शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

व्याघ्र प्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:32 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.

ठळक मुद्देपरिणय फुके : पत्रपरिषदेत केली विविध विषयांवर चर्चा, मंत्री बनल्यानंतर प्रथम नगरागमन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.मंत्रीपद स्वीकारल्यानंतर येथे रविवारी (दि.३०) येथे प्रथमच आगमन झाले असता शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्र परिषदेत पत्रकारांसोबत चर्चा करताना ते बोलत होते. पुढे बोलताना नामदार डॉ. फुके यांनी, गोंदिया जंगलांचा जिल्हा आहे. मात्र सध्या आहे त्या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासावर जोर दिला जाणार आहे. यासाठी रविवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. तसेच काही उपाययोजना डोक्यात असून एयर बी एन बी या कंपनीसोबत चर्चा झाली असून त्यांनी सर्वेक्षण केले आहे. जिल्ह्याला टुरिजम पॅलेस बनवायचे असून असे झाल्यास जिल्ह्यात टुरिजम वाढणार व यातून सुमारे २० हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदांच्या विषयी माहिती देताना त्यांनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची यादी दिली आहे. रिक्त पदांमुळे नक्कीच कामे वेळेत होत नसल्याने सर्वच विभागांतील रिक्त पद तसेच पेंडींग कामांची यादी मागविली आहे. यातील जी कामे जनता दरबारातून सुटणार त्यांना लगेच सोडविणार असून मोठ्या कामांना बघणार असल्याचेही नामदार फुके म्हणाले. जिल्हा परिषदेत कॉँग्रेस सोबत कोव्हापर्यंत युती असल्याचे विचारले असता त्यांनी, जोपर्यंत जिल्हा कॉँग्रेस मुक्त होत नाही तोपर्यंतच ही युती असल्याचे उत्तर दिले.दर शनिवारी जनता दरबारयाप्रसंगी नामदार फुके यांनी आठवड्यातील तीन दिवस गोंदियाला देणार असल्याचे सांगीतले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असून यासाठी दर शनिवारी जनता दरबार घेणार. त्यात जिल्हाधिकाºयांपासून अन्य सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील व यासाठी सर्वांना सूचना दिल्या जाणार आहेत. मिळालेल्या तीन महिन्यांत त्या दृष्टीनेच काम करावयाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कातसध्या सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रवेशावरील चर्चांवर बोलताना नामदार फुके यांनी, कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील मोठ्या प्रमाणात नेते आमच्या संपर्कात आहेत. ते फक्त आमच्या ‘हो’ म्हणण्याची वाट बघत आहेत. आज भाजप आपल्या बळावर निवडून आली असून आम्हाला कुणाचीही गरज नाही. तरिही पक्षात संयुक्तरित्या निर्णय घेतले जात असल्याचे ते म्हणाले.कुणालाही मंत्रिपदावरून काढले नाहीराजकुमार बडोले यांच्या मंत्रिपदाच्या विषयावर बोलताना नामदार फुके यांनी, बडोले यांनी त्यांच्या बैयक्तीक कारणांतून राजीनामा दिला. त्यांनी आपल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात कित्येक चांगली कामे केली असून मिळालेल्या तीन महिन्यांत त्यांची कामे पुढे घेऊन जायची आहेत. शिवाय, कुणालाही मंत्रीपदावरून काढले नसल्याचेही ते म्हणाले.