शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून रूग्णांसह कर्मचारी तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:05 IST

विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देगंगाबाई रूग्णालयातील प्रकार : बोअरवेलला लावलेली मोटार जळाली

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय प्रशासनाने तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था न केल्याने रुग्णांसह येथील कर्मचाºयांना त्याचा फटका बसत आहे.येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी विभागाजवळील बोअरवेलवर मोटारपंप लावून रुग्णालयाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र तीन दिवसांपूर्वी मोटारपंप जळाला त्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. याच मोटारपंपाचे पाणी टाकीत साठवून त्याचा उपयोग प्रयोगशाळा, पोषाहार पुनर्वसन कक्ष, बालरोग विभाग व ओपीडीमध्येसुद्धा केला जातो. मागील तीन दिवसांपासून पाणी मिळत नसल्यामुळे सदर चारही विभागातील कर्मचारी, रूग्ण व त्यांच्या नातलगांना हात धुणे व पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालयाबाहेर भटकंती करावी लागत आहे. तर शौचालयासाठी देखीेल पाणी पुरवठा केला जात नसल्याने येथे प्रसुतीसाठी येणाºया महिला आणि रुग्णांचे हाल होत आहेत. पोषाहार पुनर्वसन केंद्रात नर्सिंग कॉलेजमधून पिण्यासाठी पाणी आणूण काम चालवावे लागत आहे. रूग्णालयात पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याचा पुरवठा होतो.त्या पाण्याचा उपयोग रूग्णालयातील रूग्णांसाठी भोजन बनविणे व उर्वरित वार्डात पिण्यासाठी केला जातो. इतर विभागांपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले तर पाण्याची मोठीच कमतरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मोटारपंप दुरूस्तीची जबाबदारी कुणाचीमागील तीन दिवसांपासून मोटारपंप बंद असून त्याची त्वरीत दुरूस्ती करणे रुग्णालय प्रशासनाकडून अपेक्षीत होते. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतलेली नाही. बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचे स्थानांतरण झाले आहे. पण, सदर अधिकाºयांने आतापर्यंत पदभार सोडला नाही. सदर अधिकारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या कशी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पोषाहार पुनर्वसन केंद्रात पाणी नसल्यामुळे मी स्वत: पुढाकार घेऊन बांधकाम विभागाकडे निवेदन दिले. परंतु आता काही कर्मचारी पाठवून दुरूस्तीसाठी मोटारशी जोडलेला काही भाग घेवून गेले आहेत. परंतु पाण्याची समस्या कधी दूर होईल, हे सांगता येत नाही. सध्या पिण्यासाठीच नव्हे तर हात धुण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध नाही.-डॉ.के.के.त्रिपाठीप्रभारी अधिकारी, पोषाहार पुनर्वसन केंद्र, बीजीडब्ल्यू रूग्णालय, गोंदिया