शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

तिरोडा, आमगाव, अर्जुनीत शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

गोंदिया : कधी कोरोनामुक्त झालेले जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव तालुका आता पुन्हा कोरोनाग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आजघडीला ...

गोंदिया : कधी कोरोनामुक्त झालेले जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव तालुका आता पुन्हा कोरोनाग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आजघडीला गोंदिया तालुका वगळता सर्वाधिक रुग्ण याच तीन तालुक्यांत आहेत. यामुळे आता या तालुक्यांत धोका वाढत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोना परिस्थितीत हे तालुके ग्रीन झाले होते. यात तिरोडा तालुका कोरोनाचा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट आहे. मात्र, तिरोडा तालुकाही कोरोनामुक्त झाला होता व त्यामुळे आता जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार असे वाटत होते. मात्र, राज्यात कोरोना फोफावू लागला असतानाच जिल्ह्यातही दररोजच्या बाधितांची आकडेवारी वाढू लागली. परिणामी कोरोनामुक्त झालेल्या या तालुक्यांतही कोरोना पुन्हा शिरला. यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया तालुका सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट ठरला असून, या तालुक्यातच आतापर्यंतचे सर्वाधिक ८०७९ बाधित असून, ११८ क्रियाशील रुग्णही येथेच आहेत. मात्र, त्यानंतर तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांत प्रत्येकी १० रुग्ण आहेत. म्हणजेच, दुसऱ्या क्रमांकावर आता हे तीन तालुके आले आहेत. यावरून या तालुक्यांतही कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.

--------------------------

एकमात्र देवरी तालुकाही अखेर बाधित

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून देवरी तालुका ग्रीन झाला होता. मात्र, वाढत्या उद्रेकापासून हा तालुकाही स्वत:ला वाचवू शकला नसून, शनिवारी (दि. ६) देवरी तालुक्यात कोरोना शिरल्याने कोरोनामुक्त असलेला हा एकमात्र तालुका पुन्हा बाधित झाला आहे. यावरून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे दिसत आहे. आज एकही तालुका कोरोनामुक्त नसल्याने खरबदारीची गरज आहे.

----------------------------

आता कारवायांची खरी गरज

राज्यातील काही तालुक्यांत वाढता उद्रेक बघता तेथील प्रशासनाला लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्हावासीयांना जिल्ह्यातील गंभीर होत चाललेल्या परिस्थितीशी काहीच घेणे-देणे दिसत नाही. यामुळेच ते कोरोनाला विसरून सैरावैरा वागत आहेत. अशीच स्थिती राहिल्यास गोंदिया जिल्ह्यातही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही व हे दररोजच्या वाढत्या आकडेवारीतून दिसून येत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आता कारावायांची गरज दिसून येत आहे.