शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

आज वाजणार शाळेचा पहिला टोला

By admin | Updated: June 26, 2015 01:44 IST

यावर्षीच्या नवीन शालेय सत्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२६) होणार आहे.

गोंदिया : यावर्षीच्या नवीन शालेय सत्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२६) होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वागतोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षीनुसार यंदाही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांत प्रवेशोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोबतच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला असून काही शाळांत गणवेश वाटपही केले जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा दरवर्षी २६ जून रोजी सुरू होतात. शाळेचा हा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी खास असावा व त्यांच्यात शाळेची ओढ निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून सर्व शाळास्तरावर प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार यंदाही जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे त्या माध्यमातून स्वागत केले जाणार आहे. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला आहे. त्यातच आता येत्या ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शासनाने राबविण्याचे ठरविले आहे. अवघ्या राज्यात हा कार्यक्रम राबवून एकही बाळ शाळेत जाण्यापासून वंचित राहू नये यासाठी त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या व्यतिरीक्त मुलांना शाळेची ओढ निर्माण व्हावी यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके व गणवेश दिले जात आहेत. शिवाय मध्यान्ह भोजनाची योजना राबविली जात आहे. (शहर प्रतिनिधी)असे होणार विद्यार्थ्यांचे स्वागतजिल्ह्यातील सर्व शाळेत शुक्रवारी प्रवेशोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रवेशोत्सवांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवकांसह गावकऱ्यांना सहभागी करून घेऊन गावातून प्रवेश दिंडी काढली जाणार आहे. त्यानंतर शाळेत पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व काही शाळांमध्ये गणवेशही दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थाचा खास मेन्यू राहणार आहे. गणवेश वाटप वांद्यातचशिक्षण विभागाने यंदा ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधी मागितला होता. हा निधी विभागाला २२ जून रोजी प्राप्त झाला. तो शुक्रवारी (दि.२६) तालुक्यांना वितरीत केला जाणार आहे. नंतर सोमवारपर्यंत (दि.२९) तो निधी शाळांना वितरीत होणार आहे. असे असतानाही विभागाकडून सर्व शाळांना पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र निधीच येण्याआधीच विद्यार्थ्यांसाठी गणवेश कसे घेणार असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. एकंदर पहिल्या दिवशी गणवेश वाटप वांद्यातच आहे. मात्र अशाही परिस्थितीत काही शाळा गणवेश वाटप करणार असल्याचा अंदाज सर्वशिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी व्यक्त केला.