठेवण्याचे प्रसंग अनेकदा ऐकण्यात आले आहेत. डोक्यावर व हाताने लाकडे नेवून सरण रचावे लागत असल्याचे सांगण्यात आले. या रस्त्याच्या कठीण परिस्थितीमुळे अंत्यसंस्कारासाठी जाणे कित्येक लोक टाळत असल्याचे सांगण्यात येते. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मनाचा अधिक अंत न पाहता सदर स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)