शहरं
Join us  
Trending Stories
1
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
2
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
3
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
4
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
5
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
6
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
7
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
8
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
9
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
10
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
11
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
12
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
13
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
14
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...
15
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
17
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
18
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
19
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
20
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल

परिसरात आवत्या पध्दतीवर जोर

By admin | Updated: June 24, 2015 01:58 IST

या परिसरात शेती कार्याला वेग आला आहे. मात्र धान लागवड करणे खर्चिक झाल्यामुळे आवत्या पध्दतीकडे शेतकऱ्यांची ओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

धानपिकांसाठी उपयोगी : जमीन पडीत ठेवण्यापेक्षा आवत्या पद्धतीने पेरणी कालीमाटी : या परिसरात शेती कार्याला वेग आला आहे. मात्र धान लागवड करणे खर्चिक झाल्यामुळे आवत्या पध्दतीकडे शेतकऱ्यांची ओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.आमगाव तालुक्यातील अनेक गावे खरीप धान पिकावर अवलंबून असतात. दिवसेंदिवस धान पीक घेणे खर्चिक होत आहे. पिकांसाठी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधी साधन सामुग्रीचे भाव आभाळाला गवसले आहेत. तसेच मजुरांची कमतरता दिसून येत आहे. अशा अनेक कारणांमुळे शेती करणे अवघड व परवडणारे नसल्याने शेतकरी आवत्या पध्दतीला पसंती देत आहेत. आवत्या प्रणालीत खर्च कमी व उत्पादन समाधानकारक येतो. आवत्या म्हणजे धानाची बियाणे शेतात सिडकण्याचा प्रकार आहे. त्याकरिता संपूर्ण शेतात नागरणी करून धानाचे बियाणे फेकले जातात. त्याचबरोबर तणाचे प्रमाण वाढू नये म्हणून तणनाशक औषधींची फवारणी केली जाते. धानाचे रोपटे आल्यावर पुन्हा तण किंवा इतर कचरा आल्यास एकदा फवारणी करून युरिया किंवा इतर रासायनिक खते दिले जातात. सदर प्रक्रिया सध्या या परिसरात सुरू आहे. यामुळे धान जमिनीत लावण्याची कटकट राहत नाही व मजुरांचा प्रशन उद्भवत नाही. सध्या परिसरात शेती लागवडीला बटईदार (जमिनी राबणारे) मिळत नाही. त्यामुळे शेत मालक स्वत: आवत्या पध्दतीचा अवलंब करून जमिनी पडीत ठेवण्यापेक्षा लागवडीखाली आणली जाते. या क्षेत्रात बहुतेक शेतकऱ्यांना मागील वर्षी आवत्या पद्धतीमुळे शेतातील उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले. शेती कार्यासाठी दिवसेंदिवस मजूर वर्ग कमी होत आहे. ग्रामीण युवा वर्गाचे शेतीकडे कल कमी दिसून येते. काही ठिकाणी आई-वडील शेतात राबराब राबतात पण आजची तरूणाई कॅरेम व पानटपरीवर दिसून येतात. युवा वर्गात शेतीविषयी मानसिकतेचे खर्चीकरण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आजच्या पिढीच्या मानसिकतेत बदलाची भूमिका येणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात शेतजमिनी पडीत राहण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे अन्नाची टंचाई निर्माण होऊन हलाकीची परिस्थिती उद्भवणार, असेही जाणकारांचे मत आहे. या समस्येकडे प्रशासन किंवा पुढारी यांनी लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)मजुरांच्या समस्येमुळे जिल्ह्यात काही प्रमाणात आवत्या पद्धतीने धानपीक घेतले जाते. याचे प्रमाण देवरी तालुक्यात अधिक असून गोंदिया तालुक्यात कमी आहे. जिल्ह्यात आवत्या लागवडीची टक्केवारी ७.४४ असून लागवडीचे क्षेत्र १४ हजार ७२ हेक्टर आहे. आवत्यांमध्ये बियाण्यांचे छिडकाव केले जाते.-ए.एस. भोंगाडे,तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, गोंदिया.शेतीसाठी पावसाचे प्रमाण अनुकूलआमगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण शेतीकरिता पोषक आहे. जून महिन्यात १७ तारखेला मंडळ आमगाव येथे १५.५ मिमी, कट्टीपार ११.२, ठाणा निरंक, तिगाव ३५.८ मिमी, १८ जूनला आमगाव येथे ४४.२, कट्टीपार १८.२, ठाणा २६.४, तिगाव ३५.८ मिमी या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तहसील कार्यालयात तालुक्यातील मंडलनिहाय दरदिवशी पावसाची नोंद घेतली जात आहे. तसेच नवीन शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. त्यात वीज पडून मृत्यू झाल्यास चार लाख, जखमींना उपचारासाठी १२ हजार, जनावरे दगावल्यास ३० हजार, लहान गुरांसाठी तीन हजार रुपये, घरांची पडझड झाल्यास पाच हजार आणि इतर नुकसान भरपाईत वाढ करण्यात आल्याचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी सांगितले.