शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जिल्हा विभागात टॉप,गर्ल्स रिझल्टमध्ये रॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे. लोहिया विद्यालयाची कनिष्ठ विद्यालयाची विद्यार्थिनी व्टिकंल संजय उके हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८७ गुण आणि क्रीडाचे पाच गुण असे एकूण ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा रोहित सुरेश कापगते याने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८३ गुण आणि क्रीडाचे ५ असे एकूण ९७. ६० टक्के गुण प्राप्त करीत व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

ठळक मुद्देआता मिशन अ‍ॅडमिशनकडे लक्ष : मागील वर्षीच्या तुुलनेत टक्केवारीत वाढ, ग्रामीण भागातील शाळांची टक्केवारी सुधारली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल स्थानी आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालात सुध्दा मुलींनीच बाजी मारली असून ९६.८६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहे. तर ९३.६३ टक्के मुल उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे नागपूर विभागात गोंदिया जिल्हा टॉप तर रिझल्टमध्ये गर्ल्स रॉक्स ठरल्या आहेत.सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे. लोहिया विद्यालयाची कनिष्ठ विद्यालयाची विद्यार्थिनी व्टिकंल संजय उके हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८७ गुण आणि क्रीडाचे पाच गुण असे एकूण ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा रोहित सुरेश कापगते याने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८३ गुण आणि क्रीडाचे ५ असे एकूण ९७. ६० टक्के गुण प्राप्त करीत व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील भिवरामजी विद्यालयाची श्रेया रहांगडाले हिने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४७७ आणि क्रीडाचे ५ असे ९७.४० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. गोंदिया येथील मनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूलचा विद्यार्थी हर्षीत कटरे यांने ९७.२० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे. तर वडेगाव येथील भिवरामजी विद्यालयाची विद्यार्थिनी कृणाली टेंभरे हिने सुध्दा ९७.२० टक्के गुण घेवून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे.दहावीच्या निकालात यंदा नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल स्थानी आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा सुधारणा झाली आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीत सुध्दा मुलींनीच बाजी मारली असून ९६.८६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.९३.६३ टक्के मुुले उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.२२ टक्के लागला आहे.दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २० हजार ५२९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९७९४ विद्यार्थी तर ९७५३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.६३७१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्तीण झाले. प्रथम श्रेणीत ७८४२ तर व्दितीय प्राविण्य श्रेणीत ४४८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के लागला.मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात २६.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील १४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. तर यंदा यात सुधारणा झाली असून ८७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यंदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा निकाल चांगला लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याचे चित्र आहे.यंदा जिल्ह्याच्या दहावीच्या निकालात सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे आठ तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांची टक्केवारी सुधारली आहे. तर सात हजारपेक्षा अधिक विद्यार्थी हे प्राविण्य क्षेणीत उत्तीर्ण झाले आहे. दर्जेदार शिक्षणासाठी ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शहरातील शाळां महाविद्यालयात दाखल करीत आहेत. त्यातच ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याने ही निश्चित ग्रामीण भागातील पालकांसाठी सुध्दा दिलासादायक बाब आहे. शिक्षण विभागाने सुध्दा थोडे लक्ष दिल्यास यात अधिक सुधारणा होवू शकते.८७ शाळांचा निकाल शंभर टक्केदहावीच्या निकालात यंदा सडक अर्जुनी तालुक्यांने आघाडी घेतली आहे. या तालुक्याचा एकूण निकाल ९७.६९ टक्के लागला आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याचे चित्र आहे. यंदा ८७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ही निश्चित जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.निकालसुधारला व टक्केवारीत वाढच्मागील वर्षी गोंदिया जिल्ह्याचा दहावीचा निकाल ६८.५५ टक्के लागला होता. मात्र यंदा जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के लागला असून २६.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालाची टक्केवारी यंदा सुधारणा झाली आहे. ७८४२ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उर्तीण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल