शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

तिरोडा, आमगाव, अर्जुनीत शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

गोंदिया : कधी कोरोनामुक्त झालेले जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव तालुका आता पुन्हा कोरोनाग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आजघडीला ...

गोंदिया : कधी कोरोनामुक्त झालेले जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव तालुका आता पुन्हा कोरोनाग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आजघडीला गोंदिया तालुका वगळता सर्वाधिक रुग्ण याच तीन तालुक्यांत आहेत. यामुळे आता या तालुक्यांत धोका वाढत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोना परिस्थितीत हे तालुके ग्रीन झाले होते. यात तिरोडा तालुका कोरोनाचा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट आहे. मात्र, तिरोडा तालुकाही कोरोनामुक्त झाला होता व त्यामुळे आता जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार असे वाटत होते. मात्र, राज्यात कोरोना फोफावू लागला असतानाच जिल्ह्यातही दररोजच्या बाधितांची आकडेवारी वाढू लागली. परिणामी कोरोनामुक्त झालेल्या या तालुक्यांतही कोरोना पुन्हा शिरला. यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया तालुका सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट ठरला असून, या तालुक्यातच आतापर्यंतचे सर्वाधिक ८०७९ बाधित असून, ११८ क्रियाशील रुग्णही येथेच आहेत. मात्र, त्यानंतर तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांत प्रत्येकी १० रुग्ण आहेत. म्हणजेच, दुसऱ्या क्रमांकावर आता हे तीन तालुके आले आहेत. यावरून या तालुक्यांतही कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.

--------------------------

एकमात्र देवरी तालुकाही अखेर बाधित

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून देवरी तालुका ग्रीन झाला होता. मात्र, वाढत्या उद्रेकापासून हा तालुकाही स्वत:ला वाचवू शकला नसून, शनिवारी (दि. ६) देवरी तालुक्यात कोरोना शिरल्याने कोरोनामुक्त असलेला हा एकमात्र तालुका पुन्हा बाधित झाला आहे. यावरून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे दिसत आहे. आज एकही तालुका कोरोनामुक्त नसल्याने खरबदारीची गरज आहे.

----------------------------

आता कारवायांची खरी गरज

राज्यातील काही तालुक्यांत वाढता उद्रेक बघता तेथील प्रशासनाला लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्हावासीयांना जिल्ह्यातील गंभीर होत चाललेल्या परिस्थितीशी काहीच घेणे-देणे दिसत नाही. यामुळेच ते कोरोनाला विसरून सैरावैरा वागत आहेत. अशीच स्थिती राहिल्यास गोंदिया जिल्ह्यातही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही व हे दररोजच्या वाढत्या आकडेवारीतून दिसून येत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आता कारावायांची गरज दिसून येत आहे.