शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

येणारा काळ कठीण जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:26 IST

यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पाणीसाठा :जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. आजची ही स्थिती असताना यावरून येणाºया काही महिन्यांच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो.पाहिजे त्या प्रमाणात पाऊस आता बरसत नाही. त्यातही यंदा तर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत कित्येक पटीने कमी पाऊस बरसला. परिणामी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पीक हातून जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. डोळ््यासमोर पीक मरत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या तरी कमी पावसाचा फटका फक्त शेतकºयांच्या चेहºयावरच दिसून येत असून सर्वसामान्य जनतेला याचा काहीच भान नाही. मात्र काही महिन्यांनी कमी पावसाचे दुष्परिणाम त्यांनाही भासणार यात शंका नाही.जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प यंदा कमी पावसामुळे तहानलेलेच आहेत. या प्रकल्पांत अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने कमी पाणीसाठा आजच्या स्थितीत आहे. किंवा नाममात्र पाणीसाठा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नसून पावसा अभावी या प्रकल्पांची तहान भागलेली नाही. पावसाळ््यात या प्रकल्पांची ही स्थिती असताना काही महिन्यांनी प्रकल्पांत पाणी राहणार नाही तेव्हा मात्र काय होणार याची आताच कल्पना करता येईल. यामुळेच येणारा काळ कठीण जाणार असल्याची चिन्हे आतापासून दिसून येत आहेत.शहरात दमदार पावसाची हजेरीपावसाळ््यात पाऊस जसा बरसायला हवा तसा काही बरसला नाही. आता मात्र परतीच्या वेळी पाऊस आपली हजेरी लावत आहे. सोमवारी (दि.११) शहरात सायंकाळी ४ वाजतापासून दमदार पावसाने हजेरी लावली.सुमारे अर्धा तास बरसलेल्या या पावसाने वातावरण गार झालेच शिवाय सर्वांनाच सुखावून सोडले. अशाच प्रकारे दररोज पाऊस बरसत राहील्यास काही प्रमाणात भरपाई होणार.यंदाच्या हंगामातील रबी कठीणचजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच आपली शेती करीत आहेत. यामुळे रबीचा हंगाम पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणाºया पावसावरच अवलंबून असतो. अशात आता प्रकल्पांत पाणी नसताना रबीसाठी पाणी सोडणे कठीण आहे. यावरून आजच रबीचा हंगाम यंदा कठीणच असल्याचे स्पष्ट होते. प्रकल्पांतील पाण्याच्या भरवशावरच जिल्ह्याचा संपूर्ण खेळ चालतो. आता जिल्ह्यातील हे प्रकल्पच आॅक्सीजनवर असताना त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूकीचे ठरणार आहे. ही स्थिती जिल्ह्यातील प्रकल्पांचीच नसून लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील व शेजारच्या भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांचीही आहे.