शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

येणारा काळ कठीण जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:26 IST

यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पाणीसाठा :जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. आजची ही स्थिती असताना यावरून येणाºया काही महिन्यांच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो.पाहिजे त्या प्रमाणात पाऊस आता बरसत नाही. त्यातही यंदा तर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत कित्येक पटीने कमी पाऊस बरसला. परिणामी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पीक हातून जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. डोळ््यासमोर पीक मरत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या तरी कमी पावसाचा फटका फक्त शेतकºयांच्या चेहºयावरच दिसून येत असून सर्वसामान्य जनतेला याचा काहीच भान नाही. मात्र काही महिन्यांनी कमी पावसाचे दुष्परिणाम त्यांनाही भासणार यात शंका नाही.जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प यंदा कमी पावसामुळे तहानलेलेच आहेत. या प्रकल्पांत अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने कमी पाणीसाठा आजच्या स्थितीत आहे. किंवा नाममात्र पाणीसाठा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नसून पावसा अभावी या प्रकल्पांची तहान भागलेली नाही. पावसाळ््यात या प्रकल्पांची ही स्थिती असताना काही महिन्यांनी प्रकल्पांत पाणी राहणार नाही तेव्हा मात्र काय होणार याची आताच कल्पना करता येईल. यामुळेच येणारा काळ कठीण जाणार असल्याची चिन्हे आतापासून दिसून येत आहेत.शहरात दमदार पावसाची हजेरीपावसाळ््यात पाऊस जसा बरसायला हवा तसा काही बरसला नाही. आता मात्र परतीच्या वेळी पाऊस आपली हजेरी लावत आहे. सोमवारी (दि.११) शहरात सायंकाळी ४ वाजतापासून दमदार पावसाने हजेरी लावली.सुमारे अर्धा तास बरसलेल्या या पावसाने वातावरण गार झालेच शिवाय सर्वांनाच सुखावून सोडले. अशाच प्रकारे दररोज पाऊस बरसत राहील्यास काही प्रमाणात भरपाई होणार.यंदाच्या हंगामातील रबी कठीणचजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच आपली शेती करीत आहेत. यामुळे रबीचा हंगाम पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणाºया पावसावरच अवलंबून असतो. अशात आता प्रकल्पांत पाणी नसताना रबीसाठी पाणी सोडणे कठीण आहे. यावरून आजच रबीचा हंगाम यंदा कठीणच असल्याचे स्पष्ट होते. प्रकल्पांतील पाण्याच्या भरवशावरच जिल्ह्याचा संपूर्ण खेळ चालतो. आता जिल्ह्यातील हे प्रकल्पच आॅक्सीजनवर असताना त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूकीचे ठरणार आहे. ही स्थिती जिल्ह्यातील प्रकल्पांचीच नसून लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील व शेजारच्या भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांचीही आहे.