शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

व्याघ्र प्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:32 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.

ठळक मुद्देपरिणय फुके : पत्रपरिषदेत केली विविध विषयांवर चर्चा, मंत्री बनल्यानंतर प्रथम नगरागमन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.मंत्रीपद स्वीकारल्यानंतर येथे रविवारी (दि.३०) येथे प्रथमच आगमन झाले असता शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्र परिषदेत पत्रकारांसोबत चर्चा करताना ते बोलत होते. पुढे बोलताना नामदार डॉ. फुके यांनी, गोंदिया जंगलांचा जिल्हा आहे. मात्र सध्या आहे त्या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासावर जोर दिला जाणार आहे. यासाठी रविवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. तसेच काही उपाययोजना डोक्यात असून एयर बी एन बी या कंपनीसोबत चर्चा झाली असून त्यांनी सर्वेक्षण केले आहे. जिल्ह्याला टुरिजम पॅलेस बनवायचे असून असे झाल्यास जिल्ह्यात टुरिजम वाढणार व यातून सुमारे २० हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदांच्या विषयी माहिती देताना त्यांनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची यादी दिली आहे. रिक्त पदांमुळे नक्कीच कामे वेळेत होत नसल्याने सर्वच विभागांतील रिक्त पद तसेच पेंडींग कामांची यादी मागविली आहे. यातील जी कामे जनता दरबारातून सुटणार त्यांना लगेच सोडविणार असून मोठ्या कामांना बघणार असल्याचेही नामदार फुके म्हणाले. जिल्हा परिषदेत कॉँग्रेस सोबत कोव्हापर्यंत युती असल्याचे विचारले असता त्यांनी, जोपर्यंत जिल्हा कॉँग्रेस मुक्त होत नाही तोपर्यंतच ही युती असल्याचे उत्तर दिले.दर शनिवारी जनता दरबारयाप्रसंगी नामदार फुके यांनी आठवड्यातील तीन दिवस गोंदियाला देणार असल्याचे सांगीतले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असून यासाठी दर शनिवारी जनता दरबार घेणार. त्यात जिल्हाधिकाºयांपासून अन्य सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील व यासाठी सर्वांना सूचना दिल्या जाणार आहेत. मिळालेल्या तीन महिन्यांत त्या दृष्टीनेच काम करावयाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कातसध्या सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रवेशावरील चर्चांवर बोलताना नामदार फुके यांनी, कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील मोठ्या प्रमाणात नेते आमच्या संपर्कात आहेत. ते फक्त आमच्या ‘हो’ म्हणण्याची वाट बघत आहेत. आज भाजप आपल्या बळावर निवडून आली असून आम्हाला कुणाचीही गरज नाही. तरिही पक्षात संयुक्तरित्या निर्णय घेतले जात असल्याचे ते म्हणाले.कुणालाही मंत्रिपदावरून काढले नाहीराजकुमार बडोले यांच्या मंत्रिपदाच्या विषयावर बोलताना नामदार फुके यांनी, बडोले यांनी त्यांच्या बैयक्तीक कारणांतून राजीनामा दिला. त्यांनी आपल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात कित्येक चांगली कामे केली असून मिळालेल्या तीन महिन्यांत त्यांची कामे पुढे घेऊन जायची आहेत. शिवाय, कुणालाही मंत्रीपदावरून काढले नसल्याचेही ते म्हणाले.