शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

परिसरात आवत्या पध्दतीवर जोर

By admin | Updated: June 24, 2015 01:58 IST

या परिसरात शेती कार्याला वेग आला आहे. मात्र धान लागवड करणे खर्चिक झाल्यामुळे आवत्या पध्दतीकडे शेतकऱ्यांची ओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

धानपिकांसाठी उपयोगी : जमीन पडीत ठेवण्यापेक्षा आवत्या पद्धतीने पेरणी कालीमाटी : या परिसरात शेती कार्याला वेग आला आहे. मात्र धान लागवड करणे खर्चिक झाल्यामुळे आवत्या पध्दतीकडे शेतकऱ्यांची ओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.आमगाव तालुक्यातील अनेक गावे खरीप धान पिकावर अवलंबून असतात. दिवसेंदिवस धान पीक घेणे खर्चिक होत आहे. पिकांसाठी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधी साधन सामुग्रीचे भाव आभाळाला गवसले आहेत. तसेच मजुरांची कमतरता दिसून येत आहे. अशा अनेक कारणांमुळे शेती करणे अवघड व परवडणारे नसल्याने शेतकरी आवत्या पध्दतीला पसंती देत आहेत. आवत्या प्रणालीत खर्च कमी व उत्पादन समाधानकारक येतो. आवत्या म्हणजे धानाची बियाणे शेतात सिडकण्याचा प्रकार आहे. त्याकरिता संपूर्ण शेतात नागरणी करून धानाचे बियाणे फेकले जातात. त्याचबरोबर तणाचे प्रमाण वाढू नये म्हणून तणनाशक औषधींची फवारणी केली जाते. धानाचे रोपटे आल्यावर पुन्हा तण किंवा इतर कचरा आल्यास एकदा फवारणी करून युरिया किंवा इतर रासायनिक खते दिले जातात. सदर प्रक्रिया सध्या या परिसरात सुरू आहे. यामुळे धान जमिनीत लावण्याची कटकट राहत नाही व मजुरांचा प्रशन उद्भवत नाही. सध्या परिसरात शेती लागवडीला बटईदार (जमिनी राबणारे) मिळत नाही. त्यामुळे शेत मालक स्वत: आवत्या पध्दतीचा अवलंब करून जमिनी पडीत ठेवण्यापेक्षा लागवडीखाली आणली जाते. या क्षेत्रात बहुतेक शेतकऱ्यांना मागील वर्षी आवत्या पद्धतीमुळे शेतातील उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले. शेती कार्यासाठी दिवसेंदिवस मजूर वर्ग कमी होत आहे. ग्रामीण युवा वर्गाचे शेतीकडे कल कमी दिसून येते. काही ठिकाणी आई-वडील शेतात राबराब राबतात पण आजची तरूणाई कॅरेम व पानटपरीवर दिसून येतात. युवा वर्गात शेतीविषयी मानसिकतेचे खर्चीकरण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आजच्या पिढीच्या मानसिकतेत बदलाची भूमिका येणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात शेतजमिनी पडीत राहण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे अन्नाची टंचाई निर्माण होऊन हलाकीची परिस्थिती उद्भवणार, असेही जाणकारांचे मत आहे. या समस्येकडे प्रशासन किंवा पुढारी यांनी लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)मजुरांच्या समस्येमुळे जिल्ह्यात काही प्रमाणात आवत्या पद्धतीने धानपीक घेतले जाते. याचे प्रमाण देवरी तालुक्यात अधिक असून गोंदिया तालुक्यात कमी आहे. जिल्ह्यात आवत्या लागवडीची टक्केवारी ७.४४ असून लागवडीचे क्षेत्र १४ हजार ७२ हेक्टर आहे. आवत्यांमध्ये बियाण्यांचे छिडकाव केले जाते.-ए.एस. भोंगाडे,तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, गोंदिया.शेतीसाठी पावसाचे प्रमाण अनुकूलआमगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण शेतीकरिता पोषक आहे. जून महिन्यात १७ तारखेला मंडळ आमगाव येथे १५.५ मिमी, कट्टीपार ११.२, ठाणा निरंक, तिगाव ३५.८ मिमी, १८ जूनला आमगाव येथे ४४.२, कट्टीपार १८.२, ठाणा २६.४, तिगाव ३५.८ मिमी या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तहसील कार्यालयात तालुक्यातील मंडलनिहाय दरदिवशी पावसाची नोंद घेतली जात आहे. तसेच नवीन शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. त्यात वीज पडून मृत्यू झाल्यास चार लाख, जखमींना उपचारासाठी १२ हजार, जनावरे दगावल्यास ३० हजार, लहान गुरांसाठी तीन हजार रुपये, घरांची पडझड झाल्यास पाच हजार आणि इतर नुकसान भरपाईत वाढ करण्यात आल्याचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी सांगितले.