शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

गोंदियातील सेवानिवृत्त हजेरी सहाय्यकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 13:45 IST

शासनाच्या रोजगार हमी योजनेतून सेवानिवृत्त झालेल्या हजेरी सहाय्यकांना अद्यापही सेवानिवृत्त वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.

ठळक मुद्देसेवानिवृत्ती वेतनापासून वंचित न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या रोजगार हमी योजनेतून सेवानिवृत्त झालेल्या हजेरी सहाय्यकांना अद्यापही सेवानिवृत्त वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दीडशे हजेरी सहाय्यकांचा मागील दोन तीन वर्षांपासून यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही.रोजगार हमी योजनेच्या कामांचे योग्य नियोजन करण्यासाठी तसेच या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने हजेरी सहाय्यकांची नियुक्ती केली. या हजेरी सहाय्यकांनी या विभागात जवळपास वीस ते पंचविस वर्षे सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या वेतनातून आपल्या कुटुंबाला मदत होईल अशी आशा हजेरी सहाय्यकांना होती. विशेष म्हणजे शासन निर्णयानुसार या हजेरी सहाय्यकांना शासनाच्या विविध विभागात सामावून घेण्यात आले. सदर हजेरी सहाय्यक सेवानिवृत्त झाल्यानंतर नियमानुसार त्यांना सेवानिवृत्ती वेतन देणे अनिवार्य आहे. त्यामुळे ते मिळेलच अशी आशा त्यांना होती. मात्र गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यातून सेवानिवृत्त झालेल्या हजेरी सहाय्यकांना अद्यापही सेवानिवृत्ती वेतन मिळाले नाही. शासनाने सेवानिवृत्त वेतन देण्यास टाळाटाळ केल्याने या सेवानिवृत्त हजेरी सहाय्यकांनी २८ फेब्रुवारी २०१७ ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त हजेरी सहाय्यकांना सेवानिवृत्ती वेतन देण्याचे निर्देश शासनाला दिले. मात्र यानंतरही शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे हजेरी सहाय्यकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या चारही जिल्ह्यातील हजेरी सहाय्यक मागील वर्षभरापासून सेवानिवृत्ती वेतनासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र दगडाचे मन असलेल्या शासनाला अद्यापही पाझर फुटला नाही.त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरही हजेरी सहाय्यकांची पायपीट कायम आहे.लोकप्रतिनिधी दखल घेणार का?रोजगार हमी योजना विभागात वीस ते पंचविस वर्षे प्रामाणिकपणे सेवा देवून सुध्दा शासन हजेरी सहाय्यकांना सेवानिवृत्ती वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी याची दखल घेवून हजेरी सहाय्यकांना न्याय मिळवून देणार का असा सवाल मुनेश्वर गहाणे,मुरलीधर डांगे,आनंदराव बावने, काशिराम बनसोड यांनी केला आहे.

टॅग्स :Governmentसरकार