शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून तिरोडा शहराचा पाणीपुरवठा ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:56 IST

तिराेडा : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्याने ...

तिराेडा : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्याने शहरवासीयांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्याअभावी नागरिक वेजार झाले असून नगर परिषद किवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याचा कुठलीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. शहरवासीयांना पुन्हा दाेन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पाण्यासाठी पुन्हा दोन दिवस भटकंती करावी लागणार आहे. तिरोडा शहरातील अदाजे ३५०० ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे वैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. धापेवाडा उपसा सिंचन योजनेतंर्गत धरणाची दारे बंद केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीस पुरवठा होत नसल्याने तिरोडा शहराचा पाणी पुरवठा मागील आठ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे पाण्याअभावी नागरिक बजार झाले. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता सुनील भांडारकर यांना विचारणा केली असता त्यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीस पाणी पुरवठा होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले. पण येत्या दोन दिवसात शहरवासीयांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

..........

ग्राहकांना पूर्वसूचना देण्याचा विसर

मागील आठ दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात येत नसून याबाबतची कुठलीही पूर्वसूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने ग्राहकांना दिली नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.