शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

दिवाळीच्या उत्साहावर अवकाळीचे विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस वादळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कायम होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस दिवाळीच्या उत्साहावर विरजन घालणार का असे बोलले जात होते.मागील आठड्यात सुध्दा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा फटका खरीपातील धानपिकांना बसला होता.

ठळक मुद्देधान पिकांना बसला फटका । बांध्यांमध्ये साचले पाणी, जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी सणाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत होती. तर दिवाळीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शनिवारी(दि.२६) सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चार वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या अनेक नागरिकांचा हिरमोढ होऊन त्यांच्या उत्साहावर पावासाचे विरजन पडले.हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस वादळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कायम होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस दिवाळीच्या उत्साहावर विरजन घालणार का असे बोलले जात होते.मागील आठड्यात सुध्दा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा फटका खरीपातील धानपिकांना बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. मात्र दुपारी ४ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे अनेकांना खरेदी न करताच घरी परत जावे लागले. त्यामुळे त्यांचा सुध्दा हिरमोढ झाला होता.सर्वच भागात पाऊसजिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी,आमगाव, सालेकसासह इतर भागात सुध्दा शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात एक ते दीड तास पाऊस झाल्याने याचा या भागातील धानपिकांना सर्वाधिक फटका बसला.शेतकऱ्यांचे नुकसानसध्या खरीप हंगामातील धानाची कापणी सुरु आहे. मात्र शनिवारी झालेल्या पावसाचा फटका कापणी करुन बांध्यामध्ये ठेवलेल्या धान भिजला. बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता आहे.तर शेतामध्ये उभा असलेला धान सुध्दा पाऊस आणि वाऱ्यामुळे झोपला. यामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलायावर्षी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाल्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा बंफर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती