शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

वेळ बदलली, देशही बदलतोय, उरल्या फक्त आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

गोऱ्या सरकारच्या काळात मी लहान होते. घोड्यांवर येणाऱ्या इंग्रजांची खूप दहशत होती. परंतु, दहशतीला बाजूला सारून गावंची गावे ‘भारतमाता ...

गोऱ्या सरकारच्या काळात मी लहान होते. घोड्यांवर येणाऱ्या इंग्रजांची खूप दहशत होती. परंतु, दहशतीला बाजूला सारून गावंची गावे ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा करीत स्वातंत्र्यलढ्यात उतरली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सोयीसुविधा अत्यंत कमी होत्या. जशी वेळ जात गेली तसा देश पुढेपुढे आला. आजघडीला दळणवळणाच्या साधनांपासून प्रत्येकाला सुखसोयीची साधने उपलब्ध झाली.

-मीराबाई हुकरे, पद्मपूर

..........

भारत स्वतंत्र झाला तेव्हा मी खूप लहान होतो. इंग्रजांच्या तावडीतून सुटलेल्या भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहताच देश भक्तिरसाने न्हाऊन निघत होता. शेती करूनच उदरनिर्वाह करून खेड्यांचा कारभार चालत होता. आता भारतातील प्रत्येक खेडी रस्त्याने जोडली गेली. आधी दळणवळणाची साधने नव्हती. पैसे कमी होते, तेव्हा तरी समाधान मानायचे. आता पैसे भरपूर आहेत तरी कुणाच्या मनात समाधान नाही आणि लोक एकमेकांची फसवणूक करू लागले.

- भिवाजी खोटेले, कोहळीटोला-आदर्श

.............

गोरे सरकार गावात आले म्हटले की महिला, मुले व पुरुष घरात जायचे. आम्ही लहान असताना त्यावेळी भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला. गांधीजींच्या नेतृत्वात देशात एकच लहर चालत होती. आधीच्या काळात देशप्रेम प्रत्येकात ओतप्रोत भरलेले होते. आता लोकांच्या मनात स्वार्थीवृत्ती आल्याने तेवढी देशभक्ती दिसत नाही. संसाधनांनी आपण खूप समोर आलो. परंतु, मानसिकरीत्या खूप मागासपणा आला आहे.

- बळवंतराव मेंढे, खातिया

..............