शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

वेळ बदलली, देशही बदलतोय, उरल्या फक्त आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

गोऱ्या सरकारच्या काळात मी लहान होते. घोड्यांवर येणाऱ्या इंग्रजांची खूप दहशत होती. परंतु, दहशतीला बाजूला सारून गावंची गावे ‘भारतमाता ...

गोऱ्या सरकारच्या काळात मी लहान होते. घोड्यांवर येणाऱ्या इंग्रजांची खूप दहशत होती. परंतु, दहशतीला बाजूला सारून गावंची गावे ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा करीत स्वातंत्र्यलढ्यात उतरली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सोयीसुविधा अत्यंत कमी होत्या. जशी वेळ जात गेली तसा देश पुढेपुढे आला. आजघडीला दळणवळणाच्या साधनांपासून प्रत्येकाला सुखसोयीची साधने उपलब्ध झाली.

-मीराबाई हुकरे, पद्मपूर

..........

भारत स्वतंत्र झाला तेव्हा मी खूप लहान होतो. इंग्रजांच्या तावडीतून सुटलेल्या भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहताच देश भक्तिरसाने न्हाऊन निघत होता. शेती करूनच उदरनिर्वाह करून खेड्यांचा कारभार चालत होता. आता भारतातील प्रत्येक खेडी रस्त्याने जोडली गेली. आधी दळणवळणाची साधने नव्हती. पैसे कमी होते, तेव्हा तरी समाधान मानायचे. आता पैसे भरपूर आहेत तरी कुणाच्या मनात समाधान नाही आणि लोक एकमेकांची फसवणूक करू लागले.

- भिवाजी खोटेले, कोहळीटोला-आदर्श

.............

गोरे सरकार गावात आले म्हटले की महिला, मुले व पुरुष घरात जायचे. आम्ही लहान असताना त्यावेळी भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला. गांधीजींच्या नेतृत्वात देशात एकच लहर चालत होती. आधीच्या काळात देशप्रेम प्रत्येकात ओतप्रोत भरलेले होते. आता लोकांच्या मनात स्वार्थीवृत्ती आल्याने तेवढी देशभक्ती दिसत नाही. संसाधनांनी आपण खूप समोर आलो. परंतु, मानसिकरीत्या खूप मागासपणा आला आहे.

- बळवंतराव मेंढे, खातिया

..............