शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वेळ बदलली, देशही बदलतोय, उरल्या फक्त आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

गोऱ्या सरकारच्या काळात मी लहान होते. घोड्यांवर येणाऱ्या इंग्रजांची खूप दहशत होती. परंतु, दहशतीला बाजूला सारून गावंची गावे ‘भारतमाता ...

गोऱ्या सरकारच्या काळात मी लहान होते. घोड्यांवर येणाऱ्या इंग्रजांची खूप दहशत होती. परंतु, दहशतीला बाजूला सारून गावंची गावे ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा करीत स्वातंत्र्यलढ्यात उतरली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सोयीसुविधा अत्यंत कमी होत्या. जशी वेळ जात गेली तसा देश पुढेपुढे आला. आजघडीला दळणवळणाच्या साधनांपासून प्रत्येकाला सुखसोयीची साधने उपलब्ध झाली.

-मीराबाई हुकरे, पद्मपूर

..........

भारत स्वतंत्र झाला तेव्हा मी खूप लहान होतो. इंग्रजांच्या तावडीतून सुटलेल्या भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहताच देश भक्तिरसाने न्हाऊन निघत होता. शेती करूनच उदरनिर्वाह करून खेड्यांचा कारभार चालत होता. आता भारतातील प्रत्येक खेडी रस्त्याने जोडली गेली. आधी दळणवळणाची साधने नव्हती. पैसे कमी होते, तेव्हा तरी समाधान मानायचे. आता पैसे भरपूर आहेत तरी कुणाच्या मनात समाधान नाही आणि लोक एकमेकांची फसवणूक करू लागले.

- भिवाजी खोटेले, कोहळीटोला-आदर्श

.............

गोरे सरकार गावात आले म्हटले की महिला, मुले व पुरुष घरात जायचे. आम्ही लहान असताना त्यावेळी भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला. गांधीजींच्या नेतृत्वात देशात एकच लहर चालत होती. आधीच्या काळात देशप्रेम प्रत्येकात ओतप्रोत भरलेले होते. आता लोकांच्या मनात स्वार्थीवृत्ती आल्याने तेवढी देशभक्ती दिसत नाही. संसाधनांनी आपण खूप समोर आलो. परंतु, मानसिकरीत्या खूप मागासपणा आला आहे.

- बळवंतराव मेंढे, खातिया

..............