शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

तीन दिवसांपासून रूग्णांसह कर्मचारी तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:05 IST

विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देगंगाबाई रूग्णालयातील प्रकार : बोअरवेलला लावलेली मोटार जळाली

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय प्रशासनाने तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था न केल्याने रुग्णांसह येथील कर्मचाºयांना त्याचा फटका बसत आहे.येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी विभागाजवळील बोअरवेलवर मोटारपंप लावून रुग्णालयाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र तीन दिवसांपूर्वी मोटारपंप जळाला त्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. याच मोटारपंपाचे पाणी टाकीत साठवून त्याचा उपयोग प्रयोगशाळा, पोषाहार पुनर्वसन कक्ष, बालरोग विभाग व ओपीडीमध्येसुद्धा केला जातो. मागील तीन दिवसांपासून पाणी मिळत नसल्यामुळे सदर चारही विभागातील कर्मचारी, रूग्ण व त्यांच्या नातलगांना हात धुणे व पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालयाबाहेर भटकंती करावी लागत आहे. तर शौचालयासाठी देखीेल पाणी पुरवठा केला जात नसल्याने येथे प्रसुतीसाठी येणाºया महिला आणि रुग्णांचे हाल होत आहेत. पोषाहार पुनर्वसन केंद्रात नर्सिंग कॉलेजमधून पिण्यासाठी पाणी आणूण काम चालवावे लागत आहे. रूग्णालयात पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याचा पुरवठा होतो.त्या पाण्याचा उपयोग रूग्णालयातील रूग्णांसाठी भोजन बनविणे व उर्वरित वार्डात पिण्यासाठी केला जातो. इतर विभागांपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले तर पाण्याची मोठीच कमतरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मोटारपंप दुरूस्तीची जबाबदारी कुणाचीमागील तीन दिवसांपासून मोटारपंप बंद असून त्याची त्वरीत दुरूस्ती करणे रुग्णालय प्रशासनाकडून अपेक्षीत होते. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतलेली नाही. बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचे स्थानांतरण झाले आहे. पण, सदर अधिकाºयांने आतापर्यंत पदभार सोडला नाही. सदर अधिकारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या कशी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पोषाहार पुनर्वसन केंद्रात पाणी नसल्यामुळे मी स्वत: पुढाकार घेऊन बांधकाम विभागाकडे निवेदन दिले. परंतु आता काही कर्मचारी पाठवून दुरूस्तीसाठी मोटारशी जोडलेला काही भाग घेवून गेले आहेत. परंतु पाण्याची समस्या कधी दूर होईल, हे सांगता येत नाही. सध्या पिण्यासाठीच नव्हे तर हात धुण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध नाही.-डॉ.के.के.त्रिपाठीप्रभारी अधिकारी, पोषाहार पुनर्वसन केंद्र, बीजीडब्ल्यू रूग्णालय, गोंदिया