शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

तिबेटियनांचा ‘थँक यू इंडिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:32 IST

ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही.

ठळक मुद्देगोरगरिबांना वितरित केली उबदार वस्त्रे

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही. आपलेही काही देणे आहे या भावनेतून ‘ कव्हर द कोल्ड’ हा कार्यक्रम नार्गोलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड येथे बुधवारी साजरा करण्यात आला.१० डिसेंबर १९८९ रोजी तिबेट सरकारचे प्रमुख व सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचा वर्धापन दिवस दरवर्षी तिबेटीयन बांधव साजरा करतात. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेवून विविध उपक्रम या वसाहतीत साजरे केले जातात. यापूर्वी ग्रिन इंडिया, स्वच्छ भारत, भूखा है उसे खिलाओ अशी नानाविध कार्यक्रम राबविण्यात आले. या वर्षी थँक यू इंडियाच्या माध्यमातून कव्हर द कोल्ड हा उपक्रम राबविला जात आहे. भारतीय आमचे बांधव आहेत.दरिद्र हे प्रत्येक देशातच कमी जास्त प्रमाणात असते.गरीबीमुळे काही लोकं उबदार वस्त्रे परिधान करु शकत नाहीत. अशा लोकांना कडाक्याच्या थंडीतून बचावासाठी उबदार वस्त्र द्यावेत हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. हिवाळ्यात स्वेटर, जॅकेट यासारखी उबदार वस्त्रे विक्री करण्याचा तिबेटीयनांचा मुख्य व्यवसाय आहे. गोरगरीबांना उबदार वस्त्र देण्याचा संकल्प त्यांनी केला. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा येथे उबदार वस्त्रे विक्री करणाऱ्या या व्यावसायीकांनी सुमारे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंतची उबदार वस्त्रे पाठविली. सुमारे २ हजार लोकांना ही उबदार वस्त्रे वितरीत करण्याचा संकल्प आहे. त्याअंतर्गत बुधवारी तिबेटीयन वसाहत कार्यालयासमोर वितरण सुरू करण्यात आले.याचा जवळच्या खेडेगावातील लोकांनी लाभ घेतला. उर्वरित उबदार वस्त्रे ही शाळा व खेडेगावात प्रत्यक्ष जावून दिली जाणार आहेत.भारताने सर्वकाही दिलेभारत सरकार व भारतीय लोकं यांनी आम्हाला जे दिलं, ते कुणीही दिलं नाही. अगदी भरभरुन दिलं. देशवासी व स्थानिकांच्या सहकार्याने आम्ही येथे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. चिनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर आमच्या मातीत आम्हाला स्वातंत्र्य नाही. पण आम्ही भारत देशात अगदी स्वातंत्र्यात असल्यासारखेच आहोत. १० डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिनाचा वर्धापन दिवस याच दिवशी सर्वोच्च आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. या दिनाचे औचित्य साधून धन्यवाद मानन्याचे हेतूने ‘थँक यू इंडिया’ हा कार्यक्रम राबविला जात आहे.- ढुन्डूप ग्यान पोवसाहत अधिकारी, नार्गेलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड