शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

तिबेटियनांचा ‘थँक यू इंडिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:32 IST

ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही.

ठळक मुद्देगोरगरिबांना वितरित केली उबदार वस्त्रे

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही. आपलेही काही देणे आहे या भावनेतून ‘ कव्हर द कोल्ड’ हा कार्यक्रम नार्गोलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड येथे बुधवारी साजरा करण्यात आला.१० डिसेंबर १९८९ रोजी तिबेट सरकारचे प्रमुख व सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचा वर्धापन दिवस दरवर्षी तिबेटीयन बांधव साजरा करतात. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेवून विविध उपक्रम या वसाहतीत साजरे केले जातात. यापूर्वी ग्रिन इंडिया, स्वच्छ भारत, भूखा है उसे खिलाओ अशी नानाविध कार्यक्रम राबविण्यात आले. या वर्षी थँक यू इंडियाच्या माध्यमातून कव्हर द कोल्ड हा उपक्रम राबविला जात आहे. भारतीय आमचे बांधव आहेत.दरिद्र हे प्रत्येक देशातच कमी जास्त प्रमाणात असते.गरीबीमुळे काही लोकं उबदार वस्त्रे परिधान करु शकत नाहीत. अशा लोकांना कडाक्याच्या थंडीतून बचावासाठी उबदार वस्त्र द्यावेत हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. हिवाळ्यात स्वेटर, जॅकेट यासारखी उबदार वस्त्रे विक्री करण्याचा तिबेटीयनांचा मुख्य व्यवसाय आहे. गोरगरीबांना उबदार वस्त्र देण्याचा संकल्प त्यांनी केला. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा येथे उबदार वस्त्रे विक्री करणाऱ्या या व्यावसायीकांनी सुमारे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंतची उबदार वस्त्रे पाठविली. सुमारे २ हजार लोकांना ही उबदार वस्त्रे वितरीत करण्याचा संकल्प आहे. त्याअंतर्गत बुधवारी तिबेटीयन वसाहत कार्यालयासमोर वितरण सुरू करण्यात आले.याचा जवळच्या खेडेगावातील लोकांनी लाभ घेतला. उर्वरित उबदार वस्त्रे ही शाळा व खेडेगावात प्रत्यक्ष जावून दिली जाणार आहेत.भारताने सर्वकाही दिलेभारत सरकार व भारतीय लोकं यांनी आम्हाला जे दिलं, ते कुणीही दिलं नाही. अगदी भरभरुन दिलं. देशवासी व स्थानिकांच्या सहकार्याने आम्ही येथे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. चिनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर आमच्या मातीत आम्हाला स्वातंत्र्य नाही. पण आम्ही भारत देशात अगदी स्वातंत्र्यात असल्यासारखेच आहोत. १० डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिनाचा वर्धापन दिवस याच दिवशी सर्वोच्च आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. या दिनाचे औचित्य साधून धन्यवाद मानन्याचे हेतूने ‘थँक यू इंडिया’ हा कार्यक्रम राबविला जात आहे.- ढुन्डूप ग्यान पोवसाहत अधिकारी, नार्गेलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड