शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

येणारा काळ कठीण जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:26 IST

यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पाणीसाठा :जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. आजची ही स्थिती असताना यावरून येणाºया काही महिन्यांच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो.पाहिजे त्या प्रमाणात पाऊस आता बरसत नाही. त्यातही यंदा तर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत कित्येक पटीने कमी पाऊस बरसला. परिणामी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पीक हातून जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. डोळ््यासमोर पीक मरत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या तरी कमी पावसाचा फटका फक्त शेतकºयांच्या चेहºयावरच दिसून येत असून सर्वसामान्य जनतेला याचा काहीच भान नाही. मात्र काही महिन्यांनी कमी पावसाचे दुष्परिणाम त्यांनाही भासणार यात शंका नाही.जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प यंदा कमी पावसामुळे तहानलेलेच आहेत. या प्रकल्पांत अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने कमी पाणीसाठा आजच्या स्थितीत आहे. किंवा नाममात्र पाणीसाठा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नसून पावसा अभावी या प्रकल्पांची तहान भागलेली नाही. पावसाळ््यात या प्रकल्पांची ही स्थिती असताना काही महिन्यांनी प्रकल्पांत पाणी राहणार नाही तेव्हा मात्र काय होणार याची आताच कल्पना करता येईल. यामुळेच येणारा काळ कठीण जाणार असल्याची चिन्हे आतापासून दिसून येत आहेत.शहरात दमदार पावसाची हजेरीपावसाळ््यात पाऊस जसा बरसायला हवा तसा काही बरसला नाही. आता मात्र परतीच्या वेळी पाऊस आपली हजेरी लावत आहे. सोमवारी (दि.११) शहरात सायंकाळी ४ वाजतापासून दमदार पावसाने हजेरी लावली.सुमारे अर्धा तास बरसलेल्या या पावसाने वातावरण गार झालेच शिवाय सर्वांनाच सुखावून सोडले. अशाच प्रकारे दररोज पाऊस बरसत राहील्यास काही प्रमाणात भरपाई होणार.यंदाच्या हंगामातील रबी कठीणचजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच आपली शेती करीत आहेत. यामुळे रबीचा हंगाम पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणाºया पावसावरच अवलंबून असतो. अशात आता प्रकल्पांत पाणी नसताना रबीसाठी पाणी सोडणे कठीण आहे. यावरून आजच रबीचा हंगाम यंदा कठीणच असल्याचे स्पष्ट होते. प्रकल्पांतील पाण्याच्या भरवशावरच जिल्ह्याचा संपूर्ण खेळ चालतो. आता जिल्ह्यातील हे प्रकल्पच आॅक्सीजनवर असताना त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूकीचे ठरणार आहे. ही स्थिती जिल्ह्यातील प्रकल्पांचीच नसून लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील व शेजारच्या भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांचीही आहे.