शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वे गाडीच्या माध्यमाने तिकीट तपासणी

By admin | Updated: November 27, 2015 02:10 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनात नागपूर मंडळाच्या वाणिज्य विभागाद्वारे ...

विनातिकीट प्रवासाची ८,२३२ प्रकरणे : रेल्वेने केली २१ लाख २८ हजार रूपयांची वसुलीगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनात नागपूर मंडळाच्या वाणिज्य विभागाद्वारे विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यात विनातिकीट, अनियमित प्रवासी तसेच सामान बुक न करता लगेज प्रकरणांसह अनधिकृत सामान विक्रेत्यांवर आवर घालण्यासाठी मंडळातून जाणाऱ्या प्रवाशी गाड्या तसेच लहान व मोठ्या लाईनवरील स्थानकांवर विशेष तिकीट चेकींग अभियान राबविण्यात येत आहे. याच क्रमात वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विपिन वैष्णव व ओ.पी. जायस्वाल यांच्या पुढाकारात २३ तिकीट तपासणी कर्मचारी व १८ सुरक्षा दलाचे जवान यांच्या सहकार्याने एका विशेष रेल्वे गाडीच्या मध्यमाने २० नोव्हेंबर रोजी नागपूर-गोंदिया-नागभिड-बल्लारशाह दरम्यान विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यानंतरही हे अभियान सुरूच आहे. या विशेष तपासणीदरम्यान १८७ विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे पकडण्यात आली. यात रेल्वे प्रशासनाने एकूण ३४ हजार ४३५ रूपयांची वसुली केली.तसेच अनधिकृत पद्धतीने कचरा फेकण्याचे तीन प्रकरणे पकडण्यात आले. यात १५० रूपये वसूल करण्यात आले. याशिवाय अतिरिक्त रेल्वे अधिनियमाच्या कलम १४४ (अनधिकृत वेंडर) अंतर्गत सात व्यक्तींना व कलम १६२ (अनधिकृतपणे महिला डब्यात प्रवास) अंतर्गत दोन प्रवाशांना नागभिड रेल्वे स्थानकात रेल्वे न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आले. यात क्रमश: चार हजार ९०० रूपये व ४०० रूपयांचा दंड सुनावण्यात आला.मंडळाद्वारे १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत मंडळातील वाणिज्य अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या एकूण ४६ विशेष तिकीट तपासणी अभियानात एकूण आठ हजार २३२ विनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले. याद्वारे रेल्वे प्रशासनाला एकूण २१ लाख २८ हजार ७६३ रूपयांचे उत्पन्न झाले. याशिवाय अनधिकृत पद्धतीने कचरा फेकणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करून ९४ प्रवाशांकडून सात हजार ७३० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. सदर विशेष रेल्वे तिकीट तपासणी अभियान पुढे निरंतर सुरु राहणार आहे. प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करावे व योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावे अन्यता त्यांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागू शकेल, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)